शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

सांगली भू-विकास बँकेच्या थकबाकीदार कर्जदारांना १0९ कोटीची सवलत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:56 IST

सांगली येथील भू-विकास बँकेच्या थकबाकीदार १ हजार ६७२ कर्जदारांसाठी सहकार विभागाने पुन्हा एकरकमी परतफेड योजना जाहीर केली असून याअंतर्गत १0९ कोटी रुपयांची माफी दिली जाणार आहे. योजना जाहीर करून, कारवाईचे इशारे देऊनही थकबाकीदारांनी बँकेला ठेंगा दाखविणे सुरूच ठेवले आहे. 

ठळक मुद्दे१ हजार ६७२ थकबाकीदार कर्जदारांसाठी पुन्हा एकरकमी परतफेड योजना २८ फेब्रुवारी २0१८ पर्यंतची ‘डेडलाईन’ सात-बारा उताऱ्यावरील बँकेचा बोजा होणार कमी

सांगली  , दि. २६ : येथील भू-विकास बँकेच्या थकबाकीदार १ हजार ६७२ कर्जदारांसाठी सहकार विभागाने पुन्हा एकरकमी परतफेड योजना जाहीर केली असून याअंतर्गत १0९ कोटी रुपयांची माफी दिली जाणार आहे. योजना जाहीर करून, कारवाईचे इशारे देऊनही थकबाकीदारांनी बँकेला ठेंगा दाखविणे सुरूच ठेवले आहे. 

सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेसाठी सहकार विभागाने एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत ३१ मार्च २0१८ ची मुदत दिली आहे. यासाठी थकबाकीदार कर्जदाराला २८ फेब्रुवारी २0१८ पर्यंतची ‘डेडलाईन’ दिली आहे. सांगली भू-विकास बँकेचे एकूण १ हजार ८६0 सभासद थकबाकीत आहेत.

हे सर्वच थकबाकीदार एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र ठरतात. त्यांची एकूण थकबाकी सध्या १३२ कोटी ५0 लाख ३५ हजार ५८१ रुपये आहे. यातील एकूण १0९ कोट ८२ लाख ४३ हजार ३४२ रुपयांची सवलत एकरकमी परतफेड योजनेतून मिळणार आहेत. म्हणजेच केवळ ३१ कोटी ८१ लाख ५८ हजार ४0 रुपयेच थकबाकीदारांना भरावे लागणार आहेत. संबंधित कर्जदारांनी ही रक्कम जमा केल्यास त्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील बँकेचा बोजा कमी होणार आहे. 

बँकेने एकीकडे सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असले तरी जे थकबाकीदार योजना जाहीर करूनही रक्कम भरणार नाहीत त्यांच्यावर सहकार अधिनियमातील कलम १३७ अन्वये कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. सांगली भू-विकास बँकेला शासनाच्या सुचनेनुसार २00७ ते २0१७ या कालावधित अनेकवेळा थकबाकीदार कर्जदारांसाठी सवलतींच्या योजना जाहीर करण्यात आल्या. या सवलींच्या फरकाची रक्कम ५0 कोटींच्या घरात गेली आहे. आता नव्या योजनेमुळेही त्यात आणखी भर पडू शकते.

फरकाची ही रक्कम कधीही शासनाने जिल्हा भू-विकास बँकेला दिलेली नाही. राज्यातील सर्व जिल्हा भू-विकास बँकांना वारंवार मागणी करूनही ही रक्कम मिळाली नाही. तरीही या बँका शासनाच्या एकरकमी सवलत योजनेची अंमलबजावणी करीत आहेत. यंदाही नव्या आदेशाचे पालन सुरू करण्यात आले आहे.

जिल्हा भू-विकास बँकेचे प्रशासक प्रकाश आष्टेकर यांनी थकबाकीदारांना आवाहन केले आहे की, सर्वच पात्र कर्जदारांनी मुदतीत अर्ज करून सवलत वगळता अन्य थकबाकी भरावी, अन्यथा त्यांच्यावरील कारवाई अटळ आहे. एकरकमी सवलत योजनेची ही शेवटची संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :bankबँकSangliसांगली