शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

सांगली, मिरजकरांनो! पाणी जपून वापरायला हवे..!

By admin | Updated: October 30, 2015 23:09 IST

मोहीम राबविण्याची वेळ : शहरांमध्ये होत आहे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय; दररोज हजारो लिटर पाणी गटारीत--जागतिक काटकसर दिन

शरद जाधव - सांगली--पाचहून अधिक तालुक्यात ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी टॅँकरची संख्या वाढत जाते... पाण्याअभावी जनावरांची तडफड होते... केवळ जमिनीलाच नव्हे, तर काळजालाच चिरा पाडणारा दुष्काळ मानगुटीवर बसला असताना जिल्ह्यातील एका भागाला मात्र याची जाणीव नसते... गाडी धुण्यासाठी तासभर पाणी सुरू असते... सार्वजनिक नळ सुरू असतात. मग प्रश्न पडतो की, तीव्र पाणी टंचाई शहरात अनुभवास आली तर?... ती येऊ नये म्हणूनच पाण्याची नासाडी थांबवून ते काटकसरीने वापरावे लागेल...‘जागतिक काटकसर दिन’ शुक्रवारी साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एका भागात होणारी पाण्याची बेसुमार नासाडी आणि त्याचवेळी दुसऱ्या भागात घागरभर पाण्यासाठी होणारी मैलो न् मैल भटकंती नक्कीच विचार करायला लावणारी आहे.दिवसेंदिवस पाण्याचे स्रोत कमी होत असताना पाणी वाचविण्यासाठी मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या अनिर्बंध वापरासाठी शासकीय धोरणेही कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात दरडोई ४० लिटर पाण्याची व्यवस्था होते; तर शहरात ८० लिटरपर्यंत मर्यादा वाढते. मोठ्या शहरात हीच मर्यादा १२० लिटरपेक्षा जादा असल्याने पाण्याचा सर्वच ठिकाणी एकच वापर असताना मर्यादेमुळे पाण्याचा वारेमाप वापर होतो. बाटलीबंद पाण्याची किंमत आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्याची बिले पाहिली की पाण्याचे महत्त्व दिसून येईल. आता केवळ सामाजिक पातळीवर नव्हे, तर व्यक्तिगत पातळीवरही पाणी वाचविण्याची चळवळ प्रभावीपणे राबविण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा वापर जबाबदारीने आणि मौल्यवान वस्तूप्रमाणे करावा. - डॉ. रवींद्र व्होरा, पर्यावरणतज्ज्ञया गोष्टी कधी थांबणार?एका घरात किमान पाच अंतर्गत नळजोडण्या म्हटल्या तरी, त्यांच्यातून होणारी थेंब थेंब गळतीही पाणी नासाडीला आमंत्रणच देते. वर्षभरात केवळ शंभर ते दीडशे रुपयांचा देखभाल खर्च केला तरी ती थांबू शकते. केवळ दुर्लक्ष केल्याने पाण्याचे नळ दिवस-दिवसभर सुरू राहतात. हॉटेलमध्ये दिलेले पाणी गरजेपुरते न घेता ग्लास भरून पाणी घेतले जाते व घोटभर पिऊन उरलेले पाणी फेकून दिले जाते. एक-दोन महिन्यापूर्वी पॅकिंग केलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर वारेमाप खर्च करणारी व्यक्ती, घरात मात्र दररोज नव्याने नळाला आलेले पाणी भरायला प्राधान्य देते. उरलेले पाणी शिळे झाले म्हणून गटारीत ओतले जाते. सार्वजनिक नळांवर दिवसभर नळ सुरू असतात. नळाखाली लावलेले भांडे कित्येक तास भरून वाहत असते. शहरात होत आहे पाण्याची नासाडीशहरातील दिनचर्येचा विचार केला तर, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे पाण्याची मोठी नासाडी होते. अपार्टमेंटसह इमारतीमधील पाण्याची टाकी भरण्यासाठी रात्री सुरू केलेली मोटार सकाळपर्यंत सुरूच असते. रात्रीत हजारो लिटर चांगले पाणी केवळ योग्यवेळी मोटार बंद न केल्याने गटारीत मिसळते. शहरात दुचाकी व चारचाकी गाड्या धुण्यासाठीही अमर्याद पाण्याचा वापर होतो. केवळ एका बादलीभर पाण्यात स्वच्छ होणारी मोटारसायकल धुण्यासाठी तासतासभर पाण्याचा फवारा विनाकारण सुरू ठेवला जातो.