शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : जिल्हा बँक संचालकांत अस्वस्थता, नोकरभरती : शासनाच्या नियंत्रणामुळे अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:03 IST

पुणे, सातारा, नाशिक याठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकरभरतीतील गैरव्यवहारप्रकरणी राज्य शासनाने भरती रद्द केल्याच्या घटनेनंतर सांगली जिल्हा मध्यवर्तीच्या संभाव्य भरती प्रक्रियेवर शासनाच्या दबावाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेसाठी आग्रही असलेल्या काही संचालकांमधील अस्वस्थता वाढली आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्हा बँक संचालकांत अस्वस्थता, नोकरभरती शासनाच्या नियंत्रणामुळे येणार अनेक अडचणी

सांगली : पुणे, सातारा, नाशिक याठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकरभरतीतील गैरव्यवहारप्रकरणी राज्य शासनाने भरती रद्द केल्याच्या घटनेनंतर सांगली जिल्हा मध्यवर्तीच्या संभाव्य भरती प्रक्रियेवर शासनाच्या दबावाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेसाठी आग्रही असलेल्या काही संचालकांमधील अस्वस्थता वाढली आहे.जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला सहकार विभागाने मंजुरी दिली आहे. बँकेत सध्या ९८७ कर्मचारी कार्यरत असून, ४५५ पदे रिक्त आहेत. भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात २५ तांत्रिक पदांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थेला प्राधान्य देण्याची भूमिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी यापूर्वीच मांडली आहे. त्यानुसार आयबीपीएस, सीपॅक, एनआयबीईआर, व्हॅनिक्रॉम या चार संस्थांना बॅँकेने पत्र पाठविले होते. यापैकी आयबीपीएस, सीपॅक, एनआयबीईआर या तीन संस्थांनी प्रक्रिया राबविण्याची तयारी दर्शविली आहे. एका संस्थेमार्फत भरतीप्रक्रिया राबवावी लागेल. त्याबाबतची चाचपणी आता सुरू आहे.एकीकडे पारदर्शीपणाचा अट्टाहास अध्यक्षांनी धरला असतानाच, काही संचालकांनी याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. वशिलेबाजीचा नारळ काही संचालकांनी यापूर्वीच फोडला आहे. प्रत्यक्षात अशा वशिलेबाजीकडे दुर्लक्ष करीत भरती प्रक्रिया जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी चालविला आहे.

मांडलेल्या भूमिकेच्या विपरित प्रक्रिया राबविण्याची त्यांची मानसिकता नाही. दुसरीकडे परंपरागत भरती प्रक्रियेला सरावलेल्या काही संचालकांना या भूमिका पटत नसल्याचे चित्र आहे. संचालक मंडळाला आता तीन वर्षाचा काळ पूर्ण होत आहे. अशा परिस्थितीत भरती प्रक्रिया सर्वात महत्त्वाची वाटत आहे.

दुसरीकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर शासनाची वक्रदृष्टी पूर्वीपासून स्पष्ट झाली असल्याने, त्यांचाही दबाव आहे. प्रक्रियेविषयीएक तक्रार आली तरी शासन ही प्रक्रिया रद्द करू शकते. त्यामुळेच संचालकांमधील अस्वस्थता वाढली आहे.

भरती प्रक्रियेतील संशयाला हत्यार बनवून जिल्हा बँकेवर वार करण्याची संधी सत्ताधारी भाजपला मिळू शकते. या सर्व गोष्टींची कल्पना जिल्हा बँक अध्यक्षांना आल्याने, त्यांनी प्रक्रियेतील दिरंगाईला प्राधान्यक्रम दिल्याचे दिसते. 

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक