शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

सांगलीत तरुणाची आत्महत्या, रेल्वे रुळाच्या मध्यभागी मांडी घालून बसला, रूळ ओलांडताना वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 11:49 IST

सांगली येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेची धडक बसल्याने एका महिलेसह दोघेजण ठार झाले. विश्रामबाग रेल्वे फाटक ते स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी या घटना घडल्या. मंगल रघुनाथ बेंद्रेकर (वय ५२, रा. कृष्णाली वसाहत, विश्रामबाग) व शशिकांत आनंदराव साळुंखे (२५, कांचनपूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.

ठळक मुद्देसांगलीत रेल्वेच्या धडकेत दोन ठार वेगवेगळ्या घटना तरुणाची आत्महत्या, रुळाच्या मध्यभागी मांडी घालून बसलायशवंतपूर-जोधपूर रेल्वेची त्यांना जोराची धडक, रूळ ओलांडताना वृद्धेचा मृत्यूहद्दीचा वाद : मृतदेह पाच तास स्थानकावर

सांगली : येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेची धडक बसल्याने एका महिलेसह दोघेजण ठार झाले. विश्रामबाग रेल्वे फाटक ते स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी या घटना घडल्या. मंगल रघुनाथ बेंद्रेकर (वय ५२, रा. कृष्णाली वसाहत, विश्रामबाग) व शशिकांत आनंदराव साळुंखे (२५, कांचनपूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.मंगल बेंद्रेकर या सकाळी अकरा वाजता विश्रामबाग रेल्वे फाटकाजवळील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्या पावणेबारा वाजता घरी निघाल्या होत्या. त्यावेळी यशवंतपूर-जोधपूर रेल्वे जाणार असल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. तरीही त्यांनी फाटक ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला.

याचदरम्यान भरधाव वेगाने आलेल्या यशवंतपूर-जोधपूर रेल्वेची त्यांना जोराची धडक बसली. यामध्ये त्या उडून पडल्याने जागीच ठार झाल्या. मिरज रेल्वे पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. बेंद्रेकर यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शशिकांत साळुंखे हा मिरज एमआयडीसीतील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत होता. गेले दोन दिवस तो कामावरही गेला नाही, तसेच घरीही गेला होता. त्यामुळे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. सकाळी साडेआठ वाजता तो विश्रामबाग स्थानकावर फिरत होता. 

यावेळी पुणे-मिरज ही मालवाहतूक रेल्वे येताना त्याला दिसताच तो रुळाच्या मध्यभागी मांडी घालून बसला. चालकाने हॉर्न वाजवून त्याला हटविण्याचा प्रयत्न केला. तरीही तो उठला नाही. शेवटी त्याला रेल्वेची जोरात धडक बसली. तो उडून रुळाकडेला पडला. नागरिकांनी धाव घेतली व त्याला पाणी पाजले. पण काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.हद्दीचा वाद : मृतदेह पाच तास स्थानकावररेल्वेची धडक बसल्यानंतर शशिकांत साळुंखे जिवंत होता. नागरिकांनी त्याला उचलून प्लॅटफार्मवर ठेवले. पण पाणी पाजताच त्याचा मृत्यू झाला. ही घटना रेल्वेच्या हद्दीत होती. परंतु रेल्वे पोलिसांनी हात झटकले. यावरुन रेल्वे व विश्रामबाग पोलिसांत जोरदार वाद झाला. या वादामुळे मृतदेच पाच तास स्थानकावर पडून होता. शेवटी विश्रामबाग पोलिसांनी पंचनामा करुन पुढील कार्यवाही केली.

टॅग्स :SangliसांगलीRailway Passengerरेल्वे प्रवासीAccidentअपघात