शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

सांगली महापालिकेचे स्वप्न होतं झकास, पण कारभाऱ्यांनीच केलं भकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:51 IST

गेल्या पंचवीस वर्षांत महापालिकेला साधा शेरीनाला अडविता आलेला नाही

सांगली : सांगली व्यापाराचे, मिरज वैद्यकीय, तर कुपवाड औद्योगिक विकासाचे केंद्र आहे. हे तीन शहरे एकत्र आले तर राज्यातील एक आदर्श महापालिका होईल, ही भावना होती. महापालिकेचे स्वप्न वाईट नव्हते, परंतु स्वप्न राबविणारे चांगले भेटले नाहीत. पंचवीस वर्षांत गोड काहीच सांगण्यासारखे नाही, कारभाऱ्यांनी शहराची वाट लावली, अशा शब्दात महापालिका स्थापनेत पुढाकार घेतलेले तत्कालीन ग्रामविकास तथा पालकमंत्री आण्णासाहेब डांगे यांनी हल्ला चढविला.महापालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त डांगे यांनी कारभार आणि कारभाऱ्यावर घणाघात केला. ते ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले की, महापालिकेच्या स्थापनेपासून ना रस्ते सुधारले, ना शुद्ध पाणी देता आले. साधा शेरीनाला अडविता आला नाही. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला नोटीस बजाविली होती. मी शेरीनाल्यासाठी योजना आखली. काळीखण बंदिस्त करून सांडपाणी तिथे आणून त्यात गोडे पाणी मिसळून ते शेतीला द्यायचे, असा विचार होता. त्याचे काय केले?गजानना, तुझी कृष्णा मैली!गेल्या पंचवीस वर्षांत महापालिकेला साधा शेरीनाला अडविता आलेला नाही. युतीच्या काळात शेरीनाल्याचे पाणी काळ्या खणीत आणून त्यावर प्रक्रिया करण्याची योजना आखली होती. हे पाणी शहरालगतच्या गावांतील शेतींना देण्यात येणार होते; पण महापालिकेने तसा प्रकल्पच तयार केला नाही. प्रस्ताव दिला असता तर तेव्हाच शेरीनाल्याचा प्रश्न निकाली निघाला असता. आता शेरीनाल्याचे पाणी नदीपात्रात जात आहेत. ‘गजानना, तुझी कृष्णा मैली’च राहिली आहे, अशी टीकाही डांगे यांनी केली.तीनही शहरे मनाने जुळलीच नाहीततीनही शहरे मनाने एक झाली नाहीत. नागरी ऐक्य घडविण्यात अपयश आले आहे. सांगली, मिरज आपले मानून दिशा देणारे कोणीच नाही. परिणामी शहरातील लोकांना हायफाय जीवन जगण्याची संधी हिरावली गेली.पाण्यावर केवळ चर्चाचआजपर्यंतचा कारभार आंबट, गोड आहे. गोड काहीच सांगण्यासारखे आहे. पिण्याच्या पाण्यावर केवळ चर्चाच होते. स्वत:चे प्रशस्त कार्यालयही उभारता आलेले नाही. अंतर्गत रस्त्यांचा विस्तार केला नाही. शंभर फुटी रस्त्याची काय अवस्था आहे. आज तो मुख्य रस्ता व्हायला हवा होता.कोल्हापूर शहराचा विकास झालाच ना!कोल्हापूरचा विकास झाला, पण सांगली महापालिकेचा झाला नाही. कोणत्याही महापालिकेशी तुलना केली तरी सांगली मागेच राहिली आहे, अशी टीकाही केली.संभाजी पवार, मदनभाऊ, प्रकाशबापूंनी काय केले?डांगे म्हणाले, दिवंगत संभाजी पवार, मदनभाऊ पाटील, प्रकाशबापू पाटील यांनी काय केले? वसंतदादा पाटील यांची पुण्याई वापरून त्यांच्याकडून या तिन्ही शहराचा विकास अपेक्षित होता. शासकीय योजना खेचून आणून त्या प्रशासनावर थोपविण्याची गरज होती. महापालिका क्षेत्राच्या अशा सर्वांगीण विकासाचे हे स्वप्न अपुरेच राहिले आहे. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण