शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

सांगलीतील कारस्थानाचा योग्यवेळी वचपा काढणारच-विश्वजीत कदम

By अविनाश कोळी | Updated: April 25, 2024 20:31 IST

पडद्यामागच्या राजकारणावर काँग्रेस मेळाव्यात संताप

सांगली: लोकसभेसाठी सांगलीत वेगळे राजकारण शिजत असल्याची कल्पना आम्ही वरिष्ठ नेत्यांना दिली होती. तरीही येथील कटकारस्थान यशस्वी करण्यात काही लोक यशस्वी झाले. त्यांच्या या कटाचा वचपा योग्यवेळी काढणारच, असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी गुरुवारी काँग्रेस मेळाव्यात दिला.कदम म्हणाले, जिल्ह्यातील काँग्रेसला गेल्या पंधरा वर्षांत अनेक धक्के बसले. पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील, हाफिज धत्तुरे अशा दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने पक्षाची जबाबदारी आमच्यासारख्या तरुणांवर पडली. पूर्वी पक्षात याठिकाणी गटबाजी दिसून येत होती. मात्र, आम्ही गटबाजीला मूठमाती देऊन काँग्रेस एकसंध केली. लोकसभा निवडणुकीसाठीही एकच नाव निश्चित करुन ते पक्षाला पाठविले. हीच गोष्ट काहींना सहन झाली नाही. त्यांनी काँग्रेसच्या एकीला दृष्ट लावली. लवकरच आम्ही त्यांची ही दृष्ट उतरवू.

गेल्या एक वर्षापासून सांगली लोकसभा मतदारसंघात राजकारण शिजत होते. त्याची कल्पनाही आम्ही वरिष्ठांना दिली होती. तरीही कोण काय करीत आहे, यावर बारीक लक्ष का ठेवले गेले नाही, हा सवाल आम्हाला सतावत आहे. आम्ही पोटतिडकीने या जागेसाठी संघर्ष केला. दुसऱ्यांसाठी इतका संघर्ष का करीत आहात, असा सवाल मला काहींनी केला होता, पण माझा लढा पक्षाच्या अस्तित्वासाठी होता. त्यामुळे राज्यातील तसेच देशातील नेत्यांचा वाईटपणा मी घेतला. या काळात मी प्रचंड तणावात होतो. देशहितासाठी आघाडीसोबत राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत. त्याचे पालन आमच्याकडून केले जाईल.चौकट

पतंगरावांचे अन् माझेही गुण आहेतपतंगराव कदम स्पष्ट स्वभावाचे हाेते. वादळात दिवा लावायची त्यांना सवय होती. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याचे सांगितले जाते. माझ्यातही त्यांचे गुण आहेत, पण माझे स्वत:चेही काही गुण आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी आमच्या बाबतीत चुकीचे राजकारण केले त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sangliसांगलीcongressकाँग्रेस