शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीप्रकरणी गंभीर ताशेरे; 'या' कामांमध्ये आढळली अनियमितता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:02 IST

तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांकडून वसुलीची शिफारस

सांगली : जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या कालावधीतील अनेक तक्रारींबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी तथ्य आढळल्याचे अहवालात नमूद केले आहे. नोकरभरतीसह अन्य प्रकरणातून बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याने त्याची जबाबदारी निश्चित करून तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांकडून वसुली करावी, अशी शिफारसही करण्यात आली आहे.सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या विविध प्रकरणांविषयी शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत बॅँकेची महाविकास आघाडी सरकारच्या काळातच चौकशी लावली होती. मात्र, नंतर स्थगित दिली. राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्थगिती उठवण्याची मागणी केली. त्यानुसार विद्यमान सरकारने चौकशीचे आदेश दिले.कोल्हापूर विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) दि. तु. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने त्यांचा अहवाल सहकार आयुक्तांना सादर केला. सुनील फराटे यांनी केलेल्या बहुतांश तक्रारीत तथ्य असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवले आहे. जिल्हा बॅँकेच्या इस्लामपूर येथील विभागीय कार्यालयाची इमारत उभारणी करताना अनेक त्रुटी दिसून आल्या. या कामावर तब्बल ४ कोटी ४० लाख ९० हजार ७५४ रुपये खर्च केला असून तो योग्य नाही, असे मत अहवालात मांडले आहे. बॅँकेने एटीएम मशीन व नोटा मोजणी मशीन खरेदी करताना नियम डावलल्याचे म्हटले आहे.या कामांमध्ये आढळली अनियमितता

केन ॲग्रो, महांकाली, वसंतदादा, महांकाली व स्वप्नपूर्ती साखर कारखान्यांना केलेला कर्जपुरवठा, २१ तांत्रिक पदांची भरती, चारशे कनिष्ठ लिपिक पदाची भरती, तत्कालीन कार्यकारी संचालक जयवंत कडू यांची नेमणूक, यशवंत कारखाना विक्री व्यवहार, डिव्हाइन फूडला दिलेले कर्ज, सरफेसी ॲक्टप्रमाणे ६ सहकारी संस्थांचा खरेदी व्यवहार, बाबासाहेब देशमुख सूतगिरणी विक्री, खानापूर तालुका सूतगिरणी विस्तारीकरण, सातारा जिल्ह्यातील गोपूज साखर कारखान्यास कर्जवाटप, एका संचालकाच्या पेट्रोल पंपास दिलेले कर्ज यासह अन्य प्रकारणात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे.

वसुली करण्याची शिफारसप्रत्येक मुद्यानुसार तत्कालीन जिल्हा बॅँकेचे पदाधिकारी, संचालक व अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून बॅँकेच्या नुकसानीची वसुली होणे आवश्यक असल्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे.बँकेची यापूर्वीही चौकशी, मात्र गैर आढळलेले नाही : दिलीप पाटीलजिल्हा बँकेची मागील साडेसात वर्षांत अनेकदा चौकशी झाली. नोटाबंदीच्या काळात ईडी, आयकरचा छापा जिल्हा बँकेवर पडला होता. चार वेळा नाबार्डनेही चौकशी केली. नोकर भरती व अन्य कारभाराचीची अनेकदा चौकशी झाली. शासकीय तसेच नाबार्ड, रिझर्व्ह बँकेचे लेखा परीक्षण सतत सुरूच असते. या सर्वच चौकशांमध्ये बँकेत काहीही गैर आढळले नाही. पण चौकशीच्या राजकारणामुळे बँकेबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहकार विभागाकडून पुन्हा चौकशी अहवाल दिला असला तरी अद्याप त्याबाबत माझ्याकडे काही माहिती आलेली नसल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक दिलीप पाटील यांनी सांगितले.

आम्ही केलेल्या सर्व तक्रारीत तथ्य आढळल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. शासनाने या अहवालाच्या आधारे तत्कालीन संचालक, अधिकारी यांच्यावर फौजदारी दाखल करावी. नुकसानीची तातडीने वसुली करावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. - सुनील फराटे, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक