शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईपेक्षा सांगली, मिरजेची पाणीपट्टी जास्त

By admin | Updated: September 5, 2015 23:33 IST

आयुक्तांना निवेदन : पिंपरी-चिंचवड, कोल्हापूरचाही दर कमी

सांगली : पाणीदराबाबत संपूर्ण राज्यात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकाच महागडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईचा प्रति हजार लिटरचा दर ४ रुपये ७५ पैसे असताना सांगलीचा दर आठ रुपये प्रति हजार लिटर आहे. त्यामुळे मीटरप्रमाणे बिलवसुली करण्यापूर्वी पाण्याचे दर कमी करण्याबाबतचे निवेदन शनिवारी मदनभाऊ युवामंचच्यावतीने आयुक्त अजिज कारचे यांना देण्यात आले. पाणी खासगीकरणासाठी सत्ताधारी काँग्रेस सरसावली असतानाच काँग्रेसचाच एक घटक असलेल्या मदनभाऊ युवामंचने खासगीकरणालाच विरोध दर्शविला आहे. या धोरणातील त्रुटींवरच त्यांनी बोट ठेवले आहे. युवामंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या पाणीदराची कागदपत्रे गोळा करून आयुक्तांकडे सादर केली आहेत. राज्यात कोणत्याही महापालिकेचा दर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेएवढा नाही. याठिकाणचा दर सर्वाधिक असल्यामुळे मीटर सुरू करून पाणीआकारणी चालू झाली तर लोकांना प्रतिमाह ५०० रुपयांपर्यंत पाणीपट्टी येऊ शकते. त्यामुळे या दराने पाणीपट्टी परवडणारी नाही. याशिवाय महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा व नगरसेवकांचा हस्तक्षेप यामुळे पाणीपट्टी वसुली समाधानकारक होत नाही, असे मत युवामंचने मांडले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंगिकारलेली खासगीकरणाची पद्धत अन्य कोणत्याही महापालिकेने स्वीकारली नाही. त्यामुळे ही एक आदर्श व चांगली पद्धत आहे, असे म्हणता येत नाही. तसेच महापालिकेने गेल्या दहा वर्षात ज्या गोष्टी खासगी यंत्रणेमार्फत केल्या आहेत, त्या यशस्वी झालेल्या नाहीत. याऊलट अशा माध्यमातून महापालिकेचे नुकसानच झाले आहे. एचसीएल कंपनी, चोवीस तास पाणीपुरवठा, झोपडपट्टी सर्वेक्षण, सेंट्रल लाईट सर्व्हे, शेल्टर, दलाल अशा अनेक माध्यमातून महापालिकेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा महसूल वाढला पाहिजे. पाणीगळती रोखून जादा पाणीवापर करणाऱ्यांवर अंकुश ठेवावाच लागेल. मात्र, या गोष्टी करताना प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होता कामा नये. मीटरप्रमाणे पाणी आकारणीस कोणाचाही विरोध नाही. मात्र त्यापूर्वी अन्य महापालिकांच्या पाणीदराचा विचार करून आपला पाणीदर कमी करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. (प्रतिनिधी)