शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘पश्चिमालाप’चा बहुमान सांगली जिल्ह्याला

By admin | Updated: February 21, 2015 00:16 IST

मंगळवारी इस्लामपुरात कार्यक्रम : लोककला, सांस्कृतिक जीवनाचे सादरीकरण

इस्लामपूर : विविध राज्यांच्या लोककलाजीवनाची व सांस्कृतिक वारशाची माहिती व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पश्चिम भारतासाठी तयार केलेल्या ‘पश्चिमालाप’ कार्यक्रमाचा बहुमान यंदा सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. यातील पहिला कार्यक्रम इस्लामपूर नगरपरिषदेच्या संयोजनाखाली २४ फेबु्रवारीला होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली.नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, अरुणादेवी पाटील, बी. ए. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार बैठक झाली. यावेळी देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व गोवा या चार राज्यांतील लोककला व सांस्कृतिक जीवनाची माहिती या कार्यक्रमातून मिळणार आहे. गतवर्षी हा कार्यक्रम राजस्थानमधील झुणझूण जिल्ह्यात झाला होता. प्रत्येकवर्षी या चार राज्यांतून एका जिल्ह्याची निवड केली जाते. तो बहुमान यावेळी सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा समितीचे सभापती संजय कोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात आठ कार्यक्रम होतील.देशमुख म्हणाले, राजस्थानमधील लोककला, तेहराताल, भवाई, कालबेलिया, गुजरातमधील टिप्पणी, गोव्यातील दिखणी व समईनृत्य, तर महाराष्ट्राची शान असणारी लावणी व भारुड अशा लोककलांचे सादरीकरण २४ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत राजारामबापू नाट्यगृहात होणार आहे. लोककलांचे जतन व संस्कृतीची देवाण—घेवाण हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वरील चार राज्यांतील ६0 कलाकार हे कार्यक़्रम सादर करतील. शासनाच्या सांस्कृतिक कार्यालयाचे सहायक कार्यक्रम अधिकारी पंजक नागर, सभापती संजय कोरे व पुण्याच्या अमिता पेठकर संयोजन करीत आहेत. (वार्ताहर)जिल्हाभर उपक्रमसांगली जिल्ह्यातील ‘पश्चिमालाप’ कार्यक्रमाची सुरुवात दि. २४ फेबु्रवारीला इस्लामपुरातून झाल्यानंतर २५ रोजी सांगली, २६ रोजी मिरज, २७ रोजी तासगाव, २८ फेबु्रवारीला कडेगाव आणि पलूस, तर १ मार्चला खानापूर किंवा विटा, २ मार्च रोजी शिराळा, ३ मार्च रोजी जत, आटपाडी किंवा कवठेमहांकाळ पैकी एका ठिकाणी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम होईल.