शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

सांगली :  राजू शेट्टींकडून शेतकऱ्यांची फसवणूक; संजय कोले यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:29 IST

कायद्यानेच १४ दिवसात एफआरपी देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना पंधरा दिवस आंदोलन करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांबरोबर एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना सहकार आघाडीचे व प्रचारप्रमुख संजय कोले यांनी सांगलीत सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्दे राजू शेट्टींकडून शेतकऱ्यांची फसवणूक; संजय कोले यांचा आरोपगुजरात पॅटर्नसाठी राज्यभर आंदोलन करणार

सांगली : कायद्यानेच १४ दिवसात एफआरपी देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना पंधरा दिवस आंदोलन करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांबरोबर एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना सहकार आघाडीचे व प्रचारप्रमुख संजय कोले यांनी सांगलीत सोमवारी पत्रकार परिषदेत केली. गुजरात पॅटर्न राबविण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी शासनाचा ऊस नियंत्रण आदेश १९६६ हा कायदा आधीपासूनच अस्तित्वात आहे. कायद्यानेच सर्वच कारखानदारांनी ऊस गळितास गेल्यानंतर १४ दिवसांमध्ये एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली पाहिजे. एफआरपी दिली नाही, तर कायद्याने हा गुन्हा असून कारवाईस कारखाना व्यवस्थापन पात्र आहे. असे असतानाही शेट्टी यांनी पंधरा दिवस आंदोलन करुन कारखानदारांशी एफआरपी एकरकमी देण्याचा तोडगा काढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान झाले आहे.

शासनाने हंगाम वीस दिवस आधी सुरू करण्यास परवानगी दिली होती. कारण राज्यातली दुष्काळी परिस्थिती, कमी पडणारे पाणी, हुमणी, कमी होणारा उतारा याचा विचार करून हा निर्णय घेतला होता. मात्र आता वीस दिवस हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांपुढील या समस्या वाढलेल्या आहेत. तसेच सध्याचे साखरेचे दर लक्षात घेता, शेतकऱ्यांच्या पदरात एफआरपी पडेलच याची खात्रीही देता येत नाही. कारण, साखरेचे चालू बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून त्यावर बँका ८५ ते ९० टक्के उचल देतात.

बँकांकडील उचल व उपपदार्थांतून मिळणारी रक्कम यामधून तोडणी, वाहतूक, गाळप खर्च वजा जाता, एफआरपी देण्यासाठी प्रति टनाला ४०० ते ५०० रुपये कमी पडतात. याच मुद्यावर कारखानदारांनी शॉर्ट मार्जिनचे कारण देऊन कारखाने बंद ठेवले होते. मग आता वीस दिवसात असे काय झाले, की कारखान्यांचे हे शॉर्ट मार्जिन भरून निघाले!कारखाने एकरकमी एफआरपी कसे देणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. गतवर्षी देखील असाच निर्णय झाला. पहिल्या आठवड्यात कारखान्यांनी एफआरपी एकरकमी दिली, मात्र त्यानंतर त्यांनी त्याचे तुकडे पाडले. याला काही पर्यायही नव्हता. यावर्षीही गेल्यावर्षीचीच परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला माहीत असतानाही, आंदोलनाचे नाटक कशासाठी केले?, असा सवालही कोले यांनी शेट्टी यांना केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीFarmerशेतकरी