शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

सांगली : शेतकऱ्यांच्या खात्यावर ८० टक्के एफआरपी, प्रति टन पहिला हप्ता २२०० ते २५०० रुपये मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 14:16 IST

सांगली : साखरेचे दर पडल्याने मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना ऊसबिले मिळालेली नाहीत. साखर सहसंचालकांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखानदारांनी एफआरपीच्या ...

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा तोडगा प्रति टन पहिला हप्ता २२०० ते २५०० रुपये मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यावर ८० टक्के एफआरपी

सांगली : साखरेचे दर पडल्याने मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना ऊसबिले मिळालेली नाहीत. साखर सहसंचालकांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्के रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर गुरुवार दि. २० पासून वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कारखानदारांनी मोबाईलद्वारे एकमेकांशी संपर्क करून ८०:१०:१० फॉर्म्युल्यावर तोडगा काढला आहे. एफआरपीच्या ८० टक्केनुसार २२०० ते २५०० रुपयांपर्यंतची रक्कम प्रति टन पहिल्या हप्त्यानुसार शेतकऱ्यांना मिळेल.जिल्ह्यात साखर कारखान्यांचे गाळप सुरु होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करीत एकाही साखर कारखान्याने अद्याप उसाचे बिल दिलेले नाही. जिल्ह्यात एफआरपीचे सुमारे ६२४ कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायदा १९६६ चे उल्लंघन केले आहे.

या कारणांमुळे राजारामबापू साखराळे, वाटेगाव युनिट, सर्वोदय युनिट, हुतात्मा, क्रांती, सोनहिरा आणि दत्त इंडिया सांगली या कारखान्यांनी दि. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंतची ऊसबिले दिली नसल्याने, प्रादेशिक साखर सहसंचालकांनी नोटिसा बजाविल्या होत्या.

राजारामबापू, हुतात्मा, क्रांती, सोनहिरा आणि दत्त इंडियाच्या कार्यकारी संचालकांनी साखर सहसंचालकांपुढे लेखी खुलासा सादर केला आहे. दोन दिवसात ऊसबिले देण्यास सुरुवात करावी, अन्यथा साखर आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.म्हणूनच जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी मोबाईलद्वारेच एकमेकांशी संपर्क करुन, पहिल्या टप्प्यामध्ये एफआरपीच्या ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर गुरुवार दि. २० पासून जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित २० टक्के एफआरपीचे १०:१० असे दोन टप्पे केले आहेत.

हंगामाच्या सुरुवातीस साखर प्रति क्विंटल ३२०० ते ३३०० रुपये असा दर होता. म्हणून हंगाम सुरु होताना कारखानदारांनी एफआरपी एकरकमी देण्याचे जाहीर केले. मात्र कालांतराने साखरेच्या दरात घसरण सुरु झाली. सध्या साखरेचे दर २९०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

यामुळेच उसाची एफआरपी देण्यात कारखान्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागील आठवड्यात राज्य बँकेने साखरेचे मूल्यांकन तीन हजार रुपये केले आहे. बँकांकडून ८५ टक्के उचल दिली जाते, ही रक्कम सुमारे २५५० रुपये होते. यापैकी कर्जाचे पाचशे रुपये व्याजासाठी बँका कपात करुन घेत असल्यामुळे, कारखान्यांच्या हातात ऊस बिलासाठी दोन हजार रुपयेच राहतात.त्यामुळे एफआरपीतील ८० टक्के रक्कम देण्यासाठी पैशाची तरतूद कारखान्यांना करावी लागणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उसाची एफआरपी एकरकमी देण्यासाठी सरकार मदत करेल, अशी घोषणा गळीत हंगामाच्या सुरुवातीस केली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा पाळली नसल्यामुळे कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केले आहेत.

साखर कारखान्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन, शासनाने मदत करावी, असे साकडे घातले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत.कारवाईचा बडगा उगारल्याने कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्के रक्कम पहिल्या हप्त्यापोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. एफआरपीची उर्वरित २० टक्के रक्कम दोन टप्प्यात देण्याचा तोडगा काढला आहे.जून २०१९ मध्ये १० टक्के आणि उर्वरित १० टक्के दिवाळीला देण्यावर कारखानदारांमध्ये एकमत झाले आहे.जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीच्या ८० टक्केनुसार पहिल्या टप्प्यात कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन २२०० ते २५०० रुपये जमा होणार आहेत. कारखानदार बँकांकडे शेतकऱ्यांची यादी आणि त्यांची रक्कम जमा करणार आहेत. दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्षात पैसे जमा होणार आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली