शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सांगली : शाळा बंद केल्यास मुले गुलाम बनतील : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 21:17 IST

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली; पण आजचे सरकार २० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देसांगलीत ‘कर्मवीर भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम

सांगली : शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली; पण आजचे सरकार २० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शाळा बंद केल्यास गरिबांची मुले गुलाम बनतील. शाळा बंद करून देशाला गुलामांची गरज भासविण्याचा उद्योग केला जात आहे, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगलीत केला.

येथील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘कर्मवीर भूषण’ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, इंद्रजित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

खा. शेट्टी म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर गोरगरीब, दीनदलितांची मुले शिकावीत, यासाठी अपार कष्ट घेतले. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आजही त्यांनी उभा केलेल्या संस्थेत हजारो मुले शिक्षण घेत आहेत. आजचे सरकार २० हजार शाळांना कायमस्वरुपी कुलूप ठोकायला निघाले आहे. शाळा बंद झाल्या तर या देशात गरिबांच्या मुलांना शिक्षणच मिळणार नाही.

शिक्षणाअभावी त्यांच्या पोटी गुलामच जन्माला येतील. शाळा बंदीचा सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे.हुतात्मा संकुलाचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांना ‘कर्मवीर विद्याभूषण’पुरस्कार, सागर वडगावे यांना ‘कर्मवीर उद्योगभूषण’ पुरस्कार, तर डॉ. भालचंद्र शिरगावे यांना ‘कर्मवीर कृषीभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खा. पाटील, आ. खाडे व महापौर खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते दीपप्रज्वनल करून पुरस्कार प्रदान कार्यक्रमास प्रारंभ झाला. कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले. कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी ट्रस्टविषयी माहिती दिली. यावेळी मूकबधिर मुलांच्या शाळेला संगणक प्रदान करण्यात आला. कर्मवीर पतसंस्थेचे संचालक ए. के. चौगुले यांनी आभार मानले.शाळा बंदच्या निर्णयास विरोधशेट्टी म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात कर्मवीर अण्णांचे एक टक्का जरी गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा वैचारिक वारसा चालवत असल्याचे समाधान मिळेल. शाळा बंदच्या निर्णयास विरोध केला जाईल. गरिबांची मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीzp schoolजिल्हा परिषद शाळा