शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : शाळा बंद केल्यास मुले गुलाम बनतील : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 21:17 IST

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली; पण आजचे सरकार २० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देसांगलीत ‘कर्मवीर भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम

सांगली : शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली; पण आजचे सरकार २० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शाळा बंद केल्यास गरिबांची मुले गुलाम बनतील. शाळा बंद करून देशाला गुलामांची गरज भासविण्याचा उद्योग केला जात आहे, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगलीत केला.

येथील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘कर्मवीर भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, इंद्रजित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

खा. शेट्टी म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर गोरगरीब, दीनदलितांची मुले शिकावीत, यासाठी अपार कष्ट घेतले. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आजही त्यांनी उभा केलेल्या संस्थेत हजारो मुले शिक्षण घेत आहेत. आजचे सरकार २० हजार शाळांना कायमस्वरुपी कुलूप ठोकायला निघाले आहे. शाळा बंद झाल्या तर या देशात गरिबांच्या मुलांना शिक्षणच मिळणार नाही.

शिक्षणाअभावी त्यांच्या पोटी गुलामच जन्माला येतील. शाळा बंदीचा सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे.हुतात्मा संकुलाचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांना ‘कर्मवीर विद्याभूषण’पुरस्कार, सागर वडगावे यांना ‘कर्मवीर उद्योगभूषण’ पुरस्कार, तर डॉ. भालचंद्र शिरगावे यांना ‘कर्मवीर कृषीभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खा. पाटील, आ. खाडे व महापौर खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते दीपप्रज्वनल करून पुरस्कार प्रदान कार्यक्रमास प्रारंभ झाला. कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले. कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी ट्रस्टविषयी माहिती दिली. यावेळी मूकबधिर मुलांच्या शाळेला संगणक प्रदान करण्यात आला. कर्मवीर पतसंस्थेचे संचालक ए. के. चौगुले यांनी आभार मानले.शाळा बंदच्या निर्णयास विरोधशेट्टी म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात कर्मवीर अण्णांचे एक टक्का जरी गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा वैचारिक वारसा चालवत असल्याचे समाधान मिळेल. शाळा बंदच्या निर्णयास विरोध केला जाईल. गरिबांची मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीzp schoolजिल्हा परिषद शाळा