शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :  ​ढोबळी मिरचीचे दर घसरले; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 18:46 IST

मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुपये मिळणारा दर सध्या सहा ते आठ रुपयावर आला आहे. उत्पादन खर्चच प्रतिकिलो चार ते सहा रुपये येत आहे. उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देढोबळी मिरचीचे दर घसरले; शेतकरी हवालदिलकिलोला सहा ते आठ रुपये दर लाखोंचा खर्च वाया जाण्याचे संकेत

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुपये मिळणारा दर सध्या सहा ते आठ रुपयावर आला आहे. उत्पादन खर्चच प्रतिकिलो चार ते सहा रुपये येत आहे. उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.भर उन्हाळा असताना मल्चिंग पेपर, ठिबक, औषधे, खते, मजुरीवर प्रतिएकरी एक लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना खर्च येत आहे. उन्हाळ्यामुळे उत्पादनही घसरले आहे. यात भर म्हणून पुन्हा राज्यातील सर्व बाजारात ढोबळी मिरचीचे दर घसरले आहेत. मुंबई, पुणे येथील बाजारपेठेत प्रतिकिलो ३० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत होता. सध्या केवळ प्रतिकिलोला सहा ते आठ रुपये दर मिळत आहे.

उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बांधावरच ढोबळी मिरची टाकण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक खर्चही मोठ्याप्रमाणात असल्यामुळे ढोबळी मिरची मुंबई, पुणे येथील बाजारपेठेपर्यंत अल्पदरात पाठवणे परवडत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

जिल्ह्यातील मिरज पश्चिम भागामध्ये तुंग, कसबे डिग्रज, आष्टा, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, पलूस, आटपाडी, तासगाव, कडेगाव तालुक्यातही शेतकरी ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत आहे. यामुळे या सर्वच शेतकऱ्यांना दर घसरल्याचा फटका बसला आहे.

व्यापाºयांच्या मनमानी कारभाराकडे कृषीमंत्र्यांनीच लक्ष द्यावेमुंबई, पुण्यासह राज्यातील बाजार पेठेतील दलाली शासनाने बंद केली आहे. यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. येथील बाजारपेठेत दलालाने सौदे बंद केल्यामुळे ढोबळी मिरचीचे दर घसरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दलाल आणि व्यापारी एकत्रित येऊनच शेतीमालाचे दर पाडत असल्यामुळे यांचा बंदोबस्त कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी करावा, अशी मागणीही शेतकरी करू लागले आहेत.​

टॅग्स :Sangliसांगलीvegetableभाज्या