शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सांगली जिल्हा बँकेची पीक कर्जाची थकबाकी २३७२ कोटींवर, आतापर्यंत किती झाली वसुली.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:57 IST

वसुलीसाठी विशेष मोहीम 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेती कर्जाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. बँकेची शेतीकर्जाची जून २०२५ अखेरची वसूलपात्र रक्कम दोन हजार ३७२ कोटी ३२ लाख रुपये आहे. जूनपर्यंत ७५ टक्के वसुली झाली असून येत्या पंधरा दिवसांत १५ टक्के वसुली वाढवण्याचे जिल्हा बँक प्रशासनाचे प्रयत्न आहेत. जूनअखेरपर्यंत ९० टक्केंवर वसुलीचा आकडा नेण्यासाठी जिल्हा बँक प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेती कर्जाच्या वसुलीची मुदत जूनअखेर आहे. बँकेची शेतीकर्जाची जून २०२५ अखेरची वसूलपात्र रक्कम २ हजार ३७२ कोटी ३२ लाख रुपये आहे. यातील चालू वर्षी एक हजार ८८२ कोटी ७४ लाख व थकबाकी ४८९ कोटी ५७ लाख आहे. मे अखेर चालू व थकबाकी वसुलीची प्रक्रिया चालू आहे. एकूण वसूलपात्र रकमेच्या ६८ टक्के वसुली होती.पंधरवड्यामध्ये आणखी सात ते आठ टक्के वसुली झाली असून एकूण वसुली ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. शेती कर्जाच्या वसुलीसाठी जून अखेरची मुदत असून या मुदतीत ९० टक्के कर्ज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वसुलीचे नियोजन केले आहे. प्रत्येक तालुक्यात बँकेचे प्रमुख अधिकारी जाऊन वसुलीचा आढावा घेत आहेत.

वसुलीसाठी विशेष पथकवसुलीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून यामार्फत वसुलीला गती देण्यात आली आहे. थकबाकीदारांनी मुदतीत कर्ज भरून लाभ घ्यावा, अन्यथा जादा व्याजाचा भुर्दंड पडणार आहे. याशिवाय त्यांच्यावर नियम १०१ नुसार कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. सध्या वसुलीला प्रतिसाद मिळत आहे. बँकेचे अधिकारी सुटीच्या दिवशीही वसुलीच्या कामात आहेत.

शेतकऱ्यांनी मुदतीत कर्ज भरावे : मानसिंगराव नाईकवसुलीसाठी जिल्हास्तरावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके तैनात केली आहेत. थकबाकी राहिल्यास काय फटका बसतो, याचीही माहिती ते शेतकऱ्यांना सांगत आहेत. शेतकऱ्यांनीही जादा व्याजाचा भुर्दंड बसू नये तसेच कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागणार नाही यासाठी मुदतीत कर्ज भरून बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले आहे.

जिल्हा बँकेची आतापर्यंतची तालुकानिहाय वसुलीकडेगाव तालुका १४७ कोटी १७ लाख, वाळवा २२५ कोटी एक लाख, आटपाडी- १०८ कोटी ५६ लाख, खानापूर- ८४ कोटी ५७ लाख, शिराळा-७५ कोटी ८७ लाख, पलूस-१० कोटी ७१ लाख, मिरज-२०८ कोटी ५३ लाख, कवठेमहांकाळ-१३० कोटी ६० लाख, तासगाव-१८० कोटी ७२ लाख, आणि जत-२१५ कोटी ७० लाख.