शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

बाप चोरणाऱ्या टोळ्यांचा महाराष्ट्रात धुडगूस : राजन गवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 11:52 IST

भारत संकल्पना संपली : सांगलीत ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे यांचा पंचाहत्तरीनिमित्त सन्मान

सांगली : बाप चोरणाऱ्या टोळ्यांचा महाराष्ट्रात धुडगूस सुरू आहे. भारत ही संकल्पना संपली आहे. अशा स्थितीत गौतमीपुत्र कांबळे यांच्यासारख्या पणत्या जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केले.महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या चळवळीतील ज्येष्ठ कृतिशील विचारवंत, साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा पंचाहत्तरीनिमित्त रविवारी सांगलीत सपत्नीक सन्मान झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गवस बोलत होते. उद्योगपती सी. आर. सांगलीकर, आमदार अरुण लाड, विजया कांबळे, भरत शेळके, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, व्ही. वाय. पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.डॉ. गवस म्हणाले, समाजावरील निष्ठेने काम करणारी माणसे कमी होत आहेत. अविचाराने वागणारे, कोणतीही विचारसरणी नसणारे लोक वाढत आहेत. थापा मारणारी, सत्याला असत्य मानणारी टोळी उच्च पदांवर बसली आहे. सध्याचा काळ संशयाचा, सुमारांचा आहे. चांगले लोक वळचणीला पडले आहेत. लुटारूंच्या टोळ्या आपल्याला जेरबंद करायला टपल्या आहेत. अशा वेळी गौतमीपुत्र यांच्यासारख्या पहारेकऱ्याची गरज आहे. अशा पणत्या जपणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे.

राजकारणी, धर्मांध आणि भांडवलदारांची युती तोडासत्काराला उत्तर देताना प्रा. कांबळे म्हणाले, हिंसेपेक्षा तिचे समर्थन घातक असते. पुढील अनेक हिंसांचा तो परवाना असतो. जगभरात धार्मिक युद्धाने थैमान मांडले आहे. भविष्यात सांस्कृतिक मुद्यांवर युद्धे होतील. सगळे धर्म संपले तरी संस्कृती शिल्लक राहील. सगळ्या धर्मांनी आपापली संस्कृती वाटून घेतली आहे.

राजकीय, धार्मिक आणि भांडवलदारांच्या युतीने सर्वसामान्यांच्या आयुष्याची वाट लावली आहे. ही युती आपण तोडली पाहिजे. त्यांचे दुबळे मुद्दे शोधून वार केले पाहिजेत. अराजकता वाढत असली, तरी तिचे स्वागत केले पाहिजे. कारण त्यानंतर समता येते. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, संविधान आपल्याकडे आहे. त्यामुळे जगाकडून उसने काही घेण्याची गरज नाही.

टॅग्स :Sangliसांगली