शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

HSC Exam Result 2025: सांगली जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के; गतवर्षीपेक्षा झाली वाढ, कोणत्या शाखेची टक्केवारी सर्वाधिक.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:50 IST

सांगली : बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के लागला. ऑनलाइन निकालानुसार इस्लामपुरातील तीन विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले ...

सांगली : बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के लागला. ऑनलाइन निकालानुसार इस्लामपुरातील तीन विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. शिराळा तालुक्याने ९७.६७ टक्के गुणांसह सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यात आघाडी कायम राखली आहे. ६६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.७६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.०२ टक्के आहे. कोल्हापूर विभागात सांगली जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी दुपारी १ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी मोबाइलमध्ये लक्ष केंद्रित केले होते. संकेतस्थळावर ताण असल्याने ते सुरू होत नसल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला. अनेक महाविद्यालयांतही विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला. उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात जल्लोष केला.एकूण ३२५ कनिष्ठ महाविद्यालयांतील १६ हजार १६८ विद्यार्थी आणि १५ हजार ३९ विद्यार्थिनी अशा एकूण ३१ हजार २०७ परीक्षार्थींनी ५१ केेंद्रांवर परीक्षा दिली. त्यापैकी १४ हजार ६२८ विद्यार्थी आणि १४ हजार ५१७ विद्यार्थिनी असे एकूण २९ हजार १४५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ९०.४७ टक्के तर मुलींची टक्केवारी ९६.५२ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.०२ टक्के लागला.१७ हजार ९१० परीक्षार्थींपैकी १७ हजार ५५७ उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ८२.९६ टक्के लागला. ८ हजार १६२ परीक्षार्थींपैकी ६ हजार ७७२ उत्तीर्ण झाले. वाणिज्यचा निकाल ९४.२८ टक्के लागला. ४ हजार २०१ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ९६१ उत्तीर्ण झाले. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९२ टक्के लागला. ९०० परीक्षार्थींपैकी८२८ उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ६१.६८ टक्के आहे. १ हजार २७१ पैकी ७८४ उत्तीर्ण झाले.तालुकानिहाय निकाल असा :शिराळा ९७.६७, कडेगाव९६.६३, पलूस ९६.२१, जत ९२०, मिरज ९५.४५, खानापूर ९४.४७, वाळवा ९६.८५, तासगाव ९३.२१, आटपाडी ९२.६८, कवठेमहांकाळ ९६.६७, महापालिका क्षेत्र ९०.२८ टक्के

०.७६ टक्के वाढगेल्या वर्षी बारावी निकालाची टक्केवारी ९२.६३ टक्के होती. यंदा यामध्ये ०.७६ टक्के वाढ झाली. कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. सातारा जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. गुणपडताळणीसाठी ६ ते २० मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीHSC Exam Resultबारावी निकाल