शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

Sangli: चुकीचे काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवितो, जयंत पाटील यांचं विधान

By अविनाश कोळी | Updated: June 23, 2024 19:07 IST

Sangli News: संपूर्ण राज्यात जिल्हा बँकेचे काम आदर्शवत सुरू आहे. विरोधक राजकारण म्हणून बँकेविषयी टीका व वल्गना करीत असतात. आम्ही येथे चुकीची कामे होऊ देत नाही. तसा प्रयत्न कुणी केला, तर बाहेरचा रस्ता दाखविला जातो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

- अविनाश कोळी सांगली - संपूर्ण राज्यात जिल्हा बँकेचे काम आदर्शवत सुरू आहे. विरोधक राजकारण म्हणून बँकेविषयी टीका व वल्गना करीत असतात. आम्ही येथे चुकीची कामे होऊ देत नाही. तसा प्रयत्न कुणी केला, तर बाहेरचा रस्ता दाखविला जातो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिराळा विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्री पाटील, चिमण डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले की, मध्यवर्ती बँकांचे कामकाज नियम व कायद्यातून चालवले पाहिजे. या बँकांचा उपयोग रेटारेटी, तसेच राजकारणावर प्रभाव पाडण्यासाठी होता कामा नये. सांगली जिल्हा बँकेने केलेली प्रगती आदर्शवत असून अभिमान वाटावी असे आहे. जिल्हा बँक ही सामान्यांच्या विकासाचे साधन असल्याने ती चांगल्या रीतीने चालवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शिराळा येथील इमारत म्हणजे बँकेचे अस्तित्व किती प्रभावी आहे, हे दाखविणारी आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक प्रगतिपथावर आहे. ठेवीमध्ये मोठ्या वाढीबरोबर बऱ्याच वर्षांनी या बँकेचा एनपीए एकच्या आत आला आहे.

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. फक्त बँकेचा फायदा न पाहता शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देण्याचे काम, तसेच त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. सांगली जिल्हा बँक राज्यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. संचालक मंडळ, शेतकरी, सभासद, कर्मचारी यांच्या चांगल्या कामामुळे दोन वर्षांत एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीत वाढ झाली आहे, असे सांगितले.

यावेळी महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, वैभव शिंदे, अनिता सगरे, बाळासाहेब पाटील, वैभव शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, बी.एस. पाटील, पृथ्वीराज पाटील, अनिता सगरे, दत्तात्रय पाटील, विजय पाटील, विश्वास पाटील, बाळासाहेब नायकवडी, संभाजी गायकवाड, तानाजी पाटील, सुरेश पाटील, सरव्यवस्थापक सतीश सावंत, मोहीत चौगुले, संजय खराडे उपस्थित होते. सरव्यवस्थापक सुधीर काटे यांनी आभार मानले. म्हणूनच बँकेवर विश्वास : विश्वजीत कदमविश्वजीत कदम म्हणाले, बँक ही कोणत्या पक्षाची नसावी. शेतकरी सभासदांची असावी. असे पक्षविरहित काम पाहूनच या बँकेवर शेतकरी, सभासदांनी विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. आर्थिक संस्था चालविताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मोठी कर्जे देताना काळजी घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगली