शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Sangli: चुकीचे काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवितो, जयंत पाटील यांचं विधान

By अविनाश कोळी | Updated: June 23, 2024 19:07 IST

Sangli News: संपूर्ण राज्यात जिल्हा बँकेचे काम आदर्शवत सुरू आहे. विरोधक राजकारण म्हणून बँकेविषयी टीका व वल्गना करीत असतात. आम्ही येथे चुकीची कामे होऊ देत नाही. तसा प्रयत्न कुणी केला, तर बाहेरचा रस्ता दाखविला जातो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

- अविनाश कोळी सांगली - संपूर्ण राज्यात जिल्हा बँकेचे काम आदर्शवत सुरू आहे. विरोधक राजकारण म्हणून बँकेविषयी टीका व वल्गना करीत असतात. आम्ही येथे चुकीची कामे होऊ देत नाही. तसा प्रयत्न कुणी केला, तर बाहेरचा रस्ता दाखविला जातो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिराळा विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्री पाटील, चिमण डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले की, मध्यवर्ती बँकांचे कामकाज नियम व कायद्यातून चालवले पाहिजे. या बँकांचा उपयोग रेटारेटी, तसेच राजकारणावर प्रभाव पाडण्यासाठी होता कामा नये. सांगली जिल्हा बँकेने केलेली प्रगती आदर्शवत असून अभिमान वाटावी असे आहे. जिल्हा बँक ही सामान्यांच्या विकासाचे साधन असल्याने ती चांगल्या रीतीने चालवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शिराळा येथील इमारत म्हणजे बँकेचे अस्तित्व किती प्रभावी आहे, हे दाखविणारी आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक प्रगतिपथावर आहे. ठेवीमध्ये मोठ्या वाढीबरोबर बऱ्याच वर्षांनी या बँकेचा एनपीए एकच्या आत आला आहे.

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. फक्त बँकेचा फायदा न पाहता शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देण्याचे काम, तसेच त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. सांगली जिल्हा बँक राज्यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. संचालक मंडळ, शेतकरी, सभासद, कर्मचारी यांच्या चांगल्या कामामुळे दोन वर्षांत एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीत वाढ झाली आहे, असे सांगितले.

यावेळी महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, वैभव शिंदे, अनिता सगरे, बाळासाहेब पाटील, वैभव शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, बी.एस. पाटील, पृथ्वीराज पाटील, अनिता सगरे, दत्तात्रय पाटील, विजय पाटील, विश्वास पाटील, बाळासाहेब नायकवडी, संभाजी गायकवाड, तानाजी पाटील, सुरेश पाटील, सरव्यवस्थापक सतीश सावंत, मोहीत चौगुले, संजय खराडे उपस्थित होते. सरव्यवस्थापक सुधीर काटे यांनी आभार मानले. म्हणूनच बँकेवर विश्वास : विश्वजीत कदमविश्वजीत कदम म्हणाले, बँक ही कोणत्या पक्षाची नसावी. शेतकरी सभासदांची असावी. असे पक्षविरहित काम पाहूनच या बँकेवर शेतकरी, सभासदांनी विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. आर्थिक संस्था चालविताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मोठी कर्जे देताना काळजी घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगली