शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

सांगली :  ​ढोबळी मिरचीचे दर घसरले; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 18:46 IST

मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुपये मिळणारा दर सध्या सहा ते आठ रुपयावर आला आहे. उत्पादन खर्चच प्रतिकिलो चार ते सहा रुपये येत आहे. उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देढोबळी मिरचीचे दर घसरले; शेतकरी हवालदिलकिलोला सहा ते आठ रुपये दर लाखोंचा खर्च वाया जाण्याचे संकेत

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुपये मिळणारा दर सध्या सहा ते आठ रुपयावर आला आहे. उत्पादन खर्चच प्रतिकिलो चार ते सहा रुपये येत आहे. उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.भर उन्हाळा असताना मल्चिंग पेपर, ठिबक, औषधे, खते, मजुरीवर प्रतिएकरी एक लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना खर्च येत आहे. उन्हाळ्यामुळे उत्पादनही घसरले आहे. यात भर म्हणून पुन्हा राज्यातील सर्व बाजारात ढोबळी मिरचीचे दर घसरले आहेत. मुंबई, पुणे येथील बाजारपेठेत प्रतिकिलो ३० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत होता. सध्या केवळ प्रतिकिलोला सहा ते आठ रुपये दर मिळत आहे.

उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बांधावरच ढोबळी मिरची टाकण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक खर्चही मोठ्याप्रमाणात असल्यामुळे ढोबळी मिरची मुंबई, पुणे येथील बाजारपेठेपर्यंत अल्पदरात पाठवणे परवडत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

जिल्ह्यातील मिरज पश्चिम भागामध्ये तुंग, कसबे डिग्रज, आष्टा, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, पलूस, आटपाडी, तासगाव, कडेगाव तालुक्यातही शेतकरी ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत आहे. यामुळे या सर्वच शेतकऱ्यांना दर घसरल्याचा फटका बसला आहे.

व्यापाºयांच्या मनमानी कारभाराकडे कृषीमंत्र्यांनीच लक्ष द्यावेमुंबई, पुण्यासह राज्यातील बाजार पेठेतील दलाली शासनाने बंद केली आहे. यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. येथील बाजारपेठेत दलालाने सौदे बंद केल्यामुळे ढोबळी मिरचीचे दर घसरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दलाल आणि व्यापारी एकत्रित येऊनच शेतीमालाचे दर पाडत असल्यामुळे यांचा बंदोबस्त कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी करावा, अशी मागणीही शेतकरी करू लागले आहेत.​

टॅग्स :Sangliसांगलीvegetableभाज्या