शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सांगली, किर्लोस्करवाडीतून रेल्वेचे बोर्डिंग तिकीट देण्यास नकार; प्रवाशांमधून संताप 

By अविनाश कोळी | Updated: April 29, 2025 18:35 IST

नागरिक जागृती मंचकडून महाव्यवस्थापकांकडे तक्रार

सांगली : किर्लोस्करवाडी व सांगली स्थानकावर थांबा मंजूर असलेल्या गाड्यांची तिकिटे काढताना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अन्य स्थानकावरून बोर्डिंग तिकीट दिले जात असल्याचा प्रकार नागरिक जागृती मंचने उजेडात आणला. दोन्ही स्थानके नामशेष करण्याचा काही अधिकाऱ्यांचा हा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सांगली व किर्लोस्करवाडीत थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकिटे इतर रेल्वे स्टेशनच्या नावाने दिली जात आहेत. त्यामुळे या दोन्ही स्थानकांवरील तिकीट विक्री कमी दिसते. याचाच फायदा घेत येथील थांबे रद्द करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सांगली रेल्वे स्थानकावर चंडीगड ते नवी दिल्ली जाणाऱ्या यशवंतपूर-चंडीगड संपर्क क्रांतिची १२ जून नंतरची तिकीटे मुद्दामहून सांगलीऐवजी मिरज स्थानकाची घेण्याची अन्यायकारक सक्ती मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. जेणेकरून संपर्क क्रांतीचा सांगलीचा थांबा कमी तिकीट विक्री दाखवून रद्द करण्याचा डाव मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांचा आहे.किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर दिल्ली जाणाऱ्या वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसची १० जूननंतरची तिकीटे मुद्दामहून किर्लोस्करवाडीऐवजी मिरज किंवा कराड स्थानकाची घेण्याची सक्ती केली जात आहे. जेणेकरून या गाडीचा थांबा कमी तिकीट विक्री दाखवून रद्द करण्याचा डाव आहे.

नियम काय सांगतो?रेल्वे बोर्डाचा नियम आहे की, प्रवाशाने ज्या स्थानकाची आरक्षित तिकिटे मागितली आहेत, त्या स्थानकाची आरक्षित तिकिटे रेल्वे प्रशासनाने प्रवाशाला द्यावीत. पण, हा नियम धाब्यावर बसवून सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकावर त्याच स्टेशनची बोर्डिंग तिकीट प्रवाशांना दिली जात नाहीत, असेही निवेदनात म्हटले आहे.

आंदोलन करण्याचा इशाराकिर्लोस्करवाडीतून बोर्डिंगची तिकीट विक्री जर मध्य रेल्वेने सुरू केली नाही, तर सर्वपक्षीय समिती, तसेच सांगली व किर्लोस्करवाडी येथील प्रवासी संघटनांची बैठक बोलवून जनआंदोलनाची दिशा ठरवून, असा इशारा सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला आहे.

सहा महिन्यांत ११ हजार तिकिटे विक्रीगेल्या सहा महिन्यांत सुमारे ११ हजार आरक्षित व अनारक्षित तिकिटे घेऊन प्रवाशांनी सांगलीवरून संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये प्रवास केला आहे. गोवा एक्स्प्रेस गाडीत आरक्षित व अनआरक्षित मिळून सुमारे ३ हजारांच्या आसपास प्रवाशांनी किर्लोस्करवाडीवरून प्रवास केला आहे. ज्याच्यामुळे रेल्वे विभागाला अतिरिक्त कमाईसुद्धा झाली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारनागरिक जागृती मंचने मध्य रेल्वे मुंबईचे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना, तसेच मध्य रेल्वे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांना पत्र लिहिले असून सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकावरून तिकिटे नाकारली जात असल्याची तक्रार केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासी