शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

सांगली, मिरजकरांनो! पाणी जपून वापरायला हवे..!

By admin | Updated: October 30, 2015 23:09 IST

मोहीम राबविण्याची वेळ : शहरांमध्ये होत आहे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय; दररोज हजारो लिटर पाणी गटारीत--जागतिक काटकसर दिन

शरद जाधव - सांगली--पाचहून अधिक तालुक्यात ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी टॅँकरची संख्या वाढत जाते... पाण्याअभावी जनावरांची तडफड होते... केवळ जमिनीलाच नव्हे, तर काळजालाच चिरा पाडणारा दुष्काळ मानगुटीवर बसला असताना जिल्ह्यातील एका भागाला मात्र याची जाणीव नसते... गाडी धुण्यासाठी तासभर पाणी सुरू असते... सार्वजनिक नळ सुरू असतात. मग प्रश्न पडतो की, तीव्र पाणी टंचाई शहरात अनुभवास आली तर?... ती येऊ नये म्हणूनच पाण्याची नासाडी थांबवून ते काटकसरीने वापरावे लागेल...‘जागतिक काटकसर दिन’ शुक्रवारी साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एका भागात होणारी पाण्याची बेसुमार नासाडी आणि त्याचवेळी दुसऱ्या भागात घागरभर पाण्यासाठी होणारी मैलो न् मैल भटकंती नक्कीच विचार करायला लावणारी आहे.दिवसेंदिवस पाण्याचे स्रोत कमी होत असताना पाणी वाचविण्यासाठी मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या अनिर्बंध वापरासाठी शासकीय धोरणेही कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात दरडोई ४० लिटर पाण्याची व्यवस्था होते; तर शहरात ८० लिटरपर्यंत मर्यादा वाढते. मोठ्या शहरात हीच मर्यादा १२० लिटरपेक्षा जादा असल्याने पाण्याचा सर्वच ठिकाणी एकच वापर असताना मर्यादेमुळे पाण्याचा वारेमाप वापर होतो. बाटलीबंद पाण्याची किंमत आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्याची बिले पाहिली की पाण्याचे महत्त्व दिसून येईल. आता केवळ सामाजिक पातळीवर नव्हे, तर व्यक्तिगत पातळीवरही पाणी वाचविण्याची चळवळ प्रभावीपणे राबविण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा वापर जबाबदारीने आणि मौल्यवान वस्तूप्रमाणे करावा. - डॉ. रवींद्र व्होरा, पर्यावरणतज्ज्ञया गोष्टी कधी थांबणार?एका घरात किमान पाच अंतर्गत नळजोडण्या म्हटल्या तरी, त्यांच्यातून होणारी थेंब थेंब गळतीही पाणी नासाडीला आमंत्रणच देते. वर्षभरात केवळ शंभर ते दीडशे रुपयांचा देखभाल खर्च केला तरी ती थांबू शकते. केवळ दुर्लक्ष केल्याने पाण्याचे नळ दिवस-दिवसभर सुरू राहतात. हॉटेलमध्ये दिलेले पाणी गरजेपुरते न घेता ग्लास भरून पाणी घेतले जाते व घोटभर पिऊन उरलेले पाणी फेकून दिले जाते. एक-दोन महिन्यापूर्वी पॅकिंग केलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर वारेमाप खर्च करणारी व्यक्ती, घरात मात्र दररोज नव्याने नळाला आलेले पाणी भरायला प्राधान्य देते. उरलेले पाणी शिळे झाले म्हणून गटारीत ओतले जाते. सार्वजनिक नळांवर दिवसभर नळ सुरू असतात. नळाखाली लावलेले भांडे कित्येक तास भरून वाहत असते. शहरात होत आहे पाण्याची नासाडीशहरातील दिनचर्येचा विचार केला तर, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे पाण्याची मोठी नासाडी होते. अपार्टमेंटसह इमारतीमधील पाण्याची टाकी भरण्यासाठी रात्री सुरू केलेली मोटार सकाळपर्यंत सुरूच असते. रात्रीत हजारो लिटर चांगले पाणी केवळ योग्यवेळी मोटार बंद न केल्याने गटारीत मिसळते. शहरात दुचाकी व चारचाकी गाड्या धुण्यासाठीही अमर्याद पाण्याचा वापर होतो. केवळ एका बादलीभर पाण्यात स्वच्छ होणारी मोटारसायकल धुण्यासाठी तासतासभर पाण्याचा फवारा विनाकारण सुरू ठेवला जातो.