शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

तुल्यबळ उमेदवारांमुळे सांगलीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:33 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संभ्रमाचे धुके हटल्याने आता सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संभ्रमाचे धुके हटल्याने आता सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवाराच्या सहभागाने निर्माण झालेला हा चौरंगी सामना चुरशीचा ठरणार आहे. मतांचे विभाजन कसे होणार आणि त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, यावरून आता तर्कवितर्क रंगले आहेत.मतदारसंघाची यंदाची लढत ही वेगळ्या समीकरणांनी सजली आहे. परंपरागत भाजप-काँग्रेसऐवजी भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटना असा सामना होणार आहे. यात दोन्ही पक्षांना वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवाराचेही आव्हान असणार आहे. यंदा जागाबदलामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आता ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वसंतदादा घराण्यातील व्यक्तीला प्रथमच दुसऱ्या पक्षाची उसनवारी करून निवडणूक लढवावी लागत आहे. वसंतदादांचे नातू व वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी विधानसभेसाठी मशागत करून थेट लोकसभेच्या शिवारात उतरण्याचे काम केल्याने, ही राजकीय खेळी आहे, की दादा गटाच्या अस्तित्वासाठीची अपरिहार्यता, असा सवाल उपस्थित होत आहे. तरीही मैदानात उतरलेल्या तगड्या खेळाडूंमुळे सांगलीचा सामना अधिक रंगतदार होणार हे निश्चित आहे.भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्यावरून सुरू असलेला गोंधळ त्यांच्या समर्थकांच्या मनात आनंदलहरी निर्माण करणारा ठरत होता. मात्र आता दिग्गज उमेदवारांमुळे याच आनंदलहरींची जागा चिंतालहरींनी घेतली आहे. भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोदी लाटेत सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपकडे गेला असल्याचा वारंवार उल्लेख केला जात असल्याने, यंदा भाजपला खऱ्या ताकदीची परीक्षा द्यावी लागेल. सांगलीच्या मैदानात अन्य पक्ष, अपक्षांची ताकद यापूर्वी फारशी लागत नव्हती. यंदा वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार म्हणून धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरही मैदानात असल्याने त्यांचे आव्हानही दोन्ही प्रमुख पक्षांना दुर्लक्षित करता येणार नाही. अन्य दोन उमेदवारांमुळे मतांची विभागणीही मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने, यात बाजी कोण मारणार, हासुद्धा उत्सुकतेचा विषय आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बराच कालावधी शिल्लक असल्याने आणखी बºयाच घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौरंगी सामना तिरंगी सामन्यातही बदलला जाऊ शकतो.गटबाजीचे ग्रहण दोन्हीकडेकाँग्रेस, राष्टÑवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ५६ पक्षांच्या आघाडीमार्फत सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’ लढवित आहे, मात्र त्यांनी उमेदवारी काँग्रेस नेते विशाल पाटील यांना दिली आहे. काँग्रेसमधील त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवून ही उमेदवारी दिली गेल्याने, काँग्रेसअंतर्गत गटबाजीचा सामना त्यांनाही करावा लागणार आहे. राष्टÑवादीच्या मदतीबद्दलही साशंकता व्यक्त होत आहे.दुसरीकडे भाजपअंतर्गत गटबाजीही अजून शांत झालेली नाही. संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीविरोधात आमदार व पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. मुंबईत वाद मिटल्याचे सांगून आता सर्व नेते एकत्र फिरत असले तरी, कार्यकर्त्यांत अजूनही गटबाजी कायम आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना गटबाजीचा सामनाही करावा लागण्याची चिन्हे आहेत.नाराजी दूर करण्याची धडपडकाँग्रेस नेते विशाल पाटील आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील या दोन्ही उमेदवारांनी सुरुवातीच्या टप्प्यात पक्षांतर्गत नाराजी संपविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. नाराज नेत्यांशी संवाद साधून वातावरण सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात त्यांना कितपत यश मिळणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.