शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सांगलीत संविधान सन्मान मोर्चा जिल्हाभरातून प्रतिसाद : संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:25 IST

‘तिरंगा आमची शान आहे, भारतीय राज्यघटना जनतेचा सन्मान आहे’, ‘संविधान हमारा जानसे प्यारा, यही है भारत का नारा’, अशा लक्षवेधी घोषणांचे फलक घेऊन सहभागी झालेले तरुण आणि भारतीय संविधानाचे स्थान अधिक प्रबळ करणाºया घोषणा देणाºया

सांगली : ‘तिरंगा आमची शान आहे, भारतीय राज्यघटना जनतेचा सन्मान आहे’, ‘संविधान हमारा जानसे प्यारा, यही है भारत का नारा’, अशा लक्षवेधी घोषणांचे फलक घेऊन सहभागी झालेले तरुण आणि भारतीय संविधानाचे स्थान अधिक प्रबळ करणाऱ्या घोषणा देणाऱ्या नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सांगलीत सोमवारी संविधान सन्मान मोर्चा निघाला. जिल्हाभरातून आलेले संविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारतीय संविधान देशाचा प्राण असताना, ते जाळून अपमान करणाऱ्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने करण्यात आली. भाजप वगळता इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सोमवारी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या सर्वात पुढे तरुणांच्या हाती भव्य राष्ट्रध्वज होता. तिरंग्यातील रंगाच्या टोप्या घातलेले नागरिक संविधान सन्मानाच्या घोषणा देत सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर तेथे राणी यादव यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. त्यानंतर प्रतीक्षा कोरी, रहिस्मा मुल्ला, आश्लेषा कुरुंदवाडे, माधुरी कचरे आणि कोमल मगदूम या पाच तरुणींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन सादर केले.

यावेळी डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, गौतमीपुत्र कांबळे, अ‍ॅड. के. डी. शिंदे, आशिष कोरी, अमर पांडे, अ‍ॅड. अमित शिंदे, महेश खराडे, रवींद्र ढाले, सचिन सवाखंडे, ज्योती आदाटे, महेश माने, मुनीर मुल्ला, नितीन कांबळे, सदाशिव मगदूम, सुरेश दुधगावकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.पक्षांकडून संविधानाला धोकाराष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही ही सर्वात आधुनिक समाजव्यवस्था आहे. लोकशाहीविरोधी संस्था, संघटना व पक्षांनी संविधान मोडून काढायला सुरूवात केली आहे. दिल्लीमध्ये काही संघटना नियोजनपूर्वक संविधान जाळतात व पोलीस त्याचे छायाचित्रण करतात. वास्तविक तेथे उपस्थित असणाºया पोलिसांनी तेथेच त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. हे सत्ताधाऱ्यांचे लोकशाहीविरोधी भयंकर षड्यंत्र आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून मनुस्मृती समर्थकांचा व सनातनी लोकांचा संविधानास विरोध राहिला आहे. आता केंद्रात व राज्यात त्यांचेच सरकार असल्यामुळे संविधानिक व्यवस्था मोडीत काढली जात आहे. त्यामुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे.नेत्यांचा सहभाग...या मोर्चात विविध सामाजिक संघटनांबरोबरच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. खा. राजू शेट्टी, आ. सुमनताई पाटील, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह पदाधिकाºयांचा समावेश होता.प्रमुख मागण्या...संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करा.संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.गुन्हा घडताना बघ्याची भूमिका घेणाºया पोलिसांवरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा.शालेय अभ्यासक्रमात राज्यघटनेचा समावेश करा.संविधान दिवस शासकीय स्तरावर साजरा करावा.