शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

सांगली : भारतनगरचे नागरिक स्थायीच्या सभेत घुसले; पाण्यासाठी अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 11:02 IST

सांगली शहरातील भारतनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी देणार नसाल तर बिले कशाला देता? असा सवालही त्यांनी केला.

ठळक मुद्दे भारतनगरचे नागरिक स्थायीच्या सभेत घुसले पाण्यासाठी अधिकारी धारेवर

सांगली : शहरातील भारतनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी देणार नसाल तर बिले कशाला देता? असा सवालही त्यांनी केला.स्थायी सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा सुरू होती. दुपारी साडेबारा वाजता भारतनगरमधील नागरिक, महिला पाण्याचा नियमित पुरवठा करावा, यासाठी महापालिकेत आल्या. त्यांनी थेट स्थायी समितीचे सभागृहच गाठले. सभापती सातपुते, उपायुक्त सुनील पवार यांच्यासह सदस्यांसमोर नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले.भारतनगरला तीन महिन्यांपासून अपुरे, अनियमित व कमीदाबाने पाणी येते. याबाबत तक्रारी केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून एखादा दिवस नियोजन होते, पुन्हा तीच परिस्थिती कायम आहे. नदीत मुबलक पाणी आहे, मग पाणी कुठे मुरते? तुमच्या नियोजनातच घोळ असल्याचा आरोप महिलांनी केला.

यावेळी सदस्य शिवराज बोळाज यांनीही पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना जाब विचारला. त्यानंतर मागासवर्गीय समितीच्या कार्यालयात नागरिक, नगरसेवक व उपाध्ये यांची बैठक झाली.

उपाध्ये यांनी बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत आंदोलकांना शांत केले. परंतु नागरिकांनी जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर बिलांवर बहिष्कार घालू, असा पवित्रा घेतला. त्यानंतर नागरिक व महिलांनी महापौर हारुण शिकलगार यांची भेट घेतली.

जर पाणी मिळत नसेल तर पाणीबिले पाठविणेच बंद करावे. आतापर्यंत आलेली बिले माफ करावीत, अशी मागणी केली. 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका