शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

सांगली-मिरज रस्ता दिसायला देखणा, पण असुरक्षित आणि जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:00 IST

Accident Sangli- सांगली महापालिका क्षेत्रातील एकमेव सुस्थितीत असणारा सांगली-मिरज रस्ता आता सुरक्षित राहिलेला नाही. सार्वजनिक बांधकामच्या बेफिकिरीमुळे ठिकठिकाणी अपघातांचे ब्लॅक स्पॉट निर्माण झालेत. अपघात टाळण्यासाठी पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे, पण त्यासाठी तीस-पस्तीस लाखांच्या निधीलाही हा विभाग महाग झाला आहे.

ठळक मुद्देसांगली-मिरज रस्ता दिसायला देखणा, पण असुरक्षित आणि जीवघेणापट्टे झाले गायब, गतिरोधकांवर अनेकांनी गमावले प्राण, पीडब्ल्युडीच्या बेफिकिरीचे बळी

सांगली : महापालिका क्षेत्रातील एकमेव सुस्थितीत असणारा सांगली-मिरज रस्ता आता सुरक्षित राहिलेला नाही. सार्वजनिक बांधकामच्या बेफिकिरीमुळे ठिकठिकाणी अपघातांचे ब्लॅक स्पॉट निर्माण झालेत. अपघात टाळण्यासाठी पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे, पण त्यासाठी तीस-पस्तीस लाखांच्या निधीलाही हा विभाग महाग झाला आहे.पीडब्ल्युडीच्या बेफिकिरीने वर्ष-सहा महिन्यांत अनेकांचे बळी गेलेत. अशास्त्रीय पद्धतीच्या गतिरोधकांमुळे हकनाक प्राण गमवावे लागलेत. पीडब्ल्युडीच्या अन्य रस्त्यांकडे फारसे कुणी बघत नाही, पण सांगली-मिरज रस्ता सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांना त्याचे गांभीर्य नसल्याचे जाणवते. रस्त्यावरील पांढरे पट्टे गायब झाले आहेत. नव्याने मारण्याचे कोणतेच नियोजन पीडब्ल्युडीकडे नाही. गेल्या पावसाळ्यानंतर रस्त्याचे घिरडे झाले होते, दुरुस्तीला तीन-चार महिने लागले, तोपर्यंत सांगली-मिरजकरांना वनवास सोसावा लागला.गतिरोधकांवर पट्टे नसल्याने सर्वाधिक अपघात होत आहेत. जीएसटी कार्यालय, सिद्धिविनायक रुग्णालय, कृपामाई रुग्णालय, भारती रुग्णालय, वानलेसवाडी, विजयनगर, पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समिती येथील गतिरोधक अत्यंत जीवघेणे आहेत. भारती रुग्णालयासमोरील गतिरोधकांना तर कोणताच शास्त्रीय ताळतंत्र नाही. गतिरोधकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते समितीची परवानगी लागते, पण सांगली-मिरज रस्त्यावर गतिरोधक बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना याची माहितीच नसावी असे दिसते.

सहा मार्गिकांचा हा रस्ता देखणा असला तरी तो आता सुरक्षित राहिलेला नाही. साईड पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक व सिग्नलजवळील पट्टे, दुभाजक पट्टे नसल्याने वाहतूक अस्ताव्यस्त सुरू आहे. पट्ट्यांसाठी सुमारे तीस ते पस्तीस लाखांची गरज आहे, पण तो उपलब्ध करण्याची मानसिकता सार्वजनिक बांधकामकडे नाही. आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून गांधी चौकापासून भारती रुग्णालयापर्यंत हायमास्ट दिवे बसविले, पण दुरुस्तीअभावी सर्वत्र अंधार पसरला आहे.द्विवार्षिक निधीच्या उधळपट्टीचे परिणामया रस्त्यासाठीचा द्विवार्षिक निधी एकाच वर्षात संपविल्याचे परिणाम आता दिसू लागलेत. देखभाल-दुरुस्तीसाठी निधीच नसल्याने नागरिकांचा वनवास सुरू झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली