शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

सांगलीतील कारस्थानाचा योग्यवेळी वचपा काढणारच-विश्वजीत कदम

By अविनाश कोळी | Updated: April 25, 2024 20:31 IST

पडद्यामागच्या राजकारणावर काँग्रेस मेळाव्यात संताप

सांगली: लोकसभेसाठी सांगलीत वेगळे राजकारण शिजत असल्याची कल्पना आम्ही वरिष्ठ नेत्यांना दिली होती. तरीही येथील कटकारस्थान यशस्वी करण्यात काही लोक यशस्वी झाले. त्यांच्या या कटाचा वचपा योग्यवेळी काढणारच, असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी गुरुवारी काँग्रेस मेळाव्यात दिला.कदम म्हणाले, जिल्ह्यातील काँग्रेसला गेल्या पंधरा वर्षांत अनेक धक्के बसले. पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील, हाफिज धत्तुरे अशा दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने पक्षाची जबाबदारी आमच्यासारख्या तरुणांवर पडली. पूर्वी पक्षात याठिकाणी गटबाजी दिसून येत होती. मात्र, आम्ही गटबाजीला मूठमाती देऊन काँग्रेस एकसंध केली. लोकसभा निवडणुकीसाठीही एकच नाव निश्चित करुन ते पक्षाला पाठविले. हीच गोष्ट काहींना सहन झाली नाही. त्यांनी काँग्रेसच्या एकीला दृष्ट लावली. लवकरच आम्ही त्यांची ही दृष्ट उतरवू.

गेल्या एक वर्षापासून सांगली लोकसभा मतदारसंघात राजकारण शिजत होते. त्याची कल्पनाही आम्ही वरिष्ठांना दिली होती. तरीही कोण काय करीत आहे, यावर बारीक लक्ष का ठेवले गेले नाही, हा सवाल आम्हाला सतावत आहे. आम्ही पोटतिडकीने या जागेसाठी संघर्ष केला. दुसऱ्यांसाठी इतका संघर्ष का करीत आहात, असा सवाल मला काहींनी केला होता, पण माझा लढा पक्षाच्या अस्तित्वासाठी होता. त्यामुळे राज्यातील तसेच देशातील नेत्यांचा वाईटपणा मी घेतला. या काळात मी प्रचंड तणावात होतो. देशहितासाठी आघाडीसोबत राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत. त्याचे पालन आमच्याकडून केले जाईल.चौकट

पतंगरावांचे अन् माझेही गुण आहेतपतंगराव कदम स्पष्ट स्वभावाचे हाेते. वादळात दिवा लावायची त्यांना सवय होती. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याचे सांगितले जाते. माझ्यातही त्यांचे गुण आहेत, पण माझे स्वत:चेही काही गुण आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी आमच्या बाबतीत चुकीचे राजकारण केले त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sangliसांगलीcongressकाँग्रेस