शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेची पीक कर्जाची थकबाकी २३७२ कोटींवर, आतापर्यंत किती झाली वसुली.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:57 IST

वसुलीसाठी विशेष मोहीम 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेती कर्जाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. बँकेची शेतीकर्जाची जून २०२५ अखेरची वसूलपात्र रक्कम दोन हजार ३७२ कोटी ३२ लाख रुपये आहे. जूनपर्यंत ७५ टक्के वसुली झाली असून येत्या पंधरा दिवसांत १५ टक्के वसुली वाढवण्याचे जिल्हा बँक प्रशासनाचे प्रयत्न आहेत. जूनअखेरपर्यंत ९० टक्केंवर वसुलीचा आकडा नेण्यासाठी जिल्हा बँक प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेती कर्जाच्या वसुलीची मुदत जूनअखेर आहे. बँकेची शेतीकर्जाची जून २०२५ अखेरची वसूलपात्र रक्कम २ हजार ३७२ कोटी ३२ लाख रुपये आहे. यातील चालू वर्षी एक हजार ८८२ कोटी ७४ लाख व थकबाकी ४८९ कोटी ५७ लाख आहे. मे अखेर चालू व थकबाकी वसुलीची प्रक्रिया चालू आहे. एकूण वसूलपात्र रकमेच्या ६८ टक्के वसुली होती.पंधरवड्यामध्ये आणखी सात ते आठ टक्के वसुली झाली असून एकूण वसुली ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. शेती कर्जाच्या वसुलीसाठी जून अखेरची मुदत असून या मुदतीत ९० टक्के कर्ज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वसुलीचे नियोजन केले आहे. प्रत्येक तालुक्यात बँकेचे प्रमुख अधिकारी जाऊन वसुलीचा आढावा घेत आहेत.

वसुलीसाठी विशेष पथकवसुलीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून यामार्फत वसुलीला गती देण्यात आली आहे. थकबाकीदारांनी मुदतीत कर्ज भरून लाभ घ्यावा, अन्यथा जादा व्याजाचा भुर्दंड पडणार आहे. याशिवाय त्यांच्यावर नियम १०१ नुसार कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. सध्या वसुलीला प्रतिसाद मिळत आहे. बँकेचे अधिकारी सुटीच्या दिवशीही वसुलीच्या कामात आहेत.

शेतकऱ्यांनी मुदतीत कर्ज भरावे : मानसिंगराव नाईकवसुलीसाठी जिल्हास्तरावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके तैनात केली आहेत. थकबाकी राहिल्यास काय फटका बसतो, याचीही माहिती ते शेतकऱ्यांना सांगत आहेत. शेतकऱ्यांनीही जादा व्याजाचा भुर्दंड बसू नये तसेच कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागणार नाही यासाठी मुदतीत कर्ज भरून बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले आहे.

जिल्हा बँकेची आतापर्यंतची तालुकानिहाय वसुलीकडेगाव तालुका १४७ कोटी १७ लाख, वाळवा २२५ कोटी एक लाख, आटपाडी- १०८ कोटी ५६ लाख, खानापूर- ८४ कोटी ५७ लाख, शिराळा-७५ कोटी ८७ लाख, पलूस-१० कोटी ७१ लाख, मिरज-२०८ कोटी ५३ लाख, कवठेमहांकाळ-१३० कोटी ६० लाख, तासगाव-१८० कोटी ७२ लाख, आणि जत-२१५ कोटी ७० लाख.