शहरं
Join us  
Trending Stories
1
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
4
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
5
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
6
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
7
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
10
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
11
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
12
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
13
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
14
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
15
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
16
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू

सांगली : दगडफेकप्रकरणी आजी-माजी नगरसेवकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:23 IST

मिरजेतील महापालिका कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी २0 आजी-माजी नगरसेवकांना म्हणणे मांडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सुधार समितीचे मिरज शहराध्यक्ष तानाजी रुईकर यांनी दाखल केलेले अपिल न्यायालयाने स्वीकारले असून २८ फेब्रुवारीस पुढील सुनावणी होणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देदगडफेकप्रकरणी आजी-माजी नगरसेवकांना नोटीसउच्च न्यायालयात अपिल : २८ फेब्रुवारीस म्हणणे मांडण्याचे आदेश

सांगली : मिरजेतील महापालिका कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी २0 आजी-माजी नगरसेवकांना म्हणणे मांडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सुधार समितीचे मिरज शहराध्यक्ष तानाजी रुईकर यांनी दाखल केलेले अपिल न्यायालयाने स्वीकारले असून २८ फेब्रुवारीस पुढील सुनावणी होणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.शिंदे म्हणाले की, महापालिकेच्या मिरज येथील कार्यालयावर १ नोव्हेंबर २00७ रोजी जमावबंदी असताना रिक्षाचालकांच्या प्रश्नावर काढलेल्या मोर्चावेळी दगडफेक व अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा प्रकार घडला होता. या मोर्चात सर्वच पक्षाचे नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन मिरजेच्या न्यायालयात याविषयीची सुनावणी झाली होती.

२८ एप्रिल २0११ रोजी तत्कालिन मिरज न्यायालयाचे न्यायाधीश दुर्गाप्रसाद देशपांडे यांनी साक्षी-पुरावे ग्राह्य धरत संबंधित आरोपींना २ महिने ते १ वर्षे अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्या होत्या. त्यामुळे आजी-माजी नगरसेवक अडचणीत आले होते. यातील अनेकांची नगरसेवक पदे रद्द होण्याबरोबर महापालिकेतील उमेदवारी अर्जही अवैध ठरले होते.या निकालास शिक्षा लागलेल्यांमधील काहींनी स्वतंत्रपणे सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन २ मे २0१८ रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी तपासातील काही उणीवा दर्शवित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती, मात्र त्यांनी त्यांच्या निकालात जमाव जमल्याचे, दगडफेकीची घटना घडल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच नागरिक म्हणून मिरजेचे शहर सुधार समितीचे तानाजी रुईकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

दुर्गाप्रसाद देशपांडे यांनी दिलेला निकाल कायम करावा, अशी मागणी केली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी हे अपिल दाखल करून घेत संबंधित सर्व आरोपींना म्हणणे मांडण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. येत्या २८ फेब्रुवारीस याविषयी सुनावणी होणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.शिंदे म्हणाले की, सरकारी पक्षातर्फे अपिल दाखल होणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक आरोपींना या प्रकरणातून वाचविण्यासाठी अपिल दाखल केले नाही. तपासातील उणीवाही जाणीवपूर्वक ठेवल्या आहेत. महापालिकेचे नुकसान म्हणजे जनतेच्या कररुपी पैशाचे नुकसान आहे. त्यामुळेच आम्ही नागरिक म्हणून कर्तव्य बजावत आहोत. महापालिका व सरकार मात्र मौन बाळगुन आहे.दिग्गजांचा समावेशशिंदे म्हणाले की, याप्रकरणात ज्यांच्यावर आरोप आहेत त्यामध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान, इद्रिस नायकवडी, महादेव कुरणे, आनंदा देवमाने, सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, संभाजी मेंढे, विराज कोकणे, समित कदम, हिजुरहेमान जमादार, सुफी भोकरे, यासीन खतीब, नरुद्दीन मुल्ला, अल्ताफ मुल्ला, मुबारक खतीब, महेश चौगुले, अल्ताफ खताळ, इलियास शेख आदींचा समावेश आहे. यातील मैनुद्दीन बागवान व आनंदा देवमाने हे विद्यमान नगरसेवक आहेत, तर अन्य लोकांमधील बरेचशे माजी नगरसेवक आहेत. २२ जणांच्या यादीतील तीघे मृत आहेत.

मुख्यमंत्र्यांना आवाहन!शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार पारदर्शी व स्वच्छ कारभाराची उदाहरणे देत असतात. वास्तविक त्यांच्याच कालावधित सरकारपक्षाने सरकारी मालमत्तेच्या नुकसानप्रकरणात अपिल दाखल केले नाही. अजूनही त्यांनी स्वच्छ कारभारापोटी याप्रकरणी अपिल दाखल करावे, असे आम्ही आवाहन करीत आहोत. त्यांनी ते केले नाही तर स्वच्छ कारभाराविषयी बोलणे बंद करावे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली