शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

सांगली :  शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांचा अंत पाहू नये : एन. डी. बिरनाळे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जानेवारीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:05 PM

कोणत्याही मागणीवर ठोस निर्णय होत नाही. शिक्षणमंत्री पाहुया, करुया अशी थातुर-मातुर उत्तरे देऊन वेळ मारुन नेत आहेत. या शिक्षकांचे प्रश्न आणि शासनाच्या धोरणाबद्दल महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उपप्राचार्य एन. डी. बिरनाळे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

ठळक मुद्दे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जानेवारीत मोर्चाकोणत्याही मागणीवर ठोस निर्णय होत नाही. शिक्षणमंत्री पाहुया, करुया अशी थातुर-मातुर उत्तरे देऊन वेळ मारुन नेत आहेत. या शिक्षकांचे प्रश्न आणि शासनाच्या धोरणाबद्दल महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा कनिष्ठ महावप्रश्न : शिक्षकांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारचे धोरण काय आहे?बहुजन समाजाची शिक्षणाची दारे बंद करू नका

अशोक डोंबाळे 

सांगली : अंशदायी पेन्शन रद्द करा, घटनाबाह्य शिक्षण सेवक बंद करा आणि पंधरा वर्षांपासून विनापगार काम करीत असलेल्या शिक्षकांना नियमित करा यांसह २६ मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मागील तीन वर्षांपासून लढा चालू आहे. शासन आंदोलकांची गांभीर्याने दखल घेत नसल्यामुळे शिक्षकांमधील असंतोष टोकाला गेला आहे. निदर्शने सुरू आहेत.

कोणत्याही मागणीवर ठोस निर्णय होत नाही. शिक्षणमंत्री पाहुया, करुया अशी थातुर-मातुर उत्तरे देऊन वेळ मारुन नेत आहेत. या शिक्षकांचे प्रश्न आणि शासनाच्या धोरणाबद्दल महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उपप्राचार्य एन. डी. बिरनाळे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या मागण्या कोणत्या आहेत?उत्तर : दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांसाठी अंशदायी पेन्शन योजना शासनाने सुरु केली आहे. ती पूर्णत: घटनाबाह्य असून, शासनाने ती रद्द केली पाहिजे. पंधरा वर्षांपासून शिक्षक, आज ना उद्या नियमित होईल, म्हणून विनापगार ज्ञानदानाचे कार्य करीत असतानाही त्यांना शासन नियमित करीत नाही. शिक्षक भरतीवरील बंधने त्वरित उठविली पाहिजेत.

विनाअनुदानित सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देऊन तेथील शिक्षकांना नियमित करुन पगार देण्याची गरज आहे. चोवीस वर्षे सेवा झाल्यानंतर वेतनवाढ देतानाच्या जाचक अटी रद्द करुन पूर्वीप्रमाणेच वेतनवाढ दिली पाहिजे. कनिष्ठ महाविद्यालयासाठी पटसंख्येच्या नवीन आदेशामुळे अनेक शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आल्यामुळे पूर्वीप्रमाणेच शासनाने पटसंख्येचा निकष ठेवला पाहिजे. तसेच शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षावरुन ६० वर्षे करणे आदी २६ मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आंदोलन छेडत आहेत.प्रश्न : शिक्षकांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारचे धोरण काय आहे?उत्तर : कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या २६ मागण्यांसाठी मागील तीन वर्षांपासून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे आमचा पाठपुरावा चालू आहे. प्रत्येकवेळी चर्चेला बोलाविले जाते. शिक्षणमंत्री तावडे संघटनेची बाजू जाणून घेतात आणि तुमच्या मागण्यांबाबत शासन गांभीर्याने विचार करीत आहे, चर्चा चालू असून, लवकरच तुमच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, अशी पोकळ आश्वासने दिली जात आहेत. म्हणूनच सध्या शिक्षकांमध्ये शिक्षणमंत्री तावडे यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे.

शिक्षकांच्या मागण्या तर काहीच पूर्ण झाल्या नाहीत, उलट शिक्षणाबाबत रोज नवीन धोरण आखले जात आहे. बारावी, दहावीच्या अभ्यासक्रमात ग्रामीण भागातील विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून शिक्षण धोरण राबविले जात नाही.प्रश्न : शिक्षणमंत्री आणि राज्य सरकार प्रश्न सोडविण्याबाबत गंभीर नसेल, तर तुमची पुढील आंदोलनाची दिशा काय असणार?उत्तर : शिक्षणमंत्री आणि राज्य सरकारला जागे करण्यासाठी महिन्यात दोन आंदोलने झाली आहेत. तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करुन मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. तरीही शिक्षणमंत्री शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तयार नाहीत. म्हणूनच दि. १८ जानेवारी २०१८ रोजी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार आहेत.

यातूनही सरकारला जाग आली नाही, तर दि. २ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील सर्व शाळा बंद करुन मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तरीही मागण्यांचा प्रश्न तसाच राहिला, तर दि. ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बारावी विज्ञानच्या प्रात्यक्षिक परीक्षेवर बहिष्कार घालण्यात येणार आहे. तरीही प्रश्न सुटला नाही, तर लेखी परीक्षा आणि पेपर तपासणीवर बहिष्कार घालून बेमुदत काम बंद आंदोलन चालू ठेवणार आहे. प्रश्न सुटेपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे.बहुजन समाजाची शिक्षणाची दारे बंद करू नकामहात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुले शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. म्हणूनच आज उच्चपदावर बहुजन समाजाची मुले दिसत आहेत. पण, याच बहुजन समाजातील मुलांची शिक्षणाची दारे बंद करण्याचे धोरण सरकार राबवत आहे. शिक्षणात प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली आहे, अशी टीकाही एन. डी. बिरनाळे यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीeducationशैक्षणिक