शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सांगली महापालिकेचे स्वप्न होतं झकास, पण कारभाऱ्यांनीच केलं भकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:51 IST

गेल्या पंचवीस वर्षांत महापालिकेला साधा शेरीनाला अडविता आलेला नाही

सांगली : सांगली व्यापाराचे, मिरज वैद्यकीय, तर कुपवाड औद्योगिक विकासाचे केंद्र आहे. हे तीन शहरे एकत्र आले तर राज्यातील एक आदर्श महापालिका होईल, ही भावना होती. महापालिकेचे स्वप्न वाईट नव्हते, परंतु स्वप्न राबविणारे चांगले भेटले नाहीत. पंचवीस वर्षांत गोड काहीच सांगण्यासारखे नाही, कारभाऱ्यांनी शहराची वाट लावली, अशा शब्दात महापालिका स्थापनेत पुढाकार घेतलेले तत्कालीन ग्रामविकास तथा पालकमंत्री आण्णासाहेब डांगे यांनी हल्ला चढविला.महापालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त डांगे यांनी कारभार आणि कारभाऱ्यावर घणाघात केला. ते ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले की, महापालिकेच्या स्थापनेपासून ना रस्ते सुधारले, ना शुद्ध पाणी देता आले. साधा शेरीनाला अडविता आला नाही. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला नोटीस बजाविली होती. मी शेरीनाल्यासाठी योजना आखली. काळीखण बंदिस्त करून सांडपाणी तिथे आणून त्यात गोडे पाणी मिसळून ते शेतीला द्यायचे, असा विचार होता. त्याचे काय केले?गजानना, तुझी कृष्णा मैली!गेल्या पंचवीस वर्षांत महापालिकेला साधा शेरीनाला अडविता आलेला नाही. युतीच्या काळात शेरीनाल्याचे पाणी काळ्या खणीत आणून त्यावर प्रक्रिया करण्याची योजना आखली होती. हे पाणी शहरालगतच्या गावांतील शेतींना देण्यात येणार होते; पण महापालिकेने तसा प्रकल्पच तयार केला नाही. प्रस्ताव दिला असता तर तेव्हाच शेरीनाल्याचा प्रश्न निकाली निघाला असता. आता शेरीनाल्याचे पाणी नदीपात्रात जात आहेत. ‘गजानना, तुझी कृष्णा मैली’च राहिली आहे, अशी टीकाही डांगे यांनी केली.तीनही शहरे मनाने जुळलीच नाहीततीनही शहरे मनाने एक झाली नाहीत. नागरी ऐक्य घडविण्यात अपयश आले आहे. सांगली, मिरज आपले मानून दिशा देणारे कोणीच नाही. परिणामी शहरातील लोकांना हायफाय जीवन जगण्याची संधी हिरावली गेली.पाण्यावर केवळ चर्चाचआजपर्यंतचा कारभार आंबट, गोड आहे. गोड काहीच सांगण्यासारखे आहे. पिण्याच्या पाण्यावर केवळ चर्चाच होते. स्वत:चे प्रशस्त कार्यालयही उभारता आलेले नाही. अंतर्गत रस्त्यांचा विस्तार केला नाही. शंभर फुटी रस्त्याची काय अवस्था आहे. आज तो मुख्य रस्ता व्हायला हवा होता.कोल्हापूर शहराचा विकास झालाच ना!कोल्हापूरचा विकास झाला, पण सांगली महापालिकेचा झाला नाही. कोणत्याही महापालिकेशी तुलना केली तरी सांगली मागेच राहिली आहे, अशी टीकाही केली.संभाजी पवार, मदनभाऊ, प्रकाशबापूंनी काय केले?डांगे म्हणाले, दिवंगत संभाजी पवार, मदनभाऊ पाटील, प्रकाशबापू पाटील यांनी काय केले? वसंतदादा पाटील यांची पुण्याई वापरून त्यांच्याकडून या तिन्ही शहराचा विकास अपेक्षित होता. शासकीय योजना खेचून आणून त्या प्रशासनावर थोपविण्याची गरज होती. महापालिका क्षेत्राच्या अशा सर्वांगीण विकासाचे हे स्वप्न अपुरेच राहिले आहे. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण