शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सदाशिवराव पाटील-अमरसिंह देशमुख यांची ‘चाय पे चर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:06 IST

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : स्थळ : विटा नगरपरिषद, वेळ : सायंकाळी पाचची. माजी आमदार सदाशिवराव ...

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : स्थळ : विटा नगरपरिषद, वेळ : सायंकाळी पाचची. माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची गाड्यावरच्या चहाने ‘चाय पे चर्चा’ सुरू झाली. तब्बल अर्धा तास ती चालली! येणारी विधानसभा निवडणूक बिकट आहे, एकत्रित सामना करायला पाहिजे, ते अगदी आमदार अनिल बाबर यांना थांबवायचेच, इथेपर्यंत. चहापेक्षाही गरम झालेल्या या चर्चेने खानापूर-आटपाडीतील नेत्यांच्या ऐक्याचा नारळ फुटला.त्याचे असे झाले, सोमवारी ‘लोकमत’च्या विटा कार्यालयाचा वर्धापनदिन झाला. त्यानिमित्त ‘लोकमत’ला शुभेच्छा देण्यासाठी खानापूर-आटपाडीतील नेतेमंडळी एकत्रित आली होती. आटपाडीहून अमरसिंह देशमुख आले होते. त्यांना सदाशिवराव पाटील यांनी नगरपरिषदेत चहाचे निमंत्रण दिले. जाता-जाता देशमुख तिथे गेले. नगरपरिषदेसमोरच्या चहाच्या गाड्यावर दोघांसह कार्यकर्त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. गरम चहासह राजकीय गरम चर्चा होण्याच्या शक्यतेने पाटील समर्थक लगेचच जमा होऊ लागले. नंतर नगरपरिषदेच्या कार्यालयात सगळी मंडळी गेली. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पुन्हा सगळ्यांना चहा-बिस्किटे दिली. समर्थकांची गर्दी एवढी वाढली की, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांची खुर्ची तेवढी रिकामी होती. वैभव पाटील, सदाशिवराव पाटील जवळ-जवळ बसले. थोडा वेळ शांतता पसरली. चहा-बिस्किटे संपली. तरीही शांतताच...अमरसिंह देशमुख म्हणाले, ‘मग काय? सगळे ठीक आहे ना?’ त्यावर एकटा म्हणाला, ‘विधानसभा निवडणुकीत तुम्ही एक व्हा. त्याशिवाय जमणार नाही. विट्याचे पाटील आणि आटपाडीच्या देशमुख घराण्याचे संबंध फार जुने आहेत’.थेट विधानसभा निवडणुकीचीच चर्चा सुरू झाली. त्यावर देशमुख म्हणाले, ‘काय करायचे, हे एकदा ठरवावे लागेल. मग त्यानुसार पुढे काही करता येईल’.मध्येच एकजण, ‘आता एकवेळ सदाभाऊंना आमदार करूया. पुढच्यावेळी आम्ही वैभवदादांना थांबायला सांगू’, असे म्हणाला.त्यावर देशमुख म्हणाले, ‘आपल्याला आमदार व्हायचं, का कुणाला (आ. अनिल बाबर) थांबवायचं हे एकदा ठरवावं लागेल. आमच्या लोकांची आता थांबण्याची मानसिकता नाही. त्यामुळे जुळेल, पण तुम्हाला थोडे मागे-पुढे सरकावं लागेल. थांबावं लागेल’.पाटील म्हणाले, ‘सर्वेक्षण करू, थांबायचं असेल तर थांबू. बघूया. एकत्रित बसल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय काही होत नसते.’ शेवटी एकाने दोन्हीही नेत्यांना, ‘परिस्थिती बिकट आहे. एकत्रित तोंड दिले तरच निभाव लागेल’, असा सल्ला दिला. यावेळी अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.उमेदवार कोण? हाच कळीचा मुद्दाआ. अनिल बाबर यांचे सर्व राजकीय विरोधक येत्या विधानसभा निवडणुकीत एकत्र येत आहेत. या बैठकीत गोपीचंद पडळकर उपस्थित नव्हते. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीतील पाटील, देशमुख, पडळकर यांची एकूण मते एक लाख चाळीस हजार असल्याचा अनेकदा उल्लेख झाला. सगळे एकत्र आलो तर वातावरण निर्माण होऊन त्याहून जास्त मते मिळतील, यावर सर्वांचे एकमत झाले. मात्र अमरसिंह देशमुख म्हणाले, ‘मलाच पाहिजे, असे प्रत्येकाने म्हटले नाही, तरच हे जुळेल!’देशमुखांचा राजकीय बॉम्ब!गेल्या आठवड्यात अमरसिंह देशमुख यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार आटपाडीचाच होणार, असा राजकीय बॉम्ब फोडला. त्यामुळे खानापूर-आटपाडीतील राजकीय वातावरणात धमाका झाला आहे. आता आटपाडी तालुक्यातील अनेक गटाचे नेते आणि पदाधिकारी एकत्र येऊन या निर्णयाला पाठिंबा देऊ लागले आहेत. देशमुख यांनी आटपाडीकरांच्या दुखण्याला तोंड फोडल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.