शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Gudhi padwa 2018 सांगली : अशा तयार होतात साखरमाळा, यंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 13:59 IST

गुढी पाडवा आणि साखरेच्या माळांचे दृढ नाते आधुनिक युगातही त्यातील धाग्यांइतकेच मजबुत आहे. याच साखरमाळांच्या उत्पादकांना यंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे साखरेचे दर गतवर्षापेक्षा कमी झाल्यानेही माळांच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. 

ठळक मुद्देअशा तयार होतात साखरमाळायंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासासाखरेपेक्षा शुद्ध असतात साखरमाळा

सांगली : गुढी पाडवा आणि साखरेच्या माळांचे दृढ नाते आधुनिक युगातही त्यातील धाग्यांइतकेच मजबुत आहे. याच साखरमाळांच्या उत्पादकांना यंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे साखरेचे दर गतवर्षापेक्षा कमी झाल्यानेही माळांच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. साखरमाळांच्या गोडव्याशिवाय मराठी नववर्षाची गुढी उभारली जात नाही. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा आजही अबाधित आहे. सांगलीच्या खणभाग तिवारी गल्लीतील जाधव बंधुंची साखरमाळा उत्पादनाची जवळपास ९0 वर्षाहून अधिक काळाची परंपरा आहे. सांगलीत असे काही मोजकेच परंपरागत साखरमाळा उत्पादक आहेत.

महाशिवरात्री संपली की लगेच दोन दिवसांनी साखरमाळा उत्पादनास सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हे काम संपते. यंदा बाजारात साखरमाळांना मोठी मागणी आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. साखरमाळांचे सध्याचे दर किलोला ८0 ते १२0 रुपये किलो असा आहे. मोठ्या माळांचा दर १00 ते २00 रुपये इतका आहे. 

होलसेल बाजारात सध्या साखरमाळांचा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याची माहिती येथील उत्पादक सरस्वती जाधव यांनी दिली. एका घरात आता तीन ते चार साखरमाळा लागतात. एक गुढीला, एक देव्हाऱ्यात आणि एक कुलदैवताला किंवा ग्रामदैवताला दिली जाते. सांगलीच्या बाजारात गेली आठवडाभर साखरमाळा दाखल झाल्या आहेत. अशा तयार होतात साखरमाळासुरुवातीला साखर स्वच्छ केली जाते. त्यासाठी दुधाचाही वापर केला जातो. शुद्ध स्वरुपातील साखरेचा पाक तयार करून त्यात खायचा नैसर्गिक रंग वापरला जातो. हा पाक गरम करून तो साच्यांमध्ये एका पळीद्वारे पद्धतशीरपणे ओतला जातो.

साच्यांमध्ये दोऱ्या अगोदरच घातल्या जातात. त्यानंतर पाच ते सहा साचे एकत्रीत बांधले जातात. पाण्याचा वापर करून ते सुखवले जातात. साचे उघडून त्यातील दोऱ्यांच्या सहाय्याने साखरमाळा अलगद काढून त्या टांगल्या जातात. साखरेपेक्षा शुद्ध असतात साखरमाळासाखरेचे पुन्हा शुद्धिकरण करण्याची प्रक्रिया माळा तयार करताना होते. पुन्हा ते गरम केले जाते. त्यामुळे जेव्हा साखरेपेक्षाही शुद्ध स्वरुप या माळांना प्राप्त होत असते. बऱ्याचदा घरात शिल्लक राहिलेल्या माळांचा चहासाठीही उपयोग केला जातो. तासाला तीनशे माळासाखरमाळा अत्यंत गतीने तयार केल्या जातात. एका तासात जवळपास ३00 माळा तयार होतात. दिवसभरातील आठ तास साखरमाळांच्या उत्पादनाचे काम चालते. म्हणजेच दिवसभरात अडिच हजार माळा तयार होतात.

टॅग्स :Gudhi padwa 2018गुढीपाडवा 2018Sangliसांगली