शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तुल्यबळ उमेदवारांमुळे सांगलीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:33 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संभ्रमाचे धुके हटल्याने आता सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संभ्रमाचे धुके हटल्याने आता सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवाराच्या सहभागाने निर्माण झालेला हा चौरंगी सामना चुरशीचा ठरणार आहे. मतांचे विभाजन कसे होणार आणि त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, यावरून आता तर्कवितर्क रंगले आहेत.मतदारसंघाची यंदाची लढत ही वेगळ्या समीकरणांनी सजली आहे. परंपरागत भाजप-काँग्रेसऐवजी भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटना असा सामना होणार आहे. यात दोन्ही पक्षांना वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवाराचेही आव्हान असणार आहे. यंदा जागाबदलामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आता ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वसंतदादा घराण्यातील व्यक्तीला प्रथमच दुसऱ्या पक्षाची उसनवारी करून निवडणूक लढवावी लागत आहे. वसंतदादांचे नातू व वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी विधानसभेसाठी मशागत करून थेट लोकसभेच्या शिवारात उतरण्याचे काम केल्याने, ही राजकीय खेळी आहे, की दादा गटाच्या अस्तित्वासाठीची अपरिहार्यता, असा सवाल उपस्थित होत आहे. तरीही मैदानात उतरलेल्या तगड्या खेळाडूंमुळे सांगलीचा सामना अधिक रंगतदार होणार हे निश्चित आहे.भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्यावरून सुरू असलेला गोंधळ त्यांच्या समर्थकांच्या मनात आनंदलहरी निर्माण करणारा ठरत होता. मात्र आता दिग्गज उमेदवारांमुळे याच आनंदलहरींची जागा चिंतालहरींनी घेतली आहे. भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोदी लाटेत सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपकडे गेला असल्याचा वारंवार उल्लेख केला जात असल्याने, यंदा भाजपला खऱ्या ताकदीची परीक्षा द्यावी लागेल. सांगलीच्या मैदानात अन्य पक्ष, अपक्षांची ताकद यापूर्वी फारशी लागत नव्हती. यंदा वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार म्हणून धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरही मैदानात असल्याने त्यांचे आव्हानही दोन्ही प्रमुख पक्षांना दुर्लक्षित करता येणार नाही. अन्य दोन उमेदवारांमुळे मतांची विभागणीही मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने, यात बाजी कोण मारणार, हासुद्धा उत्सुकतेचा विषय आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बराच कालावधी शिल्लक असल्याने आणखी बºयाच घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौरंगी सामना तिरंगी सामन्यातही बदलला जाऊ शकतो.गटबाजीचे ग्रहण दोन्हीकडेकाँग्रेस, राष्टÑवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ५६ पक्षांच्या आघाडीमार्फत सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’ लढवित आहे, मात्र त्यांनी उमेदवारी काँग्रेस नेते विशाल पाटील यांना दिली आहे. काँग्रेसमधील त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवून ही उमेदवारी दिली गेल्याने, काँग्रेसअंतर्गत गटबाजीचा सामना त्यांनाही करावा लागणार आहे. राष्टÑवादीच्या मदतीबद्दलही साशंकता व्यक्त होत आहे.दुसरीकडे भाजपअंतर्गत गटबाजीही अजून शांत झालेली नाही. संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीविरोधात आमदार व पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. मुंबईत वाद मिटल्याचे सांगून आता सर्व नेते एकत्र फिरत असले तरी, कार्यकर्त्यांत अजूनही गटबाजी कायम आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना गटबाजीचा सामनाही करावा लागण्याची चिन्हे आहेत.नाराजी दूर करण्याची धडपडकाँग्रेस नेते विशाल पाटील आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील या दोन्ही उमेदवारांनी सुरुवातीच्या टप्प्यात पक्षांतर्गत नाराजी संपविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. नाराज नेत्यांशी संवाद साधून वातावरण सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात त्यांना कितपत यश मिळणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.