शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसकडे १११, राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 17:29 IST

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात १११ ग्रामपंचायती आल्या असून, ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या भाजपला ग्रामीण जनतेने झिडकारल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागावर वर्चस्व कायम शिवसेनेची दमदार एन्ट्री, भाजपला ग्रामीण जनतेने झिडकारले

सांगली , दि. १७ :  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात १११ ग्रामपंचायती आल्या असून, ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या भाजपला ग्रामीण जनतेने झिडकारल्याचे चित्र आहे. केवळ ६२ ग्रामपंचायतींवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. खानापूर तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींपैकी २२ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवून दमदार एन्ट्री केली आहे.

राष्ट्रवादीने वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यातील गड राखण्यात यश मिळविले असले तरी, जत, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात निराशाजनक कामगिरी आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे आतापर्यंत जाहीर निकाल

 पक्षनिहाय मिळालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे

वाळवा : ५० ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी : ३७,भाजप आणि सदाभाऊ खोत आघाडी ६, काँग्रेस १, अन्य ६,

शिराळा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी १९, भाजप ७, कॉँग्रेस १,

कडेगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस ३१, भाजप १२,

पलूस तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस ११, भाजप ४, राष्ट्रवादी १,

तासगाव २६ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, राष्ट्रवादी १०,

जत तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, काँग्रेस ३३, राष्ट्रवादी २, अन्य १०,

कवठेमहांकाळ तालुक्यातील २७ पैकी भाजप ८, काँग्रेस ३, राष्ट्रवादी ४, शिवसेना १, अजितराव घोरपडे आघाडी ११,

खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस २४, शिवसेना २१, अन्य १०,

शिराळा तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, राष्ट्रवादी २२ आणि काँग्रेसला ८ जागा मिळाल्या आहेत.सांगली जिल्ह्यातील पक्षीय बलाबल

  1. काँग्रेस १११
  2. राष्ट्रवादी ७६
  3. भाजप ६२
  4. शिवसेना २२
  5. अन्य ३७
टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक