शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सांगली वाहतूक पोलिसांच्या कॅमेऱ्याचा डोळा रिक्षा वाहतुकीवर

By संतोष भिसे | Updated: October 29, 2022 18:16 IST

नेमक्या याचवेळी वाहतूक पोलीस कॅमेरा घेऊन सरसावतात. छायाचित्र टिपून ई-चलन तयार करतात.

सांगली : गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिक्षावर वाहतूक पोलीसांच्या ई-चलन कॅमेऱ्याने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे व्यवसाय करणे मुश्किल झाले असून इ-चलन कारवाईतून वगळण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे.यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यात म्हंटले आहे की, रिक्षा चालकाला प्रवाशांच्या मर्जीप्रमाणे व्यवसाय करावा लागतो. प्रवासी हात दाखवेल, तेथे थांबावे लागते. सांगेल तेथे उतरवावे लागते. प्रवाशांमध्ये वयोवृद्ध, महिला व लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना चढ-उतार करण्यास अधिक वेळ लागतो. सामानासह लवकर उतरता येत नाही. नेमक्या याचवेळी वाहतूक पोलीस कॅमेरा घेऊन सरसावतात. छायाचित्र टिपून ई-चलन तयार करतात. रिक्षाचालक रात्री घरी जाण्यापूर्वीच मोबाईलवर कारवाईचा मेसेज आलेला असतो.     निवेदनात म्हंटले आहे की, मागेल त्याला रिक्षा परवाना धोरणामुळे रिक्षांची संख्या अतोनात वाढली आहे. रस्त्यावर प्रवासी कमी आणि रिक्षा जास्त  अशी स्थिती आहे. व्यवसायाच्या अपेक्षेने आपसात अनेकदा हाणामाऱ्याही होतात. अशावेळीही वाहतूक पोलीसांच्या कारवाईचा सामना करावा लागतो. मिरजेत तर खड्ड्यांमुळे रिक्षा कोठे थांबवावी असा प्रश्न पडतो. चांगल्या ठिकाणी थांबवावी, तर वाहतूक पोलीसाची भिती असते. दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची जेमतेम कमाई आणि दंडापोटी ५०० ते १००० रुपयांचा भुर्दंड अशी स्थिती आहे. त्यामुळे ई-चलनाच्या कारवाईतून रिक्षाचालकांना वगळावे.निवेदन देण्यासाठी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे राज्य अध्यक्ष महेश चौगुले, राजू रसाळ, तुषार मोहिते, प्रकाश चव्हाण, संतोष ठोंबरे, सुखदेव कोळी, रफिक खतीब, बाबासाहेब चव्हाण, अमीन मुल्ला, रफिक जमादार, महेश सातवेकर, मारुती सरगर, जावेद पटवेगार, सलीम मलिदवाले, भिमाण्णा यादवाडे आदी उपस्थित होते.सर्वाधिक फोटो रिक्षाचेमहापालिका क्षेत्रात ई-चलनासाठी सर्वाधिक छायाचित्रे रिक्षांचीच काढल्याचा दावा रिक्षा संघटनांनी पोलीस अधीक्षक व वाहतूक शाखेच्या बैठकीत केला. यासंदर्भात अधीक्षकांनी जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत संघटनेच्या उपस्थितीतच चर्चा केली.

टॅग्स :Sangliसांगलीtraffic policeवाहतूक पोलीस