शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सांगली:आरवडेत ‘हुसेनवाला डे’च्या आठवणींना उजाळा : १९६५च्या भारत-पाकिस्तान युध्दातील शौर्यगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 20:15 IST

आरवडे (ता. तासगाव) येथे भारतीय लष्करातील सेकंड मराठा काली पांचवीच्या बहादूर आजी-माजी सैनिकांनी मोठ्या जल्लोषात ‘हुसेनवाला डे’ साजरा केला. यावेळी या तुकडीच्या सदस्यांनी जुन्या वैभवशाली आठवणींना उजाळा दिला.

ठळक मुद्देमाजी सैनिकांची उपस्थिती -भारत आणि पाकिस्तान यांच्यात २१ सप्टेंबर १९६५ रोजी लढाई मांजर्डे न्यूज : आरवडे (ता. तासगाव) येथे ‘हुसेनवाला डे’च्या कार्यक्रमात कर्नल शिवाजी बाबर यांनी आठवणी मांडल्या. यावेळी विविध जिल्ह्यातील माजी सैनिक उपस्थित होते.

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथे भारतीय लष्करातील सेकंड मराठा काली पांचवीच्या बहादूर आजी-माजी सैनिकांनी मोठ्या जल्लोषात ‘हुसेनवाला डे’ साजरा केला. यावेळी या तुकडीच्या सदस्यांनी जुन्या वैभवशाली आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल शिवाजी बाबर होते, तर कर्नल एन. डी. जानकर प्रमुख पाहुणे होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २१ सप्टेंबर १९६५ रोजी लढाई झाली होती. या युद्धात सेकंड मराठा काली पांचवी या सेनेच्या तुकडीने अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानच्या सैन्याला पंजाब गुरुदासपूर येथील हुसेनवाला गावात येण्यापासून रोखून परत पाठवले. भारत सरकारने तुकडीच्या या शौर्याची दखल देऊन गौरव केला. त्यामुळे या तुकडीतील आजी, माजी सैनिक ‘हुसेनवाला डे’ साजरा करतात. सांगली जिल्'ात आरवडे येथे पहिल्यांदाच हा विजय दिवस साजरा करण्यात आला

ब्रिटिश काळात सेकंड मराठा बटालियनची स्थापना झाली. यावर्षी आॅगस्टमध्ये या बटालियनला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. या बटालियनला शौर्याचा इतिहास आहे. १९६५ च्या युद्धात कर्नल टी. टी. नोलन यांच्या नेतृत्वाखाली या तुकडीने हुसेनवाला गावात तीन हजार सैनिकांना सळो की पळो करून सोडले होते. या भारतीय सेनादलच्या तुकडीत फक्त आठशे सैनिक होते. या तुकडीच्या पराक्रमामुळे पाक सैन्याला भारतात पाय ठेवता आला नाही. पण या मोहिमेत भारतीय सैन्यदलाचे कर्नल नोलन व ११ सैनिक शहीद झाले. भारत सरकारने या पराक्रमाची दखल घेत या तुकडीला मानाचे पारितोषिक देऊन गौरविले. त्यामुळे हा दिवस हुसेनवला विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन कॅप्टन लक्ष्मण चव्हाण व कॅप्टन रामहरी राडे यांनी केले. यावेळी कॅप्टन प्रताप शिंदे, कॅप्टन महादेव कदम, कॅप्टन शिवाजी जाधव, कॅप्टन बाबासाहेब माने, कॅप्टन प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी जिल्'ातील ३०० हून अधिक माजी सैनिक कुटुंबियांसह उपस्थित होते.अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रूतब्बल ३० ते ४० वर्षांनंतर काही निवृत्त सैनिकांची भेट झाली. एकमेकांना अलिंगन देताना त्यांना गहिवरून आले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले होते. काही निवृत्त सैनिकांची दुसरी व तिसरी पिढीही सैन्य दलात दाखल झाली आहे. अनेकांनी भारतीय सेवेत असताना १९६२ च्या चीन युद्धातील, तर १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील, तसेच १९९९ च्या कारगिल युद्धातील थरारक प्रसंग सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात बाहेर गावाहून आलेल्या माजी सैनिकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.