शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Sangli: देशातील सहकार क्षेत्र कमकुवत करण्याचे केंद्र शासनाचे षडयंत्र, एच. के. पाटील यांची घणाघाती टीका

By शीतल पाटील | Updated: February 20, 2023 16:10 IST

Sangli News: सहकार चळवळीमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा विकास झाला. महाराष्ट्र तर सहकाराची काशी म्हणून ओळखली जाते. पण आता हे सहकार क्षेत्र कमकुवत करण्याचे षडयंत्र केंद्र शासनाने सुरू केले आहे.

- शीतल पाटील 

सांगली : सहकार चळवळीमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा विकास झाला. महाराष्ट्र तर सहकाराची काशी म्हणून ओळखली जाते. पण आता हे सहकार क्षेत्र कमकुवत करण्याचे षडयंत्र केंद्र शासनाने सुरू केले आहे. सहकार क्षेत्राकडील दीड लाख कोटी रुपये शासनाकडे वळविण्यात आले आहेत. याविरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे प्रभारी आमदार एच. के. पाटील यांनी सांगितले.

सांगलीत सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या फतव्यानुसार सहकार खात्याने एक लाख पन्नास हजार कोटी रुपये शासनाकडे वळते केले आहेत. हे सहकार कमकुवत करण्याचे षडयंत्र आहे. याविरोधात आवाज उठवायला हवा. ज्या राज्यांत सहकार नाही, त्या राज्यांची प्रगती झालेली नाही, हे सत्य आहे. प्रत्येक राज्यकर्त्यांनी, धोरणाकर्त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे. सांगलीतील नेत्यांनी सहकार क्षेत्राला खूप मोठे योगदान दिले. शरद पवार यांनी सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी पायाभूत भूमिका घेतली. पण सध्याचे केंद्रातील सरकार खासगीकरणाला चालना देत असल्याची टीका पाटील यांनी केली.

अमित शाहांवर टीकाआता सहकार चुकीच्या दिशेने चालला आहे. त्याला बदनाम केले जात आहे. ज्यांना सहकाराचा काहीच गंध नाही, असे लोक महाराष्ट्रात येऊन सहकारावर बाष्कळ बोलू लागले आहेत. सहकार मोडण्याचा त्यांचा उद्देश असल्याची टीका एच. के. पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे नाव न घेता केली.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगली