शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

​राम कदम यांच्याविरुद्ध सांगलीत विनयभंगाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:47 IST

तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली.

सांगली : तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली. याबाबतची रितसर तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विनया पाठक, नगरसेविका संगीता हारगे, राधिका हारगे, आयेशा शेख, स्वाती पारधी, सुनीता लालवाणी, छाया मोरे आदींनी हे निवेदन विश्रामबाग पोलीस निरीक्षक अशोक तनपुरे यांना दिले. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.  तक्रारीत म्हटले आहे की, राम कदम यांनी ४ सप्टेंबर रोजी मुंबईतील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात, तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्याचे वक्तव्य जाहीररीत्या केले. या माध्यमातून त्यांनी राज्यातील तमाम महिला वर्गाचा विनयभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विनया पाठक म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविताना, परस्त्री मातेसमान, ही शिकवण दिली. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर महाराष्ट्र वाटचाल करीत असताना, सरकारमधील एक आमदार शिवरायांच्या याच तत्त्वाला काळिमा फासण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक मुलींना पळवून आणण्याची धमकी देऊन एक प्रकारे सर्व महिला वर्गाचा विनयभंगच त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचीच तक्रार दाखल करण्यात यायला हवी.सत्ताधारी आमदार म्हणून अशा लोकांना पाठीशी घातले जाणार, की महिला वर्गाचा मान राखला जाणार, हे लवकरच जनतेला कळेल. सरकार खरेच महिलांच्या बाजूने असेल, तर ते अशा आमदारावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना सूचना देईल. आम्ही या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. जर सरकारने राम कदम यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यानंतर उद्भवणा-या परिस्थितीस पोलीस जबाबदार राहतील, असेही पाठक म्हणाल्या.