शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरजकरांनो! पाणी जपून वापरायला हवे..!

By admin | Updated: October 30, 2015 23:09 IST

मोहीम राबविण्याची वेळ : शहरांमध्ये होत आहे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय; दररोज हजारो लिटर पाणी गटारीत--जागतिक काटकसर दिन

शरद जाधव - सांगली--पाचहून अधिक तालुक्यात ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी टॅँकरची संख्या वाढत जाते... पाण्याअभावी जनावरांची तडफड होते... केवळ जमिनीलाच नव्हे, तर काळजालाच चिरा पाडणारा दुष्काळ मानगुटीवर बसला असताना जिल्ह्यातील एका भागाला मात्र याची जाणीव नसते... गाडी धुण्यासाठी तासभर पाणी सुरू असते... सार्वजनिक नळ सुरू असतात. मग प्रश्न पडतो की, तीव्र पाणी टंचाई शहरात अनुभवास आली तर?... ती येऊ नये म्हणूनच पाण्याची नासाडी थांबवून ते काटकसरीने वापरावे लागेल...‘जागतिक काटकसर दिन’ शुक्रवारी साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एका भागात होणारी पाण्याची बेसुमार नासाडी आणि त्याचवेळी दुसऱ्या भागात घागरभर पाण्यासाठी होणारी मैलो न् मैल भटकंती नक्कीच विचार करायला लावणारी आहे.दिवसेंदिवस पाण्याचे स्रोत कमी होत असताना पाणी वाचविण्यासाठी मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या अनिर्बंध वापरासाठी शासकीय धोरणेही कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात दरडोई ४० लिटर पाण्याची व्यवस्था होते; तर शहरात ८० लिटरपर्यंत मर्यादा वाढते. मोठ्या शहरात हीच मर्यादा १२० लिटरपेक्षा जादा असल्याने पाण्याचा सर्वच ठिकाणी एकच वापर असताना मर्यादेमुळे पाण्याचा वारेमाप वापर होतो. बाटलीबंद पाण्याची किंमत आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्याची बिले पाहिली की पाण्याचे महत्त्व दिसून येईल. आता केवळ सामाजिक पातळीवर नव्हे, तर व्यक्तिगत पातळीवरही पाणी वाचविण्याची चळवळ प्रभावीपणे राबविण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा वापर जबाबदारीने आणि मौल्यवान वस्तूप्रमाणे करावा. - डॉ. रवींद्र व्होरा, पर्यावरणतज्ज्ञया गोष्टी कधी थांबणार?एका घरात किमान पाच अंतर्गत नळजोडण्या म्हटल्या तरी, त्यांच्यातून होणारी थेंब थेंब गळतीही पाणी नासाडीला आमंत्रणच देते. वर्षभरात केवळ शंभर ते दीडशे रुपयांचा देखभाल खर्च केला तरी ती थांबू शकते. केवळ दुर्लक्ष केल्याने पाण्याचे नळ दिवस-दिवसभर सुरू राहतात. हॉटेलमध्ये दिलेले पाणी गरजेपुरते न घेता ग्लास भरून पाणी घेतले जाते व घोटभर पिऊन उरलेले पाणी फेकून दिले जाते. एक-दोन महिन्यापूर्वी पॅकिंग केलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर वारेमाप खर्च करणारी व्यक्ती, घरात मात्र दररोज नव्याने नळाला आलेले पाणी भरायला प्राधान्य देते. उरलेले पाणी शिळे झाले म्हणून गटारीत ओतले जाते. सार्वजनिक नळांवर दिवसभर नळ सुरू असतात. नळाखाली लावलेले भांडे कित्येक तास भरून वाहत असते. शहरात होत आहे पाण्याची नासाडीशहरातील दिनचर्येचा विचार केला तर, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे पाण्याची मोठी नासाडी होते. अपार्टमेंटसह इमारतीमधील पाण्याची टाकी भरण्यासाठी रात्री सुरू केलेली मोटार सकाळपर्यंत सुरूच असते. रात्रीत हजारो लिटर चांगले पाणी केवळ योग्यवेळी मोटार बंद न केल्याने गटारीत मिसळते. शहरात दुचाकी व चारचाकी गाड्या धुण्यासाठीही अमर्याद पाण्याचा वापर होतो. केवळ एका बादलीभर पाण्यात स्वच्छ होणारी मोटारसायकल धुण्यासाठी तासतासभर पाण्याचा फवारा विनाकारण सुरू ठेवला जातो.