शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

शुद्ध पाण्यासाठी काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल : सांगलीच्या महापौरांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:48 IST

दोन्ही केंद्रांतून नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार कधी? आमच्या सत्ताकाळात हे प्रकल्प पूर्ण करायचे नाहीत, असाच घाट प्रशासनाने घातला आहे. मग आम्हालाच काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, अशा शब्दात सोमवारी सांगलीचे महापौर हारुण शिकलगार यांनी महासभेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

ठळक मुद्देपाणी योजनेवरून अधिकाऱ्यांचा पंचनामासांगली, कुपवाड केंद्रांतून नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार कधी? ५४.६१ दशलक्ष घनमीटर करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर होणार

सांगली , दि. २४ : महापालिका प्रशासनाने काम पूर्ण होण्यापूर्वी ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उदघाट्न करून आमची फसवणूक केली. मे महिन्यापासून ७० एमएलडीचे काम पूर्ण होणार, असे ऐकतो आहे. या दोन्ही केंद्रांतून नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार कधी? आमच्या सत्ताकाळात हे प्रकल्प पूर्ण करायचे नाहीत, असाच घाट प्रशासनाने घातला आहे. मग आम्हालाच काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, अशा शब्दात सोमवारी सांगलीचे महापौर हारुण शिकलगार यांनी महासभेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

सांगली व कुपवाड या दोन शहरांची भविष्यात वाढणारी लोकसंख्या गृहित धरून जादा पाणी उपशासाठी पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावावर चर्चा करताना महापौरांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे वाभाडे काढले.

सध्या सांगली व कुपवाडसाठी २७.६७ दशलक्ष घनमीटर पाणीउपसा करण्यास १९९७ मध्ये मंजुरी घेण्यात आली होती. औद्योगिक वापरासाठी ३.७४ दशलक्ष घनमीटर पाणीउपशास मंजुरी आहे. पालिकेने ५६ व ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम हाती घेतले आहे. ते अंतिम टप्प्यात आहे.

भविष्यात जादा पाणी उपसा करावा लागणार असल्याने दुप्पट म्हणजेच ५४.६१ दशलक्ष घनमीटर करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

यावर चर्चा करताना नगरसेवक शेखर माने म्हणाले की, माणसी १३५ लिटर पाणी नागरिकांना मिळाले पाहिजे. सध्या अनेक भागात माणसी ३५ लिटरही पाणी मिळत नाही. कृष्णा नदीतून दिवसाला ७० लाख लिटर पाणी उपसा होतो. त्यापैकी ४८ लाख लिटर पाणी नागरिकांना दिले जाते. मग उर्वरित शुद्ध केलेले पाणी परस्पर विकले जात आहे का?

५६ व ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रांचा खेळ सुरूच आहे. पाण्याच्या टाक्यात पाणी नाही. त्यामुळे हा फ्लॉप शो ठरला आहे. शेरीनाल्यावर ३८ कोटी रुपये खर्च करून सांडपाणी नदीत जात आहे. तशीच गत या योजनेची झाली आहे, असा आरोप केला.

यावर पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये म्हणाले की, उपसा केलेल्या पाण्यापैकी २० टक्के पाणी हे जलवाहिन्यात शिल्लक राहते. उर्वरित गळती ३० टक्केवर आहे. त्यामुळे शहराला ५० टक्केच पाणीपुरवठा होतो. २०४० ची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी देण्यासाठी जादा उपसा करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले.

दरम्यान, महापौरांनी जलशुद्धीकरण केंद्राचे काम कधी पूर्ण होणार? असा सवाल अधिकाऱ्यांना केला. मे महिन्यापासून प्रकल्पाचे काम पूर्ण होणार, असे ऐकतो आहे; पण आजअखेर कामच झालेले नाही. अंतिम टप्प्यात काम असल्याचे सांगितले जाते. मग ते का पूर्ण होत नाही.

प्रशासनाला आमच्या सत्ताकाळात हे काम पूर्ण करायचे नाही का? तसे असेल तर मग आम्हाला काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला. अखेर महापौरांनी गटनेते किशोर जामदार, उपायुक्त सुनील पवार, शहर अभियंता बामणे व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून प्रकल्पाची वस्तुस्थिती जाहीर करण्याचे आदेश दिले. तसेच वाढीव पाणीउपसा करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

घरपट्टीतून पाणीबिलाचा घोळ

घरपट्टी बिलासोबतच वार्षिक दोन हजार रुपये पाणी बिलाचा ठराव गत सभेत ऐनवेळी घुसडण्यात आल्याचे उघड झाले. याला शेखर माने, संजय मेंढे आदींनी आक्षेप घेतला. हा ठराव केला कधी? असा सवालही केला.

त्यावर महापौर शिकलगार म्हणाले, घरपट्टीत ५० टक्के शास्तीमाफीचा विषय मंजूर केला. त्यातच हा विषय घुसडला आहे. पण सदस्यांनी त्याला विरोध करताच पाणीपुरवठा आणि घरपट्टी विभागाच्या समन्वयाने याचा निर्णय होईल, असे सांगून महापौरांनी वेळ मारून नेली.

टॅग्स :riverनदीWaterपाणी