शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

बाप चोरणाऱ्या टोळ्यांचा महाराष्ट्रात धुडगूस : राजन गवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 11:52 IST

भारत संकल्पना संपली : सांगलीत ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे यांचा पंचाहत्तरीनिमित्त सन्मान

सांगली : बाप चोरणाऱ्या टोळ्यांचा महाराष्ट्रात धुडगूस सुरू आहे. भारत ही संकल्पना संपली आहे. अशा स्थितीत गौतमीपुत्र कांबळे यांच्यासारख्या पणत्या जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केले.महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या चळवळीतील ज्येष्ठ कृतिशील विचारवंत, साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा पंचाहत्तरीनिमित्त रविवारी सांगलीत सपत्नीक सन्मान झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गवस बोलत होते. उद्योगपती सी. आर. सांगलीकर, आमदार अरुण लाड, विजया कांबळे, भरत शेळके, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, व्ही. वाय. पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.डॉ. गवस म्हणाले, समाजावरील निष्ठेने काम करणारी माणसे कमी होत आहेत. अविचाराने वागणारे, कोणतीही विचारसरणी नसणारे लोक वाढत आहेत. थापा मारणारी, सत्याला असत्य मानणारी टोळी उच्च पदांवर बसली आहे. सध्याचा काळ संशयाचा, सुमारांचा आहे. चांगले लोक वळचणीला पडले आहेत. लुटारूंच्या टोळ्या आपल्याला जेरबंद करायला टपल्या आहेत. अशा वेळी गौतमीपुत्र यांच्यासारख्या पहारेकऱ्याची गरज आहे. अशा पणत्या जपणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे.

राजकारणी, धर्मांध आणि भांडवलदारांची युती तोडासत्काराला उत्तर देताना प्रा. कांबळे म्हणाले, हिंसेपेक्षा तिचे समर्थन घातक असते. पुढील अनेक हिंसांचा तो परवाना असतो. जगभरात धार्मिक युद्धाने थैमान मांडले आहे. भविष्यात सांस्कृतिक मुद्यांवर युद्धे होतील. सगळे धर्म संपले तरी संस्कृती शिल्लक राहील. सगळ्या धर्मांनी आपापली संस्कृती वाटून घेतली आहे.

राजकीय, धार्मिक आणि भांडवलदारांच्या युतीने सर्वसामान्यांच्या आयुष्याची वाट लावली आहे. ही युती आपण तोडली पाहिजे. त्यांचे दुबळे मुद्दे शोधून वार केले पाहिजेत. अराजकता वाढत असली, तरी तिचे स्वागत केले पाहिजे. कारण त्यानंतर समता येते. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, संविधान आपल्याकडे आहे. त्यामुळे जगाकडून उसने काही घेण्याची गरज नाही.

टॅग्स :Sangliसांगली