शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

सांगली : शाळा बंद केल्यास मुले गुलाम बनतील : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 21:17 IST

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली; पण आजचे सरकार २० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देसांगलीत ‘कर्मवीर भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम

सांगली : शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली; पण आजचे सरकार २० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शाळा बंद केल्यास गरिबांची मुले गुलाम बनतील. शाळा बंद करून देशाला गुलामांची गरज भासविण्याचा उद्योग केला जात आहे, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगलीत केला.

येथील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘कर्मवीर भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, इंद्रजित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

खा. शेट्टी म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर गोरगरीब, दीनदलितांची मुले शिकावीत, यासाठी अपार कष्ट घेतले. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आजही त्यांनी उभा केलेल्या संस्थेत हजारो मुले शिक्षण घेत आहेत. आजचे सरकार २० हजार शाळांना कायमस्वरुपी कुलूप ठोकायला निघाले आहे. शाळा बंद झाल्या तर या देशात गरिबांच्या मुलांना शिक्षणच मिळणार नाही.

शिक्षणाअभावी त्यांच्या पोटी गुलामच जन्माला येतील. शाळा बंदीचा सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे.हुतात्मा संकुलाचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांना ‘कर्मवीर विद्याभूषण’पुरस्कार, सागर वडगावे यांना ‘कर्मवीर उद्योगभूषण’ पुरस्कार, तर डॉ. भालचंद्र शिरगावे यांना ‘कर्मवीर कृषीभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खा. पाटील, आ. खाडे व महापौर खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते दीपप्रज्वनल करून पुरस्कार प्रदान कार्यक्रमास प्रारंभ झाला. कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले. कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी ट्रस्टविषयी माहिती दिली. यावेळी मूकबधिर मुलांच्या शाळेला संगणक प्रदान करण्यात आला. कर्मवीर पतसंस्थेचे संचालक ए. के. चौगुले यांनी आभार मानले.शाळा बंदच्या निर्णयास विरोधशेट्टी म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात कर्मवीर अण्णांचे एक टक्का जरी गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा वैचारिक वारसा चालवत असल्याचे समाधान मिळेल. शाळा बंदच्या निर्णयास विरोध केला जाईल. गरिबांची मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीzp schoolजिल्हा परिषद शाळा