शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सांगली  : टेंभू योजनेचा बांधकाम विभाग बंद, राज्यातील सात सिंचन महामंडळांची उपविभागीय कार्यालये गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:59 IST

राज्यातील सात सिंचन महामंडळांची विभागीय व उपविभागीय बांधकाम कार्यालये गुंडाळण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या बांधकाम विभागाचाही त्यात समावेश आहे. कृष्णा खोरे महामंडळाच्या अंतर्गत टेंभू उपसा सिंचन योजनेचे विभाग क्रमांक एक व पाच हे उपविभाग बंद करून टेंभू विभागीय पथकास जोडण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सांगली  : टेंभू योजनेचा बांधकाम विभाग बंदराज्यातील सात सिंचन महामंडळांची उपविभागीय कार्यालये गुंडाळली

मिरज : राज्यातील सात सिंचन महामंडळांची विभागीय व उपविभागीय बांधकाम कार्यालये गुंडाळण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या बांधकाम विभागाचाही त्यात समावेश आहे.

कृष्णा खोरे महामंडळाच्या अंतर्गत टेंभू उपसा सिंचन योजनेचे विभाग क्रमांक एक व पाच हे उपविभाग बंद करून टेंभू विभागीय पथकास जोडण्यात आले आहे.जलसंपदा विभागाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिपत्याखाली बांधकाम कार्यालये कार्यरत आहेत. सिंचन योजनांच्या बांधकाम कार्यालयास स्वतंत्र कार्यालयाचा दर्जा आहे.

यापूर्वी मोठ्याप्रमाणात प्रकल्प उभारणीची कामे सुरू असल्याने बांधकाम, यांत्रिकी व विद्युत कामे करण्यासाठी बांधकाम उपविभागीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. मात्र बहुतांश सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आल्याने सिंचन व्यवस्थापन कामासाठी बांधकाम कार्यालये व उपविभाग गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासाठी राज्यातील सिंचन प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करणे आवश्यक असल्याने, प्रकल्प उभारणीसाठी बांधकाम विभाग व उपविभागीय कार्यालयाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे जलसिंचन विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.राज्यातील सिंधुदुर्ग, सांगली, धुळे, नांदेड, नागपूर, जळगाव, कोल्हापूर येथील सात सिंचन प्रकल्पांचे बांधकाम विभाग व उपविभाग बंद करण्याचा निर्णय दि. १० जानेवारी रोजी जलसंपदा विभागाने घेतला आहे.

नवीन निर्णयानुसार बांधकाम पथकाचे मुख्यालय कामाच्या गरजेनुसार बदलणार आहे. बांधकाम पथकातील सर्व अभियंते एकाच कार्यालयात कार्यरत राहतील. संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांचा समावेश सिंचन व्यवस्थापन कार्यालयातील रिक्त पदांवर तत्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे.

नवीन कार्यालयात नियंत्रक अधिकारी म्हणून त्यांची पदस्थापना करण्यात येणार असून, दि. १ फेब्रुवारीपासून विभागीय पथक कार्यालये कार्यान्वित होणार आहेत.कामे रखडण्याची शक्यताया निर्णयामुळे टेंभू योजनेचे खानापूर, विटा, कडेगाव, कऱ्हाड, ओगलेवाडी यासह पाच बांधकाम उपविभाग बंद झाले आहेत. आस्थापना खर्चात बचतीसाठी बांधकाम कार्यालये बंद करण्यात आल्यामुळे, अपूर्ण असलेल्या सिंचन योजनांची कामे रखडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSangliसांगली