शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याचे यंदा हीरकमहोत्सवी वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:28 IST

स्वतंत्र सांगली जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. २१ नोव्हेंबर १९६० तो अस्तित्वात आला. खानापूर, वाळवा, तासगाव, जत आणि मिरज हे तालुके आणि आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ हे तीन महाल मिळून जिल्ह्याची प्रशासकीय रचना झाली.

ठळक मुद्देविकासाच्या दिशेने ६० वर्षांची गौरवास्पद वाटचाल : सर्वच क्षेत्रांत आघाडी

सांगली : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात ध्रुवताऱ्यासम अढळ स्थान पटकावलेला सांगली जिल्हा गुरुवारी (दि. २१) हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या साठ वर्षांत जिल्ह्याने अनेक क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करत विकासाच्या वाटेवर वाटचाल कायम ठेवली आहे.

तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातून २१ नोव्हेंबर १९५९ रोजी स्वतंत्र होऊन सांगली जिल्हा अस्तित्वात आला. तो मिरज, सांगली, बुधगाव, औंध, जत आणि इचलकरंजी संस्थानांत विभागला होता. वाळवा, शिराळा आणि तासगाव तालुके जुन्या सातारा जिल्ह्याचा भाग होते. १९४८ मध्ये मिरज, सांगली, बुधगाव, इचलकरंजी, जत, औंध संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. त्यानंतर विलीन संस्थानातील गावे व जुन्या तासगाव, शिराळा, तासगाव या तालुक्यांतील गावे मिळून दक्षिण सातारा जिल्हा झाला. तो तत्कालीन मुंबई इलाख्याचा भाग होता. आजच्या सातारा जिल्ह्याला त्यावेळी उत्तर सातारा असे नाव होते.

१ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचनेनंतर मुंबई इलाख्याचे मराठी भाषिक भागाचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्यानंतर स्वतंत्र सांगली जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. २१ नोव्हेंबर १९६० तो अस्तित्वात आला. खानापूर, वाळवा, तासगाव, जत आणि मिरज हे तालुके आणि आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ हे तीन महाल मिळून जिल्ह्याची प्रशासकीय रचना झाली. वाळवा आणि मिरज असे दोन प्रांत (विभाग) तयार केले. १९६८ मध्ये आटपाडी, शिराळा आणि कवठेमहांकाळ महालांची पुनर्रचना होऊन ते तालुके बनले.राज्यासाठी योगदान

जिल्ह्याने गेल्या ५९ वर्षांच्या वाटचालीत सहकार, राजकारण, शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांत लधवेधी कामगिरी केली आहे. सांगलीच्या राजकीय नेतृत्वांनी राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यात मोठाच हातभार लावला. आजही राज्याच्या राजकारणाचे पान सांगलीशिवाय हलत नाही, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Sangliसांगली