शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

सांगलीत संविधान सन्मान मोर्चा जिल्हाभरातून प्रतिसाद : संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:25 IST

‘तिरंगा आमची शान आहे, भारतीय राज्यघटना जनतेचा सन्मान आहे’, ‘संविधान हमारा जानसे प्यारा, यही है भारत का नारा’, अशा लक्षवेधी घोषणांचे फलक घेऊन सहभागी झालेले तरुण आणि भारतीय संविधानाचे स्थान अधिक प्रबळ करणाºया घोषणा देणाºया

सांगली : ‘तिरंगा आमची शान आहे, भारतीय राज्यघटना जनतेचा सन्मान आहे’, ‘संविधान हमारा जानसे प्यारा, यही है भारत का नारा’, अशा लक्षवेधी घोषणांचे फलक घेऊन सहभागी झालेले तरुण आणि भारतीय संविधानाचे स्थान अधिक प्रबळ करणाऱ्या घोषणा देणाऱ्या नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सांगलीत सोमवारी संविधान सन्मान मोर्चा निघाला. जिल्हाभरातून आलेले संविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारतीय संविधान देशाचा प्राण असताना, ते जाळून अपमान करणाऱ्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने करण्यात आली. भाजप वगळता इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सोमवारी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या सर्वात पुढे तरुणांच्या हाती भव्य राष्ट्रध्वज होता. तिरंग्यातील रंगाच्या टोप्या घातलेले नागरिक संविधान सन्मानाच्या घोषणा देत सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर तेथे राणी यादव यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. त्यानंतर प्रतीक्षा कोरी, रहिस्मा मुल्ला, आश्लेषा कुरुंदवाडे, माधुरी कचरे आणि कोमल मगदूम या पाच तरुणींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन सादर केले.

यावेळी डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, गौतमीपुत्र कांबळे, अ‍ॅड. के. डी. शिंदे, आशिष कोरी, अमर पांडे, अ‍ॅड. अमित शिंदे, महेश खराडे, रवींद्र ढाले, सचिन सवाखंडे, ज्योती आदाटे, महेश माने, मुनीर मुल्ला, नितीन कांबळे, सदाशिव मगदूम, सुरेश दुधगावकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.पक्षांकडून संविधानाला धोकाराष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही ही सर्वात आधुनिक समाजव्यवस्था आहे. लोकशाहीविरोधी संस्था, संघटना व पक्षांनी संविधान मोडून काढायला सुरूवात केली आहे. दिल्लीमध्ये काही संघटना नियोजनपूर्वक संविधान जाळतात व पोलीस त्याचे छायाचित्रण करतात. वास्तविक तेथे उपस्थित असणाºया पोलिसांनी तेथेच त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. हे सत्ताधाऱ्यांचे लोकशाहीविरोधी भयंकर षड्यंत्र आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून मनुस्मृती समर्थकांचा व सनातनी लोकांचा संविधानास विरोध राहिला आहे. आता केंद्रात व राज्यात त्यांचेच सरकार असल्यामुळे संविधानिक व्यवस्था मोडीत काढली जात आहे. त्यामुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे.नेत्यांचा सहभाग...या मोर्चात विविध सामाजिक संघटनांबरोबरच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. खा. राजू शेट्टी, आ. सुमनताई पाटील, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह पदाधिकाºयांचा समावेश होता.प्रमुख मागण्या...संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करा.संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.गुन्हा घडताना बघ्याची भूमिका घेणाºया पोलिसांवरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा.शालेय अभ्यासक्रमात राज्यघटनेचा समावेश करा.संविधान दिवस शासकीय स्तरावर साजरा करावा.