शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

सांगली बाजार समिती निवडणूक: ‘संजयकाका पॅटर्न’मुळे नेते झाले सावध, जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

By अशोक डोंबाळे | Updated: March 24, 2023 13:31 IST

भाजपचे खासदार संजय पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत आणि पंचायत समितीत विरोधकांचे बहुमत असतानाही सत्तांतर केले

अशोक डोंबाळेसांगली : भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सांगली बाजार समिती, कवठेमहांकाळ नगरपंचायत आणि पंचायत समितीत विरोधकांचे बहुमत असतानाही सत्तांतर केले. याच ‘संजयकाका पॅटर्न’मुळे काही नेत्यांनी सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे माजी मंत्री अजितराव घाेरपडे, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे लक्ष आहे.बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून, दि. ३० एप्रिलरोजी मतदान आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून प्राथमिक चर्चा सुरू आहेत. आ. जयंत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील (अंजनी), घोरपडे, जगताप यांचे एक पॅनेल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या स्वतंत्र पॅनेलची चर्चा आहे. भाजपचे खासदार पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे काय निर्णय घेतात, याकडे भाजपच्या नेत्यांचे लक्ष आहे. बाजार समितीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होणार नाही, त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते सोयीच्या आघाडीत सहभागी होतील, असे सध्याचे चित्र आहे.मागील निवडणुकीत दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि घोरपडे समर्थकांचे बहुमत होते. पण, त्यानंतर बाजार समितीत सत्तेचा बाजार झाला. खा. पाटील यांनी काही संचालकांना हाताशी धरून त्यांचे समर्थक दिनकर पाटील यांना सभापती केले. पुढे दिनकर पाटील राष्ट्रवादीत गेले. सत्तेच्या या बाजारावर घोरपडे, जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे. कवठेमहांकाळ पंचायत समिती आणि नगरपंचायतीमधील सत्तांतराची सल घोरपडे यांना असल्यामुळे ते खा. पाटील यांच्याबद्दल सावध भूमिका घेतील. घोरपडे यांच्या भूमिकेप्रमाणे जगतापही खासदारांच्या भूमिकेला कंटाळले आहेत. त्यामुळे खासदार असतील तेथे न जाण्याची अलिखित भूमिका घोरपडे व जगताप यांनी घेतली आहे.

गद्दारांना उमेदवारी नाही : अजितराव घोरपडेनिवडून आणायचे आम्ही आणि नंतर दुसरीकडे जाणाऱ्या गद्दारांना बाजार समितीसाठी उमेदवारी देणार नाही. प्रामाणिक, निष्ठावंतालाच संधी दिली जाईल, अशी स्पष्ट भूमिका अजितराव घोरपडे यांनी मांडली. गद्दारी करणाऱ्या नेत्यांच्या संगतीलाही आपण जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुरघोड्यांच्या राजकारणापासून सावध : विलासराव जगतापउमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही शक्ती पणाला लावतो, निवडून आल्यानंतर दुसराच नेतृत्व करतो, हे यापुढे खपवून घेणार नाही. सांगली बाजार समितीची निवडणूक पक्षीय चिन्हावर होणार नाही. समविचारी नेतृत्वाबरोबर आघाडी करून पॅनेल तयार होईल, अशी प्रतिक्रिया विलासराव जगताप यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटील