शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

सांगली : जिल्ह्यातील सिंचन योजनांची १३० कोटींची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:19 IST

सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन उपसा योजनांची १३० कोटी ५० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. बिल भरले नसल्यामुळे पाटबंधारे विभागाने आवर्तन सुरू केलेले नाही.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात महावितरणची ६६ कोटींची थकबाकी सिंचन योजनांचे पैसे भरले तरच पाणी देण्याची प्रशासनाची भूमिका

अशोक डोंबाळे 

सांगली : जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन उपसा योजनांची १३० कोटी ५० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. बिल भरले नसल्यामुळे पाटबंधारे विभागाने आवर्तन सुरू केलेले नाही.

शिवाय महावितरणची थकबाकी ६६ कोटी ४३ लाखांवर पोहोचली आहे. ती भरल्याशिवाय योजनांचा वीजपुरवठा सुरू करण्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे योजनांचे आवर्तन अडचणीत सापडले आहे.टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांमुळे खानापूर, कडेगाव, तासगाव, मिरज पूर्व, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळाले आहे. तेथील जमीन ओलिताखाली आली. बागायती क्षेत्रातही वाढ झाली आहे.

२००२ पासून योजनांना प्रत्यक्षात सुरुवात झाली. योजना सुरू झाल्या तरी, दुष्काळाची दाहकता कायम होती. दुष्काळी परिस्थिती असल्याने सिंचन योजनांची बिले टंचाईच्या निधीतून भरण्यात येत होती. त्यामुळे पाच ते सात वर्षे पाणीपट्टी अथवा वीज बिलाची समस्या निर्माण झाली नव्हती.मागील दोन वर्षापासून चांगला पाऊस होत असल्याने पाणीटंचाई दूर झाली आहे. त्यामुळे टंचाई जाहीर होण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. गतवर्षी शासन आणि पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याची विनंती केली होती.

शेतकऱ्यांनीही पाणी वेळेत मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन ती भरण्यास सहमती दर्शविली. मात्र पाणीपट्टी आणि वीजबिल यांचा ताळमेळ घालताना पाटबंधारे विभागाच्या नाकीनऊ येत आहे.

तिन्ही योजनांची १३० कोटी ५० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. टेंभू योजनेची ३५ कोटी ६९ लाख, ताकारीची ४६ कोटी ६३ लाख, तर म्हैसाळ योजनेची ४८ कोटी १५ लाख रुपये पाणीपट्टी थकीत आहे. मध्यंतरी शासनाकडून पाणीपट्टीची थकबाकी रद्द करण्याचा विचार सुरू होता. त्यामुळे पाणीपट्टी भरली नाही.

थकीत पाणी आणि वीज बिलामुळे तिन्ही सिंचन योजना १५ आॅक्टोबरपासून बंद आहेत. आॅक्टोबरमध्ये चांगला पाऊस झाल्याने पाण्याची गरज भासली नाही. मागील आठ दिवसांपासून थंडीच्या कडाक्याबरोबर दिवसा उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतीला पाण्याची गरज निर्माण झाली आहे.

तिन्ही सिंचन योजनांचे ६६ कोटी ४३ लाखांचे वीजबिल थकित आहे. टेंभू योजना २१ कोटी ५७ लाख, म्हैसाळ ३४ कोटी ४९ लाख, तर ताकारी योजनेचे वीजबिल १० कोटी ३७ लाख रुपये थकित आहे.

पाणी योजना दोन महिन्यांपासून बंद असून, तात्काळ आवर्तन सुरु करण्यासाठी २० कोटी रुपयांची गरज आहे. टेंभू आणि म्हैसाळसाठी प्रत्येकी ८ कोटी, तर ताकारीसाठी ४ कोटी भरावे लागणार आहेत.

थकबाकी भरल्याशिवाय वीज मिळणार नसल्याचा पवित्रा महावितरण कंपनीने घेतला आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ पाणीपट्टी भरावी, असे आवाहन ताकारीचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी केले आहे.

ताकारी आणि टेंभू योजनेच्या टंचाई काळात सोडलेल्या आवर्तनाचा टंचाई निधी शासनाकडे अडकला आहे. टेंभू आणि ताकारीचा टंचाई निधी तात्काळ निधी देण्यात यावा, याबाबतची मागणी शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी अर्थ विभागाकडे केली आहे. त्याबाबतचा निर्णयही दोन दिवसात होण्याची शक्यता असल्याचे आ. बाबर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पैसे भरल्याशिवाय पाणी मिळणार नसल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.कपातीचे पैसे : पाटबंधारेकडे कधी?सिंचन योजनांच्या कार्यक्षेत्रातील साखर कारखानदारांनी पाटबंधारेच्या पाणीपट्टीची कपात ऊस बिलातून केली आहे. काही कारखान्यांनी कपात केलेली रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरली आहे.

उर्वरित कारखान्यांनी अद्यापही पैसे भरले नसल्यामुळे थकबाकीचा डोंगर वाढला आहे. शेतकऱ्यांची कपात केलेली रक्कम साखर कारखानदार पाटबंधारे विभागाकडे कधी भरणार आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.सिंचन योजनांची थकबाकी (कोटीत)योजना                          पाणीपट्टी                                वीजबिलटेंभू                                  ३५.६९                                     २१.५७ताकारी                            ४६.६३                                     १०.३७म्हैसाळ                           ४८.१५                                      ३४.४९एकूण                             १३०.६६                                 ६६.४३

टॅग्स :SangliसांगलीJalyukt Shivarजलयुक्त शिवारmahavitaranमहावितरण