शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

सांगली : भारतनगरचे नागरिक स्थायीच्या सभेत घुसले; पाण्यासाठी अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 11:02 IST

सांगली शहरातील भारतनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी देणार नसाल तर बिले कशाला देता? असा सवालही त्यांनी केला.

ठळक मुद्दे भारतनगरचे नागरिक स्थायीच्या सभेत घुसले पाण्यासाठी अधिकारी धारेवर

सांगली : शहरातील भारतनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी देणार नसाल तर बिले कशाला देता? असा सवालही त्यांनी केला.स्थायी सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा सुरू होती. दुपारी साडेबारा वाजता भारतनगरमधील नागरिक, महिला पाण्याचा नियमित पुरवठा करावा, यासाठी महापालिकेत आल्या. त्यांनी थेट स्थायी समितीचे सभागृहच गाठले. सभापती सातपुते, उपायुक्त सुनील पवार यांच्यासह सदस्यांसमोर नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले.भारतनगरला तीन महिन्यांपासून अपुरे, अनियमित व कमीदाबाने पाणी येते. याबाबत तक्रारी केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून एखादा दिवस नियोजन होते, पुन्हा तीच परिस्थिती कायम आहे. नदीत मुबलक पाणी आहे, मग पाणी कुठे मुरते? तुमच्या नियोजनातच घोळ असल्याचा आरोप महिलांनी केला.

यावेळी सदस्य शिवराज बोळाज यांनीही पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना जाब विचारला. त्यानंतर मागासवर्गीय समितीच्या कार्यालयात नागरिक, नगरसेवक व उपाध्ये यांची बैठक झाली.

उपाध्ये यांनी बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत आंदोलकांना शांत केले. परंतु नागरिकांनी जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर बिलांवर बहिष्कार घालू, असा पवित्रा घेतला. त्यानंतर नागरिक व महिलांनी महापौर हारुण शिकलगार यांची भेट घेतली.

जर पाणी मिळत नसेल तर पाणीबिले पाठविणेच बंद करावे. आतापर्यंत आलेली बिले माफ करावीत, अशी मागणी केली. 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका