शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सांगली :  जमीन अधिग्रहणाविरोधात महसूलमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:06 IST

रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता जमिन अधिग्रहीत केल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

ठळक मुद्देजमीन अधिग्रहणाविरोधात महसूलमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनउमेश देशमुख यांचा इशारा , सांगली ते कोल्हापूर शेतकरी दिंडीचेही आयोजन

सांगली : रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता जमिन अधिग्रहीत केल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सांगली ते कोल्हापूर शेतकरी दिंडीने जात मंगळवार दि. ११ पासून कोल्हापूरातील महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.देशमुख म्हणाले, रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण सुरू आहे. अधिग्रहण करत असताना शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार केलेला नाही. प्रशासनाने प्रसिध्दीमाध्यमातून जमीन अधिग्रहण केल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यावर कार्यवाही झालेली नाही.यासह देवस्थान इनाम वर्ग ३ची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचेही काही प्रश्न प्रलंबीत आहेत. या दोन्ही प्रश्नावर सोमवार दि. १० डिसेंबर रोजी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून पायी दिंडीस प्रारंभ होणार आहे.रात्री अतिग्रे येथे मुक्काम करून ११ डिसेंबर रोजी दिंडी कोल्हापूरात पोहचून महसूल मंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार भूमीअधिग्रहण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, सांगली-कोल्हापूर राज्यमार्गाचे अधिग्रहण झाल्याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचे अधिग्रहण करू नये, अधिग्रहीत जमिनीवरील घरे, झाडे, विहिरी, बोअरवेल्स या सर्वांची बाजारभावाच्या पाचपटीने मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून जाहीर करावे, महामार्गाचा झालेला चूकीचा सर्व्हे मान्य नसल्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व्हे करावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी दिगंबर कांबळे, गुलाब मुलाणी यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.देवस्थान इनाम जमिनींचेही प्रश्नदेवस्थान इनाम वर्ग ३ ची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून समस्या कायम आहेत. ही जमीन कसणाऱ्यांच्या नावावर झाली पाहिजे या मागणीसह इतर प्रश्नांची सोडवणूक करावी अशीही मागणी करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्गSangliसांगली