शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सांगली, किर्लोस्करवाडीतून रेल्वेचे बोर्डिंग तिकीट देण्यास नकार; प्रवाशांमधून संताप 

By अविनाश कोळी | Updated: April 29, 2025 18:35 IST

नागरिक जागृती मंचकडून महाव्यवस्थापकांकडे तक्रार

सांगली : किर्लोस्करवाडी व सांगली स्थानकावर थांबा मंजूर असलेल्या गाड्यांची तिकिटे काढताना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अन्य स्थानकावरून बोर्डिंग तिकीट दिले जात असल्याचा प्रकार नागरिक जागृती मंचने उजेडात आणला. दोन्ही स्थानके नामशेष करण्याचा काही अधिकाऱ्यांचा हा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सांगली व किर्लोस्करवाडीत थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकिटे इतर रेल्वे स्टेशनच्या नावाने दिली जात आहेत. त्यामुळे या दोन्ही स्थानकांवरील तिकीट विक्री कमी दिसते. याचाच फायदा घेत येथील थांबे रद्द करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सांगली रेल्वे स्थानकावर चंडीगड ते नवी दिल्ली जाणाऱ्या यशवंतपूर-चंडीगड संपर्क क्रांतिची १२ जून नंतरची तिकीटे मुद्दामहून सांगलीऐवजी मिरज स्थानकाची घेण्याची अन्यायकारक सक्ती मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. जेणेकरून संपर्क क्रांतीचा सांगलीचा थांबा कमी तिकीट विक्री दाखवून रद्द करण्याचा डाव मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांचा आहे.किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर दिल्ली जाणाऱ्या वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसची १० जूननंतरची तिकीटे मुद्दामहून किर्लोस्करवाडीऐवजी मिरज किंवा कराड स्थानकाची घेण्याची सक्ती केली जात आहे. जेणेकरून या गाडीचा थांबा कमी तिकीट विक्री दाखवून रद्द करण्याचा डाव आहे.

नियम काय सांगतो?रेल्वे बोर्डाचा नियम आहे की, प्रवाशाने ज्या स्थानकाची आरक्षित तिकिटे मागितली आहेत, त्या स्थानकाची आरक्षित तिकिटे रेल्वे प्रशासनाने प्रवाशाला द्यावीत. पण, हा नियम धाब्यावर बसवून सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकावर त्याच स्टेशनची बोर्डिंग तिकीट प्रवाशांना दिली जात नाहीत, असेही निवेदनात म्हटले आहे.

आंदोलन करण्याचा इशाराकिर्लोस्करवाडीतून बोर्डिंगची तिकीट विक्री जर मध्य रेल्वेने सुरू केली नाही, तर सर्वपक्षीय समिती, तसेच सांगली व किर्लोस्करवाडी येथील प्रवासी संघटनांची बैठक बोलवून जनआंदोलनाची दिशा ठरवून, असा इशारा सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला आहे.

सहा महिन्यांत ११ हजार तिकिटे विक्रीगेल्या सहा महिन्यांत सुमारे ११ हजार आरक्षित व अनारक्षित तिकिटे घेऊन प्रवाशांनी सांगलीवरून संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये प्रवास केला आहे. गोवा एक्स्प्रेस गाडीत आरक्षित व अनआरक्षित मिळून सुमारे ३ हजारांच्या आसपास प्रवाशांनी किर्लोस्करवाडीवरून प्रवास केला आहे. ज्याच्यामुळे रेल्वे विभागाला अतिरिक्त कमाईसुद्धा झाली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारनागरिक जागृती मंचने मध्य रेल्वे मुंबईचे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना, तसेच मध्य रेल्वे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांना पत्र लिहिले असून सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकावरून तिकिटे नाकारली जात असल्याची तक्रार केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासी