शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

सांगली :  राजू शेट्टींकडून शेतकऱ्यांची फसवणूक; संजय कोले यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:29 IST

कायद्यानेच १४ दिवसात एफआरपी देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना पंधरा दिवस आंदोलन करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांबरोबर एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना सहकार आघाडीचे व प्रचारप्रमुख संजय कोले यांनी सांगलीत सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्दे राजू शेट्टींकडून शेतकऱ्यांची फसवणूक; संजय कोले यांचा आरोपगुजरात पॅटर्नसाठी राज्यभर आंदोलन करणार

सांगली : कायद्यानेच १४ दिवसात एफआरपी देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना पंधरा दिवस आंदोलन करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांबरोबर एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना सहकार आघाडीचे व प्रचारप्रमुख संजय कोले यांनी सांगलीत सोमवारी पत्रकार परिषदेत केली. गुजरात पॅटर्न राबविण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी शासनाचा ऊस नियंत्रण आदेश १९६६ हा कायदा आधीपासूनच अस्तित्वात आहे. कायद्यानेच सर्वच कारखानदारांनी ऊस गळितास गेल्यानंतर १४ दिवसांमध्ये एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली पाहिजे. एफआरपी दिली नाही, तर कायद्याने हा गुन्हा असून कारवाईस कारखाना व्यवस्थापन पात्र आहे. असे असतानाही शेट्टी यांनी पंधरा दिवस आंदोलन करुन कारखानदारांशी एफआरपी एकरकमी देण्याचा तोडगा काढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान झाले आहे.

शासनाने हंगाम वीस दिवस आधी सुरू करण्यास परवानगी दिली होती. कारण राज्यातली दुष्काळी परिस्थिती, कमी पडणारे पाणी, हुमणी, कमी होणारा उतारा याचा विचार करून हा निर्णय घेतला होता. मात्र आता वीस दिवस हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांपुढील या समस्या वाढलेल्या आहेत. तसेच सध्याचे साखरेचे दर लक्षात घेता, शेतकऱ्यांच्या पदरात एफआरपी पडेलच याची खात्रीही देता येत नाही. कारण, साखरेचे चालू बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून त्यावर बँका ८५ ते ९० टक्के उचल देतात.

बँकांकडील उचल व उपपदार्थांतून मिळणारी रक्कम यामधून तोडणी, वाहतूक, गाळप खर्च वजा जाता, एफआरपी देण्यासाठी प्रति टनाला ४०० ते ५०० रुपये कमी पडतात. याच मुद्यावर कारखानदारांनी शॉर्ट मार्जिनचे कारण देऊन कारखाने बंद ठेवले होते. मग आता वीस दिवसात असे काय झाले, की कारखान्यांचे हे शॉर्ट मार्जिन भरून निघाले!कारखाने एकरकमी एफआरपी कसे देणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. गतवर्षी देखील असाच निर्णय झाला. पहिल्या आठवड्यात कारखान्यांनी एफआरपी एकरकमी दिली, मात्र त्यानंतर त्यांनी त्याचे तुकडे पाडले. याला काही पर्यायही नव्हता. यावर्षीही गेल्यावर्षीचीच परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला माहीत असतानाही, आंदोलनाचे नाटक कशासाठी केले?, असा सवालही कोले यांनी शेट्टी यांना केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीFarmerशेतकरी