शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सांगली : मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये दहा दिवसात अग्निशमन केंद्र :जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:46 IST

मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्याबाबतच्या त्रुटी तीन दिवसात दूर झाल्या पाहिजेत. दहा दिवसांमध्ये तेथे अग्निशमन केंद्र सुरु झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वीज जोडणी, पाणी, रस्ते, वाहन व वाहनचालक या बाबींचीही तातडीने कार्यवाही करा, असे आदेश जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या सूचनाजिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत औद्योगिक वसाहतीतील सुविधांवर चर्चालक्ष्मी देऊळ ते कुपवाड एमआयडीसी रस्ता चौपदरीकरणाची मागणीकराबाबत कारवाई मागे घेण्याची मागणी

सांगली : मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्याबाबतच्या त्रुटी तीन दिवसात दूर झाल्या पाहिजेत. दहा दिवसांमध्ये तेथे अग्निशमन केंद्र सुरु झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वीज जोडणी, पाणी, रस्ते, वाहन व वाहनचालक या बाबींचीही तातडीने कार्यवाही करा, असे आदेश जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हा उद्योग मित्र बैठक काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, बैठकीस आयुक्त रवींद्र खेबूडकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, व्यवस्थापक पूजा कुलकर्णी यांच्यासह समितीचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.काळम-पाटील म्हणाले की, एमआयडीसीमध्ये रस्ते, पाणी, अग्निशमन केंद्र, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन गरजेचे आहे. संबंधित विभागांनी प्रलंबित कामांचा निपटारा करून, उद्योजकांना या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या मूलभूत सुविधांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, तर त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत.

मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र सुरु करण्याबाबत व्यापाऱ्याची मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अग्निशमन केंद्र सुरु करण्यासाठीच्या सर्व त्रुटी तात्काळ दूर करून दहा दिवसात ते सुरू करा.बैठकीत औद्योगिक वसाहतीमध्ये बिअर शॉपीला परवानगीबाबत, एमआयडीसी कुपवाडमधील परिवहन विभागाचे टेस्ट ड्राईव्ह ट्रॅक बंद करण्याबाबत, उद्योगांतून होणाऱ्या प्रदूषणाबाबत, एमआयडीमधील एलबीटी वसुली, वीजखांब, वाहिनी, रोहित्रे या सुविधांसाठी ग्राहकांकडून खर्च परतावा मिळण्याबाबतचे प्रश्न समितीमधील सदस्यांनी उपस्थित केले. या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.त्यावर काळम-पाटील म्हणाले की, बेकायदेशीर कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. महावितरणबाबतच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. उद्योजकांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारून व्यवसाय करावेत. प्रदूषणामुळे त्रास होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. जे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.अंतर्गत रस्ते, ड्रेनेजची व गटारींची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था राखून भुरट्या चोरांवर कडक कारवाई आदी मागण्या करण्यात आल्या. मिरज एमआयडीसी क्षेत्रातील कचरा उचलण्याची व्यवस्था, रस्त्यावर गतिरोधक, खोक्यांचे अतिक्रमण याबाबत चर्चा झाली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांनी स्वागत केले.वृक्षारोपणाचे प्लॉट छोट्या उद्योगांना द्याकुपवाड एमआयडीसीमधील वृक्षारोपणासाठी दिलेले खुले प्लॉट परत घेऊन ते छोट्या उद्योजकांना देण्याबाबतची मागणी उद्योजक व काही समिती सदस्यांनी केली. त्यानुसार पाहणी करून ते प्लॉट ताब्यात घेऊन कायदेशीर पूर्तता करून छोट्या उद्योजकांना देण्यात येतील. शासनाकडून त्याबाबत परवानगी मागितली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी दिले.रस्ता चौपदरीकरणाची मागणीऔद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना कच्चा माल आणताना आणि वसाहतीमधून मशिनरी पाठविताना अरुंद रस्त्याची अडचण येत आहे. त्यामुळे लक्ष्मी देऊळ ते कुपवाड एमआयडीसीकडे जाणारा रस्ता चौपदरीकरणाची मागणी काही उद्योजकांनी केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी करुन रुंदीकरणाबाबत अहवाल घेऊ आणि शासनाकडे खास बाब म्हणून पाठवून चौपदरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.कराबाबत कारवाई मागे घेण्याची मागणीकर कायद्यांतर्गत काही उद्योजकांना नोटिसा दिल्या असून त्याला त्वरित स्थगिती मिळावी. तसेच कराची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी उद्योजकांनी केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी, शासकीय कर भरावाच लागेल. यामध्ये सवलत देण्याचा अधिकार आमच्या पातळीवर नाही. शासनाकडे त्याबाबत कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीSangliसांगली