शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सांगलीकर भरतात दूषित पाण्यासाठी कर; नागरिकांच्या आरोग्याबाबत विविध समस्या निर्माण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:02 IST

शेरीनाल्यासह जिल्ह्यातील शंभराहून अधिक गावांचे सांडपाणी मिसळत असल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. त्यात पुन्हा योग्य प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी असतानाही, महापालिका सांगलीकरांना शुद्ध पाणी देत नसल्याची बाब उजेडात आली आहे.

ठळक मुद्देकारवाईची गरज : महापालिकेच्या दैनंदिन पाणी तपासणीची बोगसगिरी उजेडात

अविनाश कोळी ।सांगली : शुद्ध पाणीपुरवठ्याचा दावा करून महापालिकेकडून जनतेची शुद्ध फसवणूक सुरू असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून उजेडात आले. याच दूषित पाण्यासाठी सांगलीकर कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत भरत आहेत. नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवणारे दूषित पाणी पिण्यास भाग पाडून महापालिका आता नामानिराळी झाली आहे.

शेरीनाल्यासह जिल्ह्यातील शंभराहून अधिक गावांचे सांडपाणी मिसळत असल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. त्यात पुन्हा योग्य प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी असतानाही, महापालिका सांगलीकरांना शुद्ध पाणी देत नसल्याची बाब उजेडात आली आहे.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी सांगलीतील अनेक घरात येणाऱ्या पाण्याचे नमुने खासगी प्रयोगशाळेतून तपासले. यामध्ये अनेक धोकादायक घटक निदर्शनास आले. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. महापालिका दररोज शुद्धीकरणानंतरच्या पाण्याचे नमुने तपासणीला घेत असते. त्याचा अहवालही पाणीपुरवठा व आरोग्य विभागाकडे असतो.

गेल्या अनेक वर्षांपासून या अहवालात सांगलीचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे व ते शुद्धतेच्या प्रमाणात बसत असल्याचे दर्शविण्यात आले. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रकार सुरू असतानाच, खासगी प्रयोगशाळेने त्याचे बिंग फोडले.

सांगलीकरांच्या आरोग्याशी महापालिकेने खेळ मांडला आहे. साथीच्या रोगाने येथील लोक हैराण झाले आहेत. महापालिकेवर कुणी आरोप केले, तर त्यानंतर प्रशासनामार्फत पाणी तपासणीचे अहवाल सादर केले जातात. हे अहवाल किती खरे आणि किती खोटे आहेत, याची शहानिशा आजवर कुणी केली नाही. साखळकर यांनी ही शहानिशा केल्यानंतर महापालिकेचा बोगसपणा दिसून आला.

एकीकडे कोट्यवधी रुपयांचा कर सांगलीकरांच्या खिशातून महापालिका काढून घेते. त्याबदल्यात दूषित पाणी व गैरसोयींची भेट नागरिकांना मिळत असल्याचे दिसत आहे. दरमहा पाणीपट्टी भरणाºया नागरिकांना दूषित पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्याही समस्या उद्भवत असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

महापालिकेकडून होते सर्वाधिक प्रदूषणसांगली शहरातून कृष्णा नदीत प्रतिदिन ५ कोटी ६० लाख लिटर, तर एमआयडीसीमधून प्रतिदिन १ कोटी लिटर सांडपाणी नदीत मिसळत आहे. नदी प्रदूषणात महापालिकेचा मोठा हात आहे. शेरीनाला शुद्धीकरण प्रकल्प अर्धवट स्थितीत ठेवल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. एकीकडे दुसऱ्या गावांसाठीचा पाणीपुरवठा दूषित करताना महापालिकेने आपल्या क्षेत्रातील नागरिकांनाही दूषित पाणी पाजण्याचे काम सुरू केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी महापालिकेला दीड कोटीचा दंड केला जातो. वर्षानुवर्षे दंड भरूनही महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात नाहीत.

 

  • नागरिकांच्या समस्या बेदखल

सांगलीकरांच्या घशात दूषित पाणी जात असतानाही त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली जात नाही. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी पुराव्यासह गंभीर स्थिती मांडल्यानंतरही, बुधवारी प्रशासनाकडून त्याची दखल घेतली गेली नाही. नागरिकांच्या समस्या बेदखल करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर रुप धारण करीत आहेत.

  • पाण्यातून होताहेत आजार

खासगी व सरकारी रुग्णालयात दरवर्षी पाण्यामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आरोग्य विभागामार्फत कधी याबाबत सर्व्हे केला जात नाही. जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचा अहवाल महापालिकेने दरवर्षी तयार करणे बंधनकारक असतानाही, तो केला जात नाही. काही ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानेही दूषित पाणीपुरवठा होत असतो, मात्र अशाठिकाणी नागरिकांनी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाpollutionप्रदूषणWaterपाणी