शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

पश्चिम महाराष्टत सांगली जिल्हा सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 17:06 IST

कोरोनाच्या नियंत्रणाचे सर्वाधिक श्रेय जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या काटेकोर नियोजनाला जाते. महसूल, पोलिस, आरोग्य, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय, प्रयोगशाळा, कोविड रुग्णालय या सर्व यंत्रणांत समन्वय आणि सुसूत्रता असल्याचा हा परिणाम आहे. लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी करताना, नियमांचा जाच होणार नाही, याचीही काळजी घेतली.

ठळक मुद्देकोरोनाचा फैलाव रोखण्यात यश : प्रशासनाचे चोख नियोजन, सर्व यंत्रणांत समन्वय

श्रीनिवास नागे ।सांगली : पश्चिम महाराष्टत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना, तुलनेने सांगली जिल्ह्यात मात्र तो नियंत्रणात दिसत आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्टÑातील जिल्ह्यांसह शेजारच्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातही कोरोनाच्या फैलावाची स्थिती गंभीर आहे. सांगलीत मात्र कोरोना रुग्णसंख्येला शंभरीतच रोखण्यात यश आले आहे.

पश्चिम महाराष्टत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून, तेथे कोरोनाचे ६७१८ रुग्ण असून, ३०३ दगावले आहेत. सोलापूर जिल्ह्यात ७०९ रुग्ण, ६७ जणांचा मृत्यू, कोल्हापुरात ४२७ रुग्ण, चौघांचा मृत्यू, तर साताऱ्यात ४२२ रुग्ण, असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्हे सांगलीच्या शेजारी असून, कर्नाटकातील विजयपूर आणि बेळगाव यांच्याही सीमा खेटून आहेत. बेळगावात कोरोना रुग्णांची संख्या १३९ आहे. या सर्वांच्या तुलनेत सांगली जिल्हा मात्र सुरक्षित राहिला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे १०१ रुग्ण असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. या तुलनात्मक आकडेवारीवरून जिल्हा अधिक सुरक्षित मानला जात आहे.

कोरोनाच्या नियंत्रणाचे सर्वाधिक श्रेय जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या काटेकोर नियोजनाला जाते. महसूल, पोलिस, आरोग्य, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय, प्रयोगशाळा, कोविड रुग्णालय या सर्व यंत्रणांत समन्वय आणि सुसूत्रता असल्याचा हा परिणाम आहे. लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी करताना, नियमांचा जाच होणार नाही, याचीही काळजी घेतली.

काय आहे ‘सांगली पॅटर्न’च्जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची तपासणी नाक्यावर तपासणी आणि नोंद.च्महसूल-आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोना संशयितांचा शोध घेऊन वेळेवर तपासणी.च्संशयास्पद आढळलेल्यांचे, संपर्कातील ‘हायरिस्क’ नागरिकांचे त्वरित संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन). त्यामुळे

  • स्थानिक प्रसाराला प्रतिबंध.
  • संशयितांची कोरोना चाचणी करून लगेच अहवाल.
  • अहवाल सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि तेथून तो तालुक्याच्या यंत्रणेकडे.
  • रुग्ण आढळलेला परिसर लगेच कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करून सील. तेथे आवश्यक उपाययोजना.
  • संशयिताचा शोध, चाचणी ते उपाययोजना ही प्रक्रिया होते, केवळ तीन ते चार तासात!

संसर्ग रोखलासर्वप्रथम इस्लामपुरात चार रुग्ण आढळून आले होते. टप्प्याटप्प्याने तेथील रुग्णांची संख्या २७ झाली. मात्र प्रशासनाने बाधितांचा परिसर प्रतिबंधित केला. बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू ठेवला. या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’मुळे संसर्ग रोखता आला.

१०१ कोरोना  रुग्ण-- 03 मृत

 

मी स्वत: वैद्यकीय क्षेत्रातील असल्याचा फायदा झाला. कोरोनाबाधिताचा शोध घेऊन त्याच्यासह त्याच्या संपर्कातील लोकांना लगेच बाहेर काढत आहोत. आरोग्य यंत्रणेकडून सर्वेक्षण सुरू असून, त्यातून लहान मुले-वृद्धांची माहिती समजते. उपचारातील यंत्रणाही उत्तम काम करत आहे.- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी