शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

सांगली : शाळा बंद केल्यास मुले गुलाम बनतील : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 21:17 IST

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली; पण आजचे सरकार २० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देसांगलीत ‘कर्मवीर भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम

सांगली : शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली; पण आजचे सरकार २० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शाळा बंद केल्यास गरिबांची मुले गुलाम बनतील. शाळा बंद करून देशाला गुलामांची गरज भासविण्याचा उद्योग केला जात आहे, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगलीत केला.

येथील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘कर्मवीर भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, इंद्रजित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

खा. शेट्टी म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर गोरगरीब, दीनदलितांची मुले शिकावीत, यासाठी अपार कष्ट घेतले. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आजही त्यांनी उभा केलेल्या संस्थेत हजारो मुले शिक्षण घेत आहेत. आजचे सरकार २० हजार शाळांना कायमस्वरुपी कुलूप ठोकायला निघाले आहे. शाळा बंद झाल्या तर या देशात गरिबांच्या मुलांना शिक्षणच मिळणार नाही.

शिक्षणाअभावी त्यांच्या पोटी गुलामच जन्माला येतील. शाळा बंदीचा सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे.हुतात्मा संकुलाचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांना ‘कर्मवीर विद्याभूषण’पुरस्कार, सागर वडगावे यांना ‘कर्मवीर उद्योगभूषण’ पुरस्कार, तर डॉ. भालचंद्र शिरगावे यांना ‘कर्मवीर कृषीभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खा. पाटील, आ. खाडे व महापौर खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते दीपप्रज्वनल करून पुरस्कार प्रदान कार्यक्रमास प्रारंभ झाला. कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले. कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी ट्रस्टविषयी माहिती दिली. यावेळी मूकबधिर मुलांच्या शाळेला संगणक प्रदान करण्यात आला. कर्मवीर पतसंस्थेचे संचालक ए. के. चौगुले यांनी आभार मानले.शाळा बंदच्या निर्णयास विरोधशेट्टी म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात कर्मवीर अण्णांचे एक टक्का जरी गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा वैचारिक वारसा चालवत असल्याचे समाधान मिळेल. शाळा बंदच्या निर्णयास विरोध केला जाईल. गरिबांची मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीzp schoolजिल्हा परिषद शाळा