शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कोरोना लसीकरणात सांगली जिल्हा ३० व्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST

सांगली : कोरोना गेला, आता लस कशासाठी, ही मानसिकता लसीकरणाच्या गतीवर परिणाम करणारी ठरत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा ...

सांगली : कोरोना गेला, आता लस कशासाठी, ही मानसिकता लसीकरणाच्या गतीवर परिणाम करणारी ठरत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी आहे. राज्यभराची आकडेवारी पाहता सांगली जिल्हा तिसाव्या क्रमांकावर आहे.

लसीकरणासाठी नावे नोंदवून घेतानाच आरोग्य यंत्रणेला पुरता घाम फुटला होता. विशेषत: महापालिका क्षेत्रात नोंदणी अत्यंत कमी झाली. नोंदणीनंतरचा दुसरा टप्पा प्रत्यक्ष लसीकरणाचा होता. त्यात मंदावलेल्या पोर्टलचे विघ्न आले. एकेका लाभार्थीची लसीकरण प्रक्रिया पूर्ण करायला अर्धा ते एक तास लागायचा. आरोग्य यंत्रणेने पहाटे दीड-दोनपर्यंत संगणकापुढे ठाण मांडून प्रक्रिया पूर्ण केली, त्यामुळे लाभार्थ्यांना अगदी ऐनवेळी लसीकरणासाठी निरोप मिळाले. या सर्वांचा प्रतिकूल परिणाम टक्केवारीवर झाला. आजवर २६ हजार ४९२ जणांची नोंदणी झाली आहे, प्रत्यक्षात लसीकरण मात्र ७०२४ जणांचेच झाले आहे. २१ केंद्रांवर लस टोचली जात आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज शंभर जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे, मात्र ते पूर्ण होत नाही. आरोग्य कर्मचारीच मागे राहिले तर सामान्यांनी कसे धाडस करावे असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

चौकट

कुठे किती लसीकरण

जिल्ह्यात २१ केंद्रे आहेत. तेथील लसीकरण असे : सांगली सिव्हिल ५८३, मिरज सिव्हिल ४६७, भारती रुग्णालय, मिरज - ५२९, वॉनलेस रुग्णालय, मिरज ३६९, हनुमाननगर शहरी आरोग्य केंद्र, सांगली ६९७, जामवाडी आरोग्य केंद्र, सांगली २६३, साखर कारखाना आरोग्य केंद्र, सांगली २२६, कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय २४०, इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय ४७०, कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र १८६, पलूस ग्रामीण रुग्णालय ११५, कोकरुड प्राथमिक आरोग्य केंद्र ३५९, जत ग्रामीण रुग्णालय ५५१, तासगाव ग्रामीण रुग्णालय २३७, कडेगाव ग्रामीण रुग्णालय २९७, आष्टा ग्रामीण रुग्णालय २४२, आटपाडी ग्रामीण रुग्णालय २४५, विटा ग्रामीण रुग्णालय ३२९, खंडेराजुरी आरोग्य केंद्र २३२, नेर्ले आरोग्य केंद्र ३०८, शिराळा उपजिल्हा रुग्णालय ७९.

चौकट

जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ३१ हजार ८०० डोस मिळाले आहेत. पहिल्या पंधरवड्यात लसीकरण अत्यंत मंद गतीने झाले. पोर्टल गतीने काम करत नसल्याने अडथळे आले. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसादही नव्हता. एकूण २६ हजार ४९२ कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. गुरुवारपर्यंत ७०२४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले. अद्याप २४ हजार ७७६ डोस शिल्लक आहेत. त्यामुळे लसीच्या दुसऱ्या साठ्याची गरज नाही, तो मिळण्याची शक्यताही तूर्त नाही.

लसीचा साठा २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या लस भांडारातच ती पोलीस बंदोबस्तात ठेवली आहे. मागणीनुसार इतर शहरी रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांना पाठविली जाते. साठा काळजीपूर्वक हाताळला जात असल्याने एकही डोस वाया गेला नसल्याचा दावा प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी केला.

एका कुपीमध्ये दहा डोस आहेत. प्रत्येक सिरिंजमध्ये लस भरण्यात कमीजास्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्पादक कंपनीने कुपीमध्ये दहाऐवजी साडेदहा ते अकरा डोस भरले आहेत. त्यामुळेही डोस वाया जाण्याचा प्रकार घडला नाही.

चौकट

महिला आरोग्य कर्मचारी सरसावल्या

विशेष बाब म्हणजे लसीकरणामध्ये महिला डॉक्टर्स व कर्मचारी पुढे आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पन्नास टक्क्यांहून अधिक महिलांनी लस टोचून घेतली आहे. जास्त वयोमर्यादा, मधुमेह किंवा अन्य विकार, ॲलर्जी अशा काही कारणांनी काही महिला कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, उर्वरित महिला कर्मचारी मात्र अग्रेसर आहेत.

पाच जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली पिछाडीवर

सांगली ६२.२०, सातारा ९३.९, कोल्हापूर ६२.६०, रत्नागिरी ५५.८०, सिंधुदुर्ग ६८.

-----------

कोट

लस टोचण्यासाठी खासगी डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद चांगला नाही. कॉल मिळूनही ते येत नाहीत. त्यांना नव्याने दोनवेळा कॉल देणार आहोत. त्यानंतरही ते आले नाहीत तर त्याविषयी शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल. सध्या पोर्टल मंदावण्याची समस्या कमी झाली आहे.

-- डॉ. मिलिंद पोरे, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी

------------- --------