शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश अयोग्य : राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 14:10 IST

विकासाच्या नावावर जे काही प्रकल्प आता येत आहे, त्यातून विकास होतोय की पर्यावरणाची हानी याचा शांतपणे विचार करायला हवा. विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश योग्य नाही, असे स्पष्ट मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देविकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश अयोग्य : राजेंद्रसिंह राणाविलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दीनिमित्त व्याख्यान

सांगली : विकासाच्या नावावर जे काही प्रकल्प आता येत आहे, त्यातून विकास होतोय की पर्यावरणाची हानी याचा शांतपणे विचार करायला हवा. विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश योग्य नाही, असे स्पष्ट मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात ह्यजलसंवर्धनह्ण या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य भास्कर ताम्हणकर, किशोर पंडित, विलास चौथाई उपस्थित होते.राणा म्हणाले की, पर्यावरणावर आपले जीवन अवलंबून आहे. त्यामुळे याचे भान प्रत्येकाने प्रत्येक कृती करताना ठेवले पाहिजे. पर्यावरणास हानी न पोहचविता विधायक उपक्रम राबविले पाहिजेत. जागतिक तापमानवाढ हा विषय गंभीर बनला आहे. ग्लोबन वॉर्मिंगचा आलेख वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी व तिच्या योग्य देखभालीसाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व काही सरकार करेल, अशी मानसिकता बदलायला हवी. लोकांचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. समाजात सकारात्मक बदल व्हावा, असे वाटत असेल तर प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी.राजस्थान येथे जनसहभागाच्या मदतीने आम्ही हजारो जोहड म्हणजेच कच्चे तलाव निर्माण केले आहेत. तलावांमध्ये पावसाच्या पाण्याचे संकलन झाले. परिणामी परिसरातील दिड लाखाहून अधिक विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. देशाची व जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आपल्या देशात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळे पाण्याविषयी अधिक काळजी घ्यावी लागेल. पाणी वाचविणे व स्त्रोत निर्माण करणे यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. दैनंदिन जीवनातही आपण पाण्याचा गैरवापर करण्यात आघाडीवर आहोत. कोणत्याही परस्थितीत या गोष्टी रोखायला हव्यात. पाणी नियोजनाचे महत्व प्रत्येकाने समजून त्यानुसारच वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.मुलभूत प्रश्नांपेक्षा धर्म-जातीत अडकलो!मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी आपण धर्म आणि जातीच्या राजकारणात गुंतून पडत आहोत. समाजात विभागणी होत आहे. समाजातील एकता महत्त्वाची आहे. समाज एकवटून अनेक चांगली व पर्यावरणासाठी पोषक कामे करता येतात. लोकसहभागातून राजस्थानातील बारा मृत नदींना आम्ही जीवंत केले आहे. आज त्याचा लाभ ग्रामस्थांनाच होत आहे. यावरूनच लोकसहभाग व लोकांमधील एकता किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होते, असे राणा म्हणाले.देश पाणीदार बनविण्यासाठी एकत्र या!राणा म्हणाले की, लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात पाणीसाठे वाढत नाहीत. लोकांमध्ये अजूनही आम्हाला काय त्याचे असा विचार करण्याची वृत्ती कायम आहे. असा विचार घातक आहे. भविष्यात पाणीसंकट टाळायचे असेल तर सर्वांनीच पुढाकार घेऊन देश पाणीदार बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

टॅग्स :riverनदीSangliसांगली