शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसानीचे मिळाले 'इतके' कोटी, सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा

By अशोक डोंबाळे | Updated: April 19, 2023 19:19 IST

४५ हजार ८६८ शेतकर्‍यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

सांगली : जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे द्राक्ष, डाळींबांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ४५ हजार ८६८ शेतकर्‍यांचे २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांच्या पंचनाम्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. जिल्ह्यातील ४१ हजार ८१५ शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ४६ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे.जिल्ह्यातील ५१ शेतकर्‍यांच्या दुबार नुकसानीची नोंद असल्याने भरपाई राखून ठेवली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पिकांची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वादळी वार्‍यासह तुफान पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले होते, त्यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, भुईमूग, उडीद, मूग, सूर्यफूल, बाजरी, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा समावेश होता.प्रशासनाने दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिवृष्टी, अतिपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा अहवाल अंतिम केला होता. यामध्ये शिराळा तालुक्यातील एकाही शेतकर्‍याचे नुकसान झाले नव्हते. उर्वरित नऊ तालुक्यांतील ४५ हजार ८६८ शेतकर्‍यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ४७ कोटी २५ लाख १५ हजार रुपये निधीची मागणी शासनाकडे केली होती.जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात जिल्हयात नुकसान झालेल्या ४१ हजार ८१५ शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईपोटी ४६ कोटी रुपयांची रक्कम बँक खात्यावर वर्ग केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी