शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

सांगली : ‘वंचित बहुजन’चा गाढव मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:34 IST

सांगली : दुष्काळी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात, दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात चारा छावणी सुरू करावी, उपसा सिंचन ...

ठळक मुद्देप्रत्येक गावात छावणीची मागणी : सिंचन योजनांची वीज बिले टंचाई निधीतून भरा

सांगली : दुष्काळी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात, दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात चारा छावणी सुरू करावी, उपसा सिंचन योजना अखंडित चालू ठेवून त्यांचे सर्व वीज बिल टंचाई निधीतून भरावे, यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळप्रश्नी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी तसेच जनतेच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली गाढव मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. कार्यकर्ते गाढवे घेऊन मोर्चात सहभागी झाल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गाढव, घोडा, शेळ्या-मेंढ्या यांच्यासाठी त्वरित चारा छावण्या चालू कराव्यात, इतर जनावरांप्रमाणे त्यांना अनुदान द्यावे, चारा छावण्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात गाव तिथे चारा छावणी सुरू करावी, छावण्या सुरू करण्याबाबतच्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, टेंभू, म्हैसाळ, ताकारी आणि आरफळ या उपसा सिंचन योजनांची आवर्तने निश्चित करून पाणी द्यावे, या योजनांमधील लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप थांबवावा, दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, टँकरची सुविधा देण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तलाव, विहिरींत म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजनांचे पाणी सोडावे, आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश होता.विश्रामबाग चौकातील विलिंग्डन महाविद्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली.

यावेळी ‘आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा घोषणा देत फलक हाती घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मोर्चात तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. डॉ. सुदर्शन घेरडे, डॉ. विवेक गुरव, अमोल वेटम, निवांत कोळेकर, नानासाहेब वाघमारे, आश्रफ वानकर, महेश कांबळे, टिपू इनामदार, करिम मुजावर, मुनीर मुल्ला, बाळासाहेब रास्ते, संजय कांबळे, शिवाजी पवार, विनायक रुपनर, आनंदराव म्हारगुडे, पिंटू माने, राहुल मदने आदी उपस्थित होते.दुष्काळ सरकारच्या नाकर्तेपणामुळेच : गोपीचंद पडळकरजनावरांसाठी चारा छावण्या आणि लोकांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळत नाहीत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मोर्चावेळी केली. माणसांचे मोर्चे काढून सरकार ऐकत नाही, त्यामुळे गाढवांचा मोर्चा काढण्यात आला आहे. जत, आटपाडी तालुक्यात वीस दिवसांनी टँकर मिळतात. प्रशासनाचे नियोजन नसून, ते हतबल झाले आहे. दुष्काळी योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप