शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

​राम कदम यांच्याविरुद्ध सांगलीत विनयभंगाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:47 IST

तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली.

सांगली : तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली. याबाबतची रितसर तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विनया पाठक, नगरसेविका संगीता हारगे, राधिका हारगे, आयेशा शेख, स्वाती पारधी, सुनीता लालवाणी, छाया मोरे आदींनी हे निवेदन विश्रामबाग पोलीस निरीक्षक अशोक तनपुरे यांना दिले. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.  तक्रारीत म्हटले आहे की, राम कदम यांनी ४ सप्टेंबर रोजी मुंबईतील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात, तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्याचे वक्तव्य जाहीररीत्या केले. या माध्यमातून त्यांनी राज्यातील तमाम महिला वर्गाचा विनयभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विनया पाठक म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविताना, परस्त्री मातेसमान, ही शिकवण दिली. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर महाराष्ट्र वाटचाल करीत असताना, सरकारमधील एक आमदार शिवरायांच्या याच तत्त्वाला काळिमा फासण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक मुलींना पळवून आणण्याची धमकी देऊन एक प्रकारे सर्व महिला वर्गाचा विनयभंगच त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचीच तक्रार दाखल करण्यात यायला हवी.सत्ताधारी आमदार म्हणून अशा लोकांना पाठीशी घातले जाणार, की महिला वर्गाचा मान राखला जाणार, हे लवकरच जनतेला कळेल. सरकार खरेच महिलांच्या बाजूने असेल, तर ते अशा आमदारावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना सूचना देईल. आम्ही या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. जर सरकारने राम कदम यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यानंतर उद्भवणा-या परिस्थितीस पोलीस जबाबदार राहतील, असेही पाठक म्हणाल्या.