शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

सांगली जिल्ह्यात साडेसहा टक्क्याने वीज गळतीमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:29 IST

तीन वर्षात जिल्ह्यातील वीज गळती साडेसहा टक्क्याने कमी झाली आहे. सांगली शहर विभागाची वीज गळती मात्र १.६ टक्क्याने वाढली आहे.

ठळक मुद्दे१.६ टक्के गळती वाढली : महावितरणकडून उपाययोजना

सांगली : तीन वर्षात जिल्ह्यातील वीज गळती साडेसहा टक्क्याने कमी झाली आहे. सांगली शहर विभागाची वीज गळती मात्र १.६ टक्क्याने वाढली आहे. उर्वरित चारही विभागातील वीज गळती कमी झाल्याचे महावितरणच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. प्रत्यक्षात वीज गळती कमी होत असतानाही ग्राहकांवरील इंधन अधिभार मात्र वाढतच आहे.

महावितरणकडून दरवर्षी वीज गळती आणि चोरीचा आढावा घेण्यात येतो. जिल्ह्यात मूलभूत सुविधांसाठी पुरेसा निधी मिळाला नाही. जिल्ह्यात विद्युत बिलाची वसुली राज्यात सर्वाधिक असतानाही निधी मात्र तुटपुंजा मिळतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीपंपाची विद्युत कनेक्शन्स प्रलंबित आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इस्लामपूर विभागाची २०१५-१६ या वर्षात १६.८६ टक्के गळती होती. यामध्ये दोन वर्षात २.४ टक्क्याने घट होऊन २०१७-१८ मध्ये १४.४६ टक्के झाली आहे. कवठेमहांकाळ विभागाची २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ३७.१८ टक्के वीज गळती होती.यामध्ये २०१७-१८ वर्षात १३.०१ टक्क्याने कपात होऊन २०१७-१८ वर्षात २४.१७ टक्के झाली आहे. सांगली ग्रामीण आणि विटा विभागाचीही वीज गळती कमी झाली आहे.

सांगली शहरची २०१५-१६ वर्षात ५.१४ टक्के वीज गळती होती. ती ४.१२ टक्केपर्यंत आली. मात्र २०१७-१८ या वर्षात मात्र १.६४ टक्क्याने वीज गळती वाढली असून, सध्या ती ५.७६ टक्क्यावर गेली आहे. वीज गळतीच्या प्रश्नाकडे महावितरणच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील तीन वर्षामधील वीज गळतीचे प्रमाणविभाग २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८इस्लामपूर १६.८६ टक्के १४.९५ टक्के १४.४६ टक्केकवठेमहांकाळ ३७.१८ २५.४४ २४.१७सांगली ग्रामीण २२.६८ १९.८७ १८.२८सांगली शहर ५.१४ ४.१२ ५.७६विटा २५.६५ १९.५४ १५.३४सांगली जिल्हा २२.२० १७.३८ १५.८०

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल