शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
4
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
5
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
6
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
7
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
8
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
9
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
10
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
11
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
12
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
13
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
14
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
15
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
16
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
17
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
18
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
19
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराव भिडे यांचा मनुवादी चेहरा उघड विवेक कांबळे : चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:55 IST

सांगली : अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असे म्हणत शिवप्रतिष्ठानचे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनीच लोकशाहीचा खून केला.

सांगली : अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असे म्हणत शिवप्रतिष्ठानचे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनीच लोकशाहीचा खून केला. अशाप्रकारच्या वक्तव्यातून त्यांचा मनुवादी चेहरा सर्वांसमोर आला आहे, अशी टीका आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी महापौर विवेक कांबळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

कांबळे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेने दलितांसह तब्बल ५९ जातींना अ‍ॅट्रॉसिटीनुसार न्याय्य हक्काचा अधिकार दिला आहे. असे असताना भिडे यांनी या कायद्यावरच टीका केली. त्यांना जाती-जातीत भांडणे लावून चातुर्वर्णीय व्यवस्थेचा पुरस्कार करीत मनुवादी राज्य आणायचे आहे. कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने जाती-धर्मात भांडणे लावणारी ही प्रवृत्ती वेळीच रोखली पाहिजे. कोरेगाव-भीमा व सांगलीतही घडलेल्या तोडफोडीच्या घटना निंदनीय आहेत, पण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला, तर भिडे आणि मिलिंद एकबोटे हेच दोषी आहेत, हे दिसून येईल. त्यांच्यावर दंगली भडकविण्याचे आरोप झाले आहेत. तसे गुन्हेही दाखल झाले आहेत. असे असताना भिडे यांनी जनतेची दिशाभूल करीत अ‍ॅट्रॉसिटीसारख्या घटनात्मक अधिकारालाही नावे ठेवून या प्रकाराला वेगळे वळण देण्याचा उद्योग सुरू केला आहे.

कांबळे म्हणाले की, लोकांना दोनवेळच्या पोटाची भ्रांत आहे, बेकारीचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत भिडे कधीच बोलत नाहीत. उलट चारशे-पाचशे वर्षांपूर्वीच्या इतिहासात मोडतोड करून सोयीस्कर अर्थ काढत बहुजन समाजातील तरुणांची डोकी भडकविण्याचे काम ते करीत आहेत. त्यांनी बहुजनातील मुलांना शैक्षणिक क्षेत्रापासून तसेच पुरोगामित्वापासून दूर करण्याचा एकप्रकारे विडाच उचलला आहे. अशा मनुवादी, स्वयंघोषित गुरुजींपासून तरुणांना वाचविणे गरजेचे आहे.यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, बापू सोनावणे उपस्थित होते.मराठा, लिंगायत समाजावर टीका का?कांबळे म्हणाले की, विद्यमान सरकारच्या प्रेमापोटी भिडे यांनी मराठा क्रांती मोर्चा आणि लिंगायत मोर्चावरही टीका केली. वास्तविक या दोन्ही समाजांनी आपापल्या न्याय्य मागण्या लोकशाही मार्गाने संविधानिकरित्या सरकारसमोर मांडल्या. या मोर्चांच्या माध्यमातून सरकारला अडचणीत आणू पाहणारे लोक सत्तापिपासू आहेत, अशी टीका भिडे यांनी जाणीवपूर्वक केली. मराठा क्रांती मोर्चा, लिंगायत मोर्चावरही टीका करून दिशाभूल सुरू केली आहे. समाजा-समाजात फूट फाडून दंगलीच घडविण्याचा यांचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो.उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकांबळे म्हणाले की, या मनुवादी प्रवृत्तीविरोधात सोमवार, दि. ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आरपीआयच्यावतीने धडक मोर्चा काढणार आहोत. भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक झालीच पाहिजे, यासाठी हा लढा आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी शनिवारी बैठक घेतली. तणावपूर्ण स्थिती असल्याने मोर्चा काढू नये, अशीही विनंती केली. पण आम्हाला ती मान्य नाही. आम्ही मोर्चा काढणारच. लोकशाही मानणाºया आणि मनुवादी विचाराला विरोध करणाºयांनी सोमवारच्या मोर्चात सामील व्हावे.