शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सांगलीत कॉँग्रेसचा मूक मोर्चा, निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:12 IST

केंद्रातील भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध म्हणून सांगली शहर जिल्हा कॉँग्रेसच्यावतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देपदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाळला ‘विश्वासघात दिन’

सांगली : केंद्रातील भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध म्हणून सांगली शहर जिल्हा कॉँग्रेसच्यावतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला. दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत म्हणून कार्यकर्त्यांनी ‘विश्वासघात दिन’ पाळला.

सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. मारुती रोड, हरभट रोड, राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप झाला. मूक मोर्चा संपल्यानंतर स्टेशन चौकात पृथ्वीराज पाटील म्हणाले, भाजपने देशभरातील जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आम्ही आजचा दिवस विश्वासघात दिन म्हणून पाळला आहे. निवडणुकीपूर्वी अनेकप्रकारची आश्वासने या सरकारने जनतेला दिली होती,

मात्र सत्ता मिळाल्यावर त्यांना याचा विसर पडला. गेल्या चार वर्षात केंद्र सरकार महागाई कमी करण्यात, बेरोजगारांना रोजगार देण्यात अपयशी ठरले. इंधन दरवाढीने तर सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारने केले. जनतेच्या हिताचे एकही धोरण सरकारने राबविले नाही.मोर्चात जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासह नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील, दिलीप पाटील, शेवंता वाघमारे, राजन पिराळे, बिपीन कदम, मदनभाऊ युवा मंचचे अमोल झांबरे, प्रकाश मुळके, संजय पवार, अमित पारेकर, कय्युम पटवेगार, रवींद्र खराडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या चार वर्षांच्या अपयशी कारभाराचा निषेध व्यक्त करीत कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने शनिवारी सांगलीत जोरदार निदर्शने करण्यात आली.येथील कॉँग्रेस भवनसमोर आंदोलन करण्यात आले. महिला कॉँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ‘जगण्यासाठी भाषण नाही, राशन द्या’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके, वर पाय’ अशा घोषणा देत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी शैलजाभाभी पाटील म्हणाल्या की, केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाली तरी सामान्य माणसांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. रेशनिंगपासून रोजगारापर्यंत सर्व स्तरावर सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला यांच्यावर अन्यायाचे धोरण सरकार राबविताना दिसत आहे.आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वहिदा नायकवडी, राजश्री मालवणकर, नगरसेविका अश्विनी कांबळे, सुजाता हुद्दार, श्वेता शेठ, बेबी शेख, शमशाद नायकवडी, सुलोचना माने, रजिया अन्सारी आदी सहभागी झाल्या होत्या.डिस्ट्रॉय इन इंडिया : पृथ्वीराज पाटीलपृथ्वीराज पाटील म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. व्यापार, उद्योग मंदीत गेला. नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाचा आर्थिक विकास दर खालावला. या निर्णयाचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास झाला. शासनाची ‘मेक इन इंडिया’ योजना फेल गेली असून, ती आता ‘डिस्ट्रॉय इन इंडिया’ अशी बनली आहे. गेल्या चार वर्षात सर्वच पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. 

महिलांवरील अत्याचार वाढले : शैलजाभाभी पाटीलशैलजाभाभी पाटील म्हणाल्या की, देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना या सरकारच्या काळात वाढल्या आहेत. अत्याचार करणाºया नराधमांना अटक करून त्यांना शिक्षा करण्यासाठी सरकारचे कोणतेही प्रयत्न दिसत नाहीत. असे नराधम खुलेआम फिरत आहेत. त्यांना सरकारचे अभय मिळत असल्याचा संशय वाटत आहे. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांप्रमाणेच समाजातील एकही घटक आज या भाजप सरकारच्या काळात सुखी दिसत नाही. त्यामुळे आम्ही अशा अपयशी सरकारचा निषेध करीत आहोत.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसMorchaमोर्चा