शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

बाप चोरणाऱ्या टोळ्यांचा महाराष्ट्रात धुडगूस : राजन गवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 11:52 IST

भारत संकल्पना संपली : सांगलीत ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे यांचा पंचाहत्तरीनिमित्त सन्मान

सांगली : बाप चोरणाऱ्या टोळ्यांचा महाराष्ट्रात धुडगूस सुरू आहे. भारत ही संकल्पना संपली आहे. अशा स्थितीत गौतमीपुत्र कांबळे यांच्यासारख्या पणत्या जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केले.महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या चळवळीतील ज्येष्ठ कृतिशील विचारवंत, साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा पंचाहत्तरीनिमित्त रविवारी सांगलीत सपत्नीक सन्मान झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गवस बोलत होते. उद्योगपती सी. आर. सांगलीकर, आमदार अरुण लाड, विजया कांबळे, भरत शेळके, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, व्ही. वाय. पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.डॉ. गवस म्हणाले, समाजावरील निष्ठेने काम करणारी माणसे कमी होत आहेत. अविचाराने वागणारे, कोणतीही विचारसरणी नसणारे लोक वाढत आहेत. थापा मारणारी, सत्याला असत्य मानणारी टोळी उच्च पदांवर बसली आहे. सध्याचा काळ संशयाचा, सुमारांचा आहे. चांगले लोक वळचणीला पडले आहेत. लुटारूंच्या टोळ्या आपल्याला जेरबंद करायला टपल्या आहेत. अशा वेळी गौतमीपुत्र यांच्यासारख्या पहारेकऱ्याची गरज आहे. अशा पणत्या जपणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे.

राजकारणी, धर्मांध आणि भांडवलदारांची युती तोडासत्काराला उत्तर देताना प्रा. कांबळे म्हणाले, हिंसेपेक्षा तिचे समर्थन घातक असते. पुढील अनेक हिंसांचा तो परवाना असतो. जगभरात धार्मिक युद्धाने थैमान मांडले आहे. भविष्यात सांस्कृतिक मुद्यांवर युद्धे होतील. सगळे धर्म संपले तरी संस्कृती शिल्लक राहील. सगळ्या धर्मांनी आपापली संस्कृती वाटून घेतली आहे.

राजकीय, धार्मिक आणि भांडवलदारांच्या युतीने सर्वसामान्यांच्या आयुष्याची वाट लावली आहे. ही युती आपण तोडली पाहिजे. त्यांचे दुबळे मुद्दे शोधून वार केले पाहिजेत. अराजकता वाढत असली, तरी तिचे स्वागत केले पाहिजे. कारण त्यानंतर समता येते. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, संविधान आपल्याकडे आहे. त्यामुळे जगाकडून उसने काही घेण्याची गरज नाही.

टॅग्स :Sangliसांगली