शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

सांगली : कृष्णा खोऱ्याचे कार्यक्षेत्र विस्तारणार : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:14 IST

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारणार असून, या महामंडळामार्फत पाणी व पीक व्यवस्थापनाद्वारे सहा जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार केले जात आहे. केंद्रीय नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

ठळक मुद्दे कृष्णा खोऱ्याचे कार्यक्षेत्र विस्तारणार : संजयकाका पाटीलनीती आयोगानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू

सांगली : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारणार असून, या महामंडळामार्फत पाणी व पीक व्यवस्थापनाद्वारे सहा जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार केले जात आहे. केंद्रीय नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले की, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर आदी जिल्ह्यातील ७४ तालुक्यांतील शेती, दुग्ध व्यवसाय, सिंचन, शेतीमाल प्रक्रिया उद्योग अशा विविध स्तरावर एकात्मिक विकास करण्याचा प्रयत्न आहे.

नीती आयोग, केंद्रीय कृषी मंत्रालय, प्रधानमंत्री सिंचन योजना आणि त्यांना पूरक ठरणारे विविध विभाग या सर्वांच्या सहकार्याने त्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे.

केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. कृषी सिंचन आणि पाणी व्यवस्थापन हा यातील महत्त्वाचा घटक आहे. त्यात ठिबक पद्धतीवर भर दिला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जास्तीत-जास्त वापर करता येईल.कृष्णा खोरेअंतर्गत ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेतून आतापर्यंत २ लाख २९ हजार २०३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

या तीनही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास आणखी ७४ हजार ५८८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल; तर सूक्ष्म सिंचनाद्वारे एक लाख ५४ हजार ६१५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. त्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा शाश्वत पर्याय देण्याचा विचार नीती आयोगाने केला आहे.

शेतीपूरक दुग्ध व्यवसायालाही आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन वाढ व शेतकºयांना अधिक लाभ कसा देता येईल, याचा विचार सुरू आहे. शेतीमालावर प्रक्रिया करून उपपदार्थ निर्मिती करून त्याचे मार्केटिंग करायचे आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याची अशी संकल्पना आहे.प्रत्येक गावातील जमीन क्षेत्रानुसार शेतकऱ्यांचे विकास गट तयार करण्यात येणार आहेत. एक हजारपासून पाच हजार एकरापर्यंत जमिनीचा एकात्मिक पद्धतीने विकास करता येईल. विकास सोसायट्यांना नाबार्डकडून थेट पतपुरवठा करून शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे पाटील म्हणाले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगली