शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

सांगली :  आश्वासनांचे गाजर...हवेत बुडबुडे.. अन् शंभर कोटीचा लाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 18:00 IST

आश्वासनांची गाजरे...पाण्याचे बुडबुडे... शंभर कोटीचा लाडू आणि हवेत फुगे सोडत सोमवारी सांगली महापालिकेसमोर विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप सत्तेच्या शंभर दिवसातील कारभाराचा पंचनामा केला.

ठळक मुद्देभाजप सत्तेची शंभरी : काँग्रेस-राष्ट्रवादीचे सांगली महापालिकेसमोर अभिनव आंदोलनशंभर दिवस पुर्ण झाले. या कालावधीत एकही काम मार्गी लागले नाही. विकासात्मक एकही निर्णय झालेला नाही

सांगली : आश्वासनांची गाजरे...पाण्याचे बुडबुडे... शंभर कोटीचा लाडू आणि हवेत फुगे सोडत सोमवारी सांगली महापालिकेसमोर विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप सत्तेच्या शंभर दिवसातील कारभाराचा पंचनामा केला. महापालिकेतील भाजप सत्ताधाºयामुळे नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. साथीच्या आजाराने नागरिकांचे बळी जात आहे. तरीही पारदर्शी कामाचा ढोंगीपणा सुरू असल्याचा आरोप  करून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. 

या आंदोलनात विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील,मंगेश चव्हाण, वहिदा नायकवडी, रोहिणी पाटील, वर्षा निंबाळकर, आरती वळवडे, मदिना बारुदवाले, फिरोज पठाण, मनोज सरगर, शुभांगी सांळुखे, करण जामदार, उमेश पाटील, राष्ट्रवादीचे शेठजी मोहिते, योगेंद्र थोरात, संगीता हारगे आदी सहभागी झाले होते. भाजप सत्ताधाºयांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हातात आश्वासनांचे गाजर दाखवत ,पाण्याचे बुडबुडे व हवेत फुगे सोडत आंदोलक सहभागी झाले होते. महापालिका सत्तेत येऊन शंभर दिवस पुर्ण झाल्यानंतर ही नागरी सुविधांबाबत काहीही केले नाही. कचरा उठाव नाही, औषध फवारणी नाही, विकास कामाचे तसेच पारदर्शी कामाचे गाजर दाखवत भाजप सत्ताधाºयांनी सत्ता मिळवली. मात्र आश्वासनांचा लाडू आरशातच दिसल्याचा आरोपही करण्यात आला. 

यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले,भाजपाची महापालिकेत सत्ता येवून शंभर दिवस पुर्ण झाले. या कालावधीत एकही काम मार्गी लागले नाही. विकासात्मक एकही निर्णय झालेला नाही. उलट प्रशासन सत्ताधाºयांचे ऐकेना अशी स्थिती निर्माण झाल्याने शहरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासन आणि सत्ताधारी वादात उद्याने भकास झाली आहेत. कचरा उठाव ठप्प झाला आहे. साथीचे आजार पसरले आहेत. घरटी एक व्यक्ती आजारी आहे. शहर सुधारण्याचा विडा उचलणाºया भाजपला पहिल्या शंभर दिवसात नागरी प्रश्नही सोडवता आले नाही. प्रशासनावर वचक राहिला नाही. भाजपचे नेते अपयशी ठरले आहेत. नागरीकांना शंभर कोटीचा आणखी एक लाडू दाखवत आहे. जनतेसमोर हे मांडण्यासाठीच आम्ही आंदोलन केल्याचे सांगितले. नगरसेवकांची घोषणाबाजीशंभर दिवस पूर्ण झाले, सत्ताधाºयांना साधी ट्युब बसविली नाही, डेंग्यु आणि स्वाईल फ्ल्यूनी जीव नको केला, पण यांचे सोयरेसुतक नाही या भाजपवाल्यांना, रस्ते, गटारी, नाला, मंडई, कामे थांबलेली, उद्यानामधील झाडे ही वाळलेली, शंभर दिवस पुर्ण झाले सत्ताधाºयांना,अशा घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिल्या.

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगली