शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

सांगली जिल्ह्याचे यंदा हीरकमहोत्सवी वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:28 IST

स्वतंत्र सांगली जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. २१ नोव्हेंबर १९६० तो अस्तित्वात आला. खानापूर, वाळवा, तासगाव, जत आणि मिरज हे तालुके आणि आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ हे तीन महाल मिळून जिल्ह्याची प्रशासकीय रचना झाली.

ठळक मुद्देविकासाच्या दिशेने ६० वर्षांची गौरवास्पद वाटचाल : सर्वच क्षेत्रांत आघाडी

सांगली : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात ध्रुवताऱ्यासम अढळ स्थान पटकावलेला सांगली जिल्हा गुरुवारी (दि. २१) हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या साठ वर्षांत जिल्ह्याने अनेक क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करत विकासाच्या वाटेवर वाटचाल कायम ठेवली आहे.

तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातून २१ नोव्हेंबर १९५९ रोजी स्वतंत्र होऊन सांगली जिल्हा अस्तित्वात आला. तो मिरज, सांगली, बुधगाव, औंध, जत आणि इचलकरंजी संस्थानांत विभागला होता. वाळवा, शिराळा आणि तासगाव तालुके जुन्या सातारा जिल्ह्याचा भाग होते. १९४८ मध्ये मिरज, सांगली, बुधगाव, इचलकरंजी, जत, औंध संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. त्यानंतर विलीन संस्थानातील गावे व जुन्या तासगाव, शिराळा, तासगाव या तालुक्यांतील गावे मिळून दक्षिण सातारा जिल्हा झाला. तो तत्कालीन मुंबई इलाख्याचा भाग होता. आजच्या सातारा जिल्ह्याला त्यावेळी उत्तर सातारा असे नाव होते.

१ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचनेनंतर मुंबई इलाख्याचे मराठी भाषिक भागाचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्यानंतर स्वतंत्र सांगली जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. २१ नोव्हेंबर १९६० तो अस्तित्वात आला. खानापूर, वाळवा, तासगाव, जत आणि मिरज हे तालुके आणि आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ हे तीन महाल मिळून जिल्ह्याची प्रशासकीय रचना झाली. वाळवा आणि मिरज असे दोन प्रांत (विभाग) तयार केले. १९६८ मध्ये आटपाडी, शिराळा आणि कवठेमहांकाळ महालांची पुनर्रचना होऊन ते तालुके बनले.राज्यासाठी योगदान

जिल्ह्याने गेल्या ५९ वर्षांच्या वाटचालीत सहकार, राजकारण, शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांत लधवेधी कामगिरी केली आहे. सांगलीच्या राजकीय नेतृत्वांनी राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यात मोठाच हातभार लावला. आजही राज्याच्या राजकारणाचे पान सांगलीशिवाय हलत नाही, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Sangliसांगली