शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सांगली जिल्ह्याचे यंदा हीरकमहोत्सवी वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:28 IST

स्वतंत्र सांगली जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. २१ नोव्हेंबर १९६० तो अस्तित्वात आला. खानापूर, वाळवा, तासगाव, जत आणि मिरज हे तालुके आणि आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ हे तीन महाल मिळून जिल्ह्याची प्रशासकीय रचना झाली.

ठळक मुद्देविकासाच्या दिशेने ६० वर्षांची गौरवास्पद वाटचाल : सर्वच क्षेत्रांत आघाडी

सांगली : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात ध्रुवताऱ्यासम अढळ स्थान पटकावलेला सांगली जिल्हा गुरुवारी (दि. २१) हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या साठ वर्षांत जिल्ह्याने अनेक क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करत विकासाच्या वाटेवर वाटचाल कायम ठेवली आहे.

तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातून २१ नोव्हेंबर १९५९ रोजी स्वतंत्र होऊन सांगली जिल्हा अस्तित्वात आला. तो मिरज, सांगली, बुधगाव, औंध, जत आणि इचलकरंजी संस्थानांत विभागला होता. वाळवा, शिराळा आणि तासगाव तालुके जुन्या सातारा जिल्ह्याचा भाग होते. १९४८ मध्ये मिरज, सांगली, बुधगाव, इचलकरंजी, जत, औंध संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. त्यानंतर विलीन संस्थानातील गावे व जुन्या तासगाव, शिराळा, तासगाव या तालुक्यांतील गावे मिळून दक्षिण सातारा जिल्हा झाला. तो तत्कालीन मुंबई इलाख्याचा भाग होता. आजच्या सातारा जिल्ह्याला त्यावेळी उत्तर सातारा असे नाव होते.

१ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचनेनंतर मुंबई इलाख्याचे मराठी भाषिक भागाचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्यानंतर स्वतंत्र सांगली जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. २१ नोव्हेंबर १९६० तो अस्तित्वात आला. खानापूर, वाळवा, तासगाव, जत आणि मिरज हे तालुके आणि आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ हे तीन महाल मिळून जिल्ह्याची प्रशासकीय रचना झाली. वाळवा आणि मिरज असे दोन प्रांत (विभाग) तयार केले. १९६८ मध्ये आटपाडी, शिराळा आणि कवठेमहांकाळ महालांची पुनर्रचना होऊन ते तालुके बनले.राज्यासाठी योगदान

जिल्ह्याने गेल्या ५९ वर्षांच्या वाटचालीत सहकार, राजकारण, शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांत लधवेधी कामगिरी केली आहे. सांगलीच्या राजकीय नेतृत्वांनी राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यात मोठाच हातभार लावला. आजही राज्याच्या राजकारणाचे पान सांगलीशिवाय हलत नाही, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Sangliसांगली