शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

तुल्यबळ उमेदवारांमुळे सांगलीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:33 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संभ्रमाचे धुके हटल्याने आता सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संभ्रमाचे धुके हटल्याने आता सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवाराच्या सहभागाने निर्माण झालेला हा चौरंगी सामना चुरशीचा ठरणार आहे. मतांचे विभाजन कसे होणार आणि त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, यावरून आता तर्कवितर्क रंगले आहेत.मतदारसंघाची यंदाची लढत ही वेगळ्या समीकरणांनी सजली आहे. परंपरागत भाजप-काँग्रेसऐवजी भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटना असा सामना होणार आहे. यात दोन्ही पक्षांना वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवाराचेही आव्हान असणार आहे. यंदा जागाबदलामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आता ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वसंतदादा घराण्यातील व्यक्तीला प्रथमच दुसऱ्या पक्षाची उसनवारी करून निवडणूक लढवावी लागत आहे. वसंतदादांचे नातू व वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी विधानसभेसाठी मशागत करून थेट लोकसभेच्या शिवारात उतरण्याचे काम केल्याने, ही राजकीय खेळी आहे, की दादा गटाच्या अस्तित्वासाठीची अपरिहार्यता, असा सवाल उपस्थित होत आहे. तरीही मैदानात उतरलेल्या तगड्या खेळाडूंमुळे सांगलीचा सामना अधिक रंगतदार होणार हे निश्चित आहे.भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्यावरून सुरू असलेला गोंधळ त्यांच्या समर्थकांच्या मनात आनंदलहरी निर्माण करणारा ठरत होता. मात्र आता दिग्गज उमेदवारांमुळे याच आनंदलहरींची जागा चिंतालहरींनी घेतली आहे. भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोदी लाटेत सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपकडे गेला असल्याचा वारंवार उल्लेख केला जात असल्याने, यंदा भाजपला खऱ्या ताकदीची परीक्षा द्यावी लागेल. सांगलीच्या मैदानात अन्य पक्ष, अपक्षांची ताकद यापूर्वी फारशी लागत नव्हती. यंदा वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार म्हणून धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरही मैदानात असल्याने त्यांचे आव्हानही दोन्ही प्रमुख पक्षांना दुर्लक्षित करता येणार नाही. अन्य दोन उमेदवारांमुळे मतांची विभागणीही मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने, यात बाजी कोण मारणार, हासुद्धा उत्सुकतेचा विषय आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बराच कालावधी शिल्लक असल्याने आणखी बºयाच घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौरंगी सामना तिरंगी सामन्यातही बदलला जाऊ शकतो.गटबाजीचे ग्रहण दोन्हीकडेकाँग्रेस, राष्टÑवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ५६ पक्षांच्या आघाडीमार्फत सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’ लढवित आहे, मात्र त्यांनी उमेदवारी काँग्रेस नेते विशाल पाटील यांना दिली आहे. काँग्रेसमधील त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवून ही उमेदवारी दिली गेल्याने, काँग्रेसअंतर्गत गटबाजीचा सामना त्यांनाही करावा लागणार आहे. राष्टÑवादीच्या मदतीबद्दलही साशंकता व्यक्त होत आहे.दुसरीकडे भाजपअंतर्गत गटबाजीही अजून शांत झालेली नाही. संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीविरोधात आमदार व पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. मुंबईत वाद मिटल्याचे सांगून आता सर्व नेते एकत्र फिरत असले तरी, कार्यकर्त्यांत अजूनही गटबाजी कायम आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना गटबाजीचा सामनाही करावा लागण्याची चिन्हे आहेत.नाराजी दूर करण्याची धडपडकाँग्रेस नेते विशाल पाटील आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील या दोन्ही उमेदवारांनी सुरुवातीच्या टप्प्यात पक्षांतर्गत नाराजी संपविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. नाराज नेत्यांशी संवाद साधून वातावरण सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात त्यांना कितपत यश मिळणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.