शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

शुद्ध पाण्यासाठी काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल : सांगलीच्या महापौरांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:48 IST

दोन्ही केंद्रांतून नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार कधी? आमच्या सत्ताकाळात हे प्रकल्प पूर्ण करायचे नाहीत, असाच घाट प्रशासनाने घातला आहे. मग आम्हालाच काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, अशा शब्दात सोमवारी सांगलीचे महापौर हारुण शिकलगार यांनी महासभेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

ठळक मुद्देपाणी योजनेवरून अधिकाऱ्यांचा पंचनामासांगली, कुपवाड केंद्रांतून नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार कधी? ५४.६१ दशलक्ष घनमीटर करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर होणार

सांगली , दि. २४ : महापालिका प्रशासनाने काम पूर्ण होण्यापूर्वी ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उदघाट्न करून आमची फसवणूक केली. मे महिन्यापासून ७० एमएलडीचे काम पूर्ण होणार, असे ऐकतो आहे. या दोन्ही केंद्रांतून नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार कधी? आमच्या सत्ताकाळात हे प्रकल्प पूर्ण करायचे नाहीत, असाच घाट प्रशासनाने घातला आहे. मग आम्हालाच काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, अशा शब्दात सोमवारी सांगलीचे महापौर हारुण शिकलगार यांनी महासभेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

सांगली व कुपवाड या दोन शहरांची भविष्यात वाढणारी लोकसंख्या गृहित धरून जादा पाणी उपशासाठी पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावावर चर्चा करताना महापौरांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे वाभाडे काढले.

सध्या सांगली व कुपवाडसाठी २७.६७ दशलक्ष घनमीटर पाणीउपसा करण्यास १९९७ मध्ये मंजुरी घेण्यात आली होती. औद्योगिक वापरासाठी ३.७४ दशलक्ष घनमीटर पाणीउपशास मंजुरी आहे. पालिकेने ५६ व ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम हाती घेतले आहे. ते अंतिम टप्प्यात आहे.

भविष्यात जादा पाणी उपसा करावा लागणार असल्याने दुप्पट म्हणजेच ५४.६१ दशलक्ष घनमीटर करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

यावर चर्चा करताना नगरसेवक शेखर माने म्हणाले की, माणसी १३५ लिटर पाणी नागरिकांना मिळाले पाहिजे. सध्या अनेक भागात माणसी ३५ लिटरही पाणी मिळत नाही. कृष्णा नदीतून दिवसाला ७० लाख लिटर पाणी उपसा होतो. त्यापैकी ४८ लाख लिटर पाणी नागरिकांना दिले जाते. मग उर्वरित शुद्ध केलेले पाणी परस्पर विकले जात आहे का?

५६ व ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रांचा खेळ सुरूच आहे. पाण्याच्या टाक्यात पाणी नाही. त्यामुळे हा फ्लॉप शो ठरला आहे. शेरीनाल्यावर ३८ कोटी रुपये खर्च करून सांडपाणी नदीत जात आहे. तशीच गत या योजनेची झाली आहे, असा आरोप केला.

यावर पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये म्हणाले की, उपसा केलेल्या पाण्यापैकी २० टक्के पाणी हे जलवाहिन्यात शिल्लक राहते. उर्वरित गळती ३० टक्केवर आहे. त्यामुळे शहराला ५० टक्केच पाणीपुरवठा होतो. २०४० ची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी देण्यासाठी जादा उपसा करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले.

दरम्यान, महापौरांनी जलशुद्धीकरण केंद्राचे काम कधी पूर्ण होणार? असा सवाल अधिकाऱ्यांना केला. मे महिन्यापासून प्रकल्पाचे काम पूर्ण होणार, असे ऐकतो आहे; पण आजअखेर कामच झालेले नाही. अंतिम टप्प्यात काम असल्याचे सांगितले जाते. मग ते का पूर्ण होत नाही.

प्रशासनाला आमच्या सत्ताकाळात हे काम पूर्ण करायचे नाही का? तसे असेल तर मग आम्हाला काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला. अखेर महापौरांनी गटनेते किशोर जामदार, उपायुक्त सुनील पवार, शहर अभियंता बामणे व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून प्रकल्पाची वस्तुस्थिती जाहीर करण्याचे आदेश दिले. तसेच वाढीव पाणीउपसा करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

घरपट्टीतून पाणीबिलाचा घोळ

घरपट्टी बिलासोबतच वार्षिक दोन हजार रुपये पाणी बिलाचा ठराव गत सभेत ऐनवेळी घुसडण्यात आल्याचे उघड झाले. याला शेखर माने, संजय मेंढे आदींनी आक्षेप घेतला. हा ठराव केला कधी? असा सवालही केला.

त्यावर महापौर शिकलगार म्हणाले, घरपट्टीत ५० टक्के शास्तीमाफीचा विषय मंजूर केला. त्यातच हा विषय घुसडला आहे. पण सदस्यांनी त्याला विरोध करताच पाणीपुरवठा आणि घरपट्टी विभागाच्या समन्वयाने याचा निर्णय होईल, असे सांगून महापौरांनी वेळ मारून नेली.

टॅग्स :riverनदीWaterपाणी