शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सांगली जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसानीचे मिळाले 'इतके' कोटी, सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा

By अशोक डोंबाळे | Updated: April 19, 2023 19:19 IST

४५ हजार ८६८ शेतकर्‍यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

सांगली : जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे द्राक्ष, डाळींबांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ४५ हजार ८६८ शेतकर्‍यांचे २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांच्या पंचनाम्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. जिल्ह्यातील ४१ हजार ८१५ शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ४६ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे.जिल्ह्यातील ५१ शेतकर्‍यांच्या दुबार नुकसानीची नोंद असल्याने भरपाई राखून ठेवली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पिकांची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वादळी वार्‍यासह तुफान पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले होते, त्यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, भुईमूग, उडीद, मूग, सूर्यफूल, बाजरी, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा समावेश होता.प्रशासनाने दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिवृष्टी, अतिपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा अहवाल अंतिम केला होता. यामध्ये शिराळा तालुक्यातील एकाही शेतकर्‍याचे नुकसान झाले नव्हते. उर्वरित नऊ तालुक्यांतील ४५ हजार ८६८ शेतकर्‍यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ४७ कोटी २५ लाख १५ हजार रुपये निधीची मागणी शासनाकडे केली होती.जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात जिल्हयात नुकसान झालेल्या ४१ हजार ८१५ शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईपोटी ४६ कोटी रुपयांची रक्कम बँक खात्यावर वर्ग केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी