शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

सांगली : आमची लायकी कधीच सिद्ध झालीय : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:36 IST

आमची व अन्य भाजप नेत्यांची लायकी जनतेने कधीच मतदानातून सिद्ध केली आहे. भविष्यातील निवडणुकीतही ती सिद्ध होईल. त्यामुळे गोपिचंद पडळकर यांनी केलेले आरोप अदखलपात्र आहेत, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआमची लायकी कधीच सिद्ध झालीय : संजयकाका पाटीलगोपिचंद पडळकरांचे आरोप अदखलपात्र

सांगली : आमची व अन्य भाजप नेत्यांची लायकी जनतेने कधीच मतदानातून सिद्ध केली आहे. भविष्यातील निवडणुकीतही ती सिद्ध होईल. त्यामुळे गोपिचंद पडळकर यांनी केलेले आरोप अदखलपात्र आहेत, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी भाजपमध्ये एकही नेता लायकीचा नसल्याची टीका केली होती. त्याबद्दल संजयकाका पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यात चार आमदार, एक खासदार, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका अशा प्रत्येकठिकाणी जनतेने आम्हाला सत्तेवर बसवून आमची लायची सिद्ध केली आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीतही पुन्हा जनता आमची लायकी सिद्ध करणार आहे. त्यामुळे जनताच प्रत्येकाची लायकी ठरवित असते, ती कोणी नेत्याने ठरवायची नसते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, आरोप-प्रत्यारोप करीत बसू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. त्यानुसार आम्ही फक्त जनतेच्या हिताची विकासकामे करतो. विकासकामे करताना कधीही मी राजकारण आणलेले नाही. त्यामुळे जनतेचे माझ्यावरील प्रेम आजही कायम आहे.

राज्याचे दिग्गज नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत मला देशात उच्चांकी मतांनी निवडून आणण्याचा संकल्प करीत माझ्या कर्तृत्वाची पक्षातूनही पोहोचपावती दिली आहे. मी लोकसभा निवडणूक लढणार आहे, हे यातून स्पष्टच आहे. काँग्रेसकडून आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी ते लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले आहे. अजून कोणी विरोधक ठरलेला नाही. या गोष्टी जेव्हा निश्चित होतील तेव्हा याबाबत जास्त सविस्तर बोलता येईल.पडळकर यांची नाराजी नेमकी कशामुळे आहे, हे मला माहित नाही. ते माहिती करून घेण्याची गरज नाही. त्यांनी नक्कीच गैरसमज करून घेतला आहे. तो दूर करणे आमचे काम नाही, कारण गैरसमज ज्याचे त्याने दूर करायचे असतात. मला विक्रमी मतांनी निवडून आणण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे ते नाराज झालेत, की माझे सर्व पक्षात मित्र आहेत, म्हणून नाराज झालेत, याची कोणतीही कल्पना नाही.

मला अनेक राष्टÑवादी, काँग्रेस नेत्यांनी गत लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे त्यांच्या ऋणात राहून जनहिताच्या कामांत मदत करावी लागते. त्यातून जर कोणी दुखावले असेल, तर त्याला नाईलाज आहे. जेव्हा त्यांचे हे गैरसमज दूर होतील, तेव्हा खुप उशिर झालेला असेल. अर्थात त्यांनी पक्षाशीच संबंध नाही म्हटल्यावर त्यांची दखल घेण्याची किंवा गैरसमज दूर करण्याची गरजच नाही.वैयक्तिक वाद कोणाशीही नाही!माझे वैचारिक मतभेद कोणाशीही असू शकतात, पण वैयक्तिक वाद कोणाशीही नाही. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये मी कधीही आ. सुमनताई पाटील यांच्या विकासकामांच्या आड आलो नाही. त्यांनीही तसे राजकारण कधी माझ्याबरोबर केले नाही. अजितराव घोरपडे यांच्याशीही कधीही वैयक्तिक वादाचा विषय आला नाही, असे संजयकाका पाटील म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली